शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:37 IST

विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देनेर तालुक्यातील ३३ गावे तहानलेली : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहे. पाण्यासाठी नागरिकांना जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. पाण्यासाठी मजुरी पाडावी लागत आहे. रानोरान भटकूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तळपत्या उन्हात डोक्यावर गुंड घेऊन पाण्यासाठी दूरवर भटकणाऱ्या महिलांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे.आजंती(खाकी) हे गाव पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांच्या योजना या गावासाठी आल्या. पाण्याची टाकी उभी झाली. मात्र मागील दोन वर्षांपासून नळ सुरू झाले नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. तरीही प्रशासन याविषयी गंभीर नाही. मोझर गावातील विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्या आहे. नागरिक दिवसरात्र पाण्यासाठी भटकत आहे. घुई या गावाला ‘आमचे गाव, आमचा विकास’ अंतर्गत दहा लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्याची शोभा वाढवित आहे.मांगलादेवी, वटफळी, परजना, उमरठा आदी गावे पाणीटंचाईने होरपळून निघाली आहे. पंचायत समितीकडून कृती आराखडा तयार केला जातो. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती यापुढे कृती आराखडा सरकत नाही. दरवर्षीचाच कित्ता याहीवेळी गिरविला गेला. तालुक्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासन हातावर हात ठेऊन बसले आहे, तर लोकप्रतिनिधींना समस्याग्रस्त भागात फिरण्यासही सवड नाही. नागरिकांमध्ये मात्र कमालीचा रोष आहे.सिंदखेड येथे वसुलीचा तगादापाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असताना सिंदखेड ग्रामपंचायतीने थकीत बिलासाठी नळ जोडण्या कापण्याचा ठराव घेतला. त्याच कारणावरून हाणामारीचे प्रकारही घडत आहे. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या गावात आठ दिवसातून एकदा नळाला पाणी सोडले जात आहे. तरीही पाणीकराच्या वसुलीसाठी लोकांना त्रस्त करून सोडले जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांच्या रोषाचे बळी ठरत आहे. श्यामराव राठोड यांना मारहाणीचा प्रकारही या गावात घडला. पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता वसुलीची कारवाई थांबविली जावी, अशी मागणी मिलन राठोड यांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई