शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:37 IST

विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देनेर तालुक्यातील ३३ गावे तहानलेली : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहे. पाण्यासाठी नागरिकांना जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. पाण्यासाठी मजुरी पाडावी लागत आहे. रानोरान भटकूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तळपत्या उन्हात डोक्यावर गुंड घेऊन पाण्यासाठी दूरवर भटकणाऱ्या महिलांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे.आजंती(खाकी) हे गाव पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांच्या योजना या गावासाठी आल्या. पाण्याची टाकी उभी झाली. मात्र मागील दोन वर्षांपासून नळ सुरू झाले नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. तरीही प्रशासन याविषयी गंभीर नाही. मोझर गावातील विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्या आहे. नागरिक दिवसरात्र पाण्यासाठी भटकत आहे. घुई या गावाला ‘आमचे गाव, आमचा विकास’ अंतर्गत दहा लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्याची शोभा वाढवित आहे.मांगलादेवी, वटफळी, परजना, उमरठा आदी गावे पाणीटंचाईने होरपळून निघाली आहे. पंचायत समितीकडून कृती आराखडा तयार केला जातो. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती यापुढे कृती आराखडा सरकत नाही. दरवर्षीचाच कित्ता याहीवेळी गिरविला गेला. तालुक्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासन हातावर हात ठेऊन बसले आहे, तर लोकप्रतिनिधींना समस्याग्रस्त भागात फिरण्यासही सवड नाही. नागरिकांमध्ये मात्र कमालीचा रोष आहे.सिंदखेड येथे वसुलीचा तगादापाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असताना सिंदखेड ग्रामपंचायतीने थकीत बिलासाठी नळ जोडण्या कापण्याचा ठराव घेतला. त्याच कारणावरून हाणामारीचे प्रकारही घडत आहे. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या गावात आठ दिवसातून एकदा नळाला पाणी सोडले जात आहे. तरीही पाणीकराच्या वसुलीसाठी लोकांना त्रस्त करून सोडले जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांच्या रोषाचे बळी ठरत आहे. श्यामराव राठोड यांना मारहाणीचा प्रकारही या गावात घडला. पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता वसुलीची कारवाई थांबविली जावी, अशी मागणी मिलन राठोड यांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई