शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:37 IST

विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देनेर तालुक्यातील ३३ गावे तहानलेली : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहे. पाण्यासाठी नागरिकांना जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. पाण्यासाठी मजुरी पाडावी लागत आहे. रानोरान भटकूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तळपत्या उन्हात डोक्यावर गुंड घेऊन पाण्यासाठी दूरवर भटकणाऱ्या महिलांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे.आजंती(खाकी) हे गाव पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांच्या योजना या गावासाठी आल्या. पाण्याची टाकी उभी झाली. मात्र मागील दोन वर्षांपासून नळ सुरू झाले नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. तरीही प्रशासन याविषयी गंभीर नाही. मोझर गावातील विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्या आहे. नागरिक दिवसरात्र पाण्यासाठी भटकत आहे. घुई या गावाला ‘आमचे गाव, आमचा विकास’ अंतर्गत दहा लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्याची शोभा वाढवित आहे.मांगलादेवी, वटफळी, परजना, उमरठा आदी गावे पाणीटंचाईने होरपळून निघाली आहे. पंचायत समितीकडून कृती आराखडा तयार केला जातो. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती यापुढे कृती आराखडा सरकत नाही. दरवर्षीचाच कित्ता याहीवेळी गिरविला गेला. तालुक्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासन हातावर हात ठेऊन बसले आहे, तर लोकप्रतिनिधींना समस्याग्रस्त भागात फिरण्यासही सवड नाही. नागरिकांमध्ये मात्र कमालीचा रोष आहे.सिंदखेड येथे वसुलीचा तगादापाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असताना सिंदखेड ग्रामपंचायतीने थकीत बिलासाठी नळ जोडण्या कापण्याचा ठराव घेतला. त्याच कारणावरून हाणामारीचे प्रकारही घडत आहे. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या गावात आठ दिवसातून एकदा नळाला पाणी सोडले जात आहे. तरीही पाणीकराच्या वसुलीसाठी लोकांना त्रस्त करून सोडले जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांच्या रोषाचे बळी ठरत आहे. श्यामराव राठोड यांना मारहाणीचा प्रकारही या गावात घडला. पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता वसुलीची कारवाई थांबविली जावी, अशी मागणी मिलन राठोड यांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई