शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

पाणी टँकरला ‘जीपीआरएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:37 IST

नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा निर्णय : टंचाई कक्षात मिळणार वितरणाची स्थिती

रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे. या पाण्याच्या व्यवसायाला चाप बसविण्यासाठी नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम (ट्रॅकर) लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १५ टँकरला असे ट्रॅकर लावण्यात आले असून नगरपरिषदेत टंचाई कक्षातून यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. टंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा हा एक प्रयत्न होय.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला महिनाभरानंतरही पाणी येत नाही. परिणामी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु काही खासगी टँकरधारक आपण अधिग्रहित केलेले टँकरधारक असल्याचे सांगून नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करतात आणि त्याची गावात विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाईलाजाने नागरिकांना पैसे मोजून टँकर घ्यावे लागते. हा पाण्याचा व्यवसाय मोडून काढण्यासाठी नगरपरिषदेने एक निर्णय घेतला आहे. अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर मोफत पाणी असा फलक लावावा लागणार आहे. त्यावर नगरसेवकाचे आणि वार्डाचे नावही लिहिले जाणार आहे. या टँकरचा क्रमांक नगरपरिषदेकडे राहणार आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकर कोणत्या भागात पाणी घेऊन पोहोचले, प्रत्यक्ष सांगितलेल्या ठिकाणीच टँकर पोहोचला काय याची माहिती तत्काळ नगरपरिषदेला मिळणार आहे. तसेच कमी फेºया मारून अधिक बिल काढणाºया टँकरधारकांवरही या प्रणालीमुळे चाप बसणार आहे.नगरपरिषदेत यासाठी टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लावलेल्या यंत्रणेत शहरातील सर्वच टँकरची स्थिती दिसणार आहे. तसेच टँकरच्या स्थितीची माहिती नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाºयांना तत्काळ कळविली जाणार आहे. यामुळे टँकरच्या हेराफेरीला आळा बसून शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुकर होणार आहेनगरसेवकाला एसएमएसशहरात १२ दिवसानंतर नळाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. परंतु १२ दिवसानंतरही अनेक भागात पाणी पोहोचत नाही. काही भागात तर महिना झाला तरी नळ आले नाही. आता नळ येत असलेल्या भागातील नगरसेवकाला जीवन प्राधिकरणातून मोबाईलवर संदेश जाणार आहे. त्यासाठी शहरातील नगरसेवकाचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. तसेच ज्या भागात नळ येणार आहे, त्या भागात आॅटोरिक्षाच्या मदतीने ध्वनीक्षेपकावरून माहिती दिली जाणार आहे. तसेच सोडलेले पाणी त्या भागात पोहोचले किंवा नाही याचीही माहिती नगरसेवकांनी प्राधिकरणाला द्यावयाची आहे. पाणी पोहोचत नसल्यास त्या भागात टँकरची व्यवस्था करावयाची आहे.मनुष्यबळाचा तुटवडायवतमाळ शहरातील ७९ विहिरींची साफसफाई करावी लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. परंतु विहीर स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा