शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टँकरला ‘जीपीआरएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:37 IST

नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा निर्णय : टंचाई कक्षात मिळणार वितरणाची स्थिती

रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे. या पाण्याच्या व्यवसायाला चाप बसविण्यासाठी नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम (ट्रॅकर) लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १५ टँकरला असे ट्रॅकर लावण्यात आले असून नगरपरिषदेत टंचाई कक्षातून यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. टंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा हा एक प्रयत्न होय.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला महिनाभरानंतरही पाणी येत नाही. परिणामी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु काही खासगी टँकरधारक आपण अधिग्रहित केलेले टँकरधारक असल्याचे सांगून नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करतात आणि त्याची गावात विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाईलाजाने नागरिकांना पैसे मोजून टँकर घ्यावे लागते. हा पाण्याचा व्यवसाय मोडून काढण्यासाठी नगरपरिषदेने एक निर्णय घेतला आहे. अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर मोफत पाणी असा फलक लावावा लागणार आहे. त्यावर नगरसेवकाचे आणि वार्डाचे नावही लिहिले जाणार आहे. या टँकरचा क्रमांक नगरपरिषदेकडे राहणार आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकर कोणत्या भागात पाणी घेऊन पोहोचले, प्रत्यक्ष सांगितलेल्या ठिकाणीच टँकर पोहोचला काय याची माहिती तत्काळ नगरपरिषदेला मिळणार आहे. तसेच कमी फेºया मारून अधिक बिल काढणाºया टँकरधारकांवरही या प्रणालीमुळे चाप बसणार आहे.नगरपरिषदेत यासाठी टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लावलेल्या यंत्रणेत शहरातील सर्वच टँकरची स्थिती दिसणार आहे. तसेच टँकरच्या स्थितीची माहिती नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाºयांना तत्काळ कळविली जाणार आहे. यामुळे टँकरच्या हेराफेरीला आळा बसून शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुकर होणार आहेनगरसेवकाला एसएमएसशहरात १२ दिवसानंतर नळाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. परंतु १२ दिवसानंतरही अनेक भागात पाणी पोहोचत नाही. काही भागात तर महिना झाला तरी नळ आले नाही. आता नळ येत असलेल्या भागातील नगरसेवकाला जीवन प्राधिकरणातून मोबाईलवर संदेश जाणार आहे. त्यासाठी शहरातील नगरसेवकाचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. तसेच ज्या भागात नळ येणार आहे, त्या भागात आॅटोरिक्षाच्या मदतीने ध्वनीक्षेपकावरून माहिती दिली जाणार आहे. तसेच सोडलेले पाणी त्या भागात पोहोचले किंवा नाही याचीही माहिती नगरसेवकांनी प्राधिकरणाला द्यावयाची आहे. पाणी पोहोचत नसल्यास त्या भागात टँकरची व्यवस्था करावयाची आहे.मनुष्यबळाचा तुटवडायवतमाळ शहरातील ७९ विहिरींची साफसफाई करावी लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. परंतु विहीर स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा