शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

पाणी टँकरला ‘जीपीआरएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:37 IST

नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा निर्णय : टंचाई कक्षात मिळणार वितरणाची स्थिती

रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे. या पाण्याच्या व्यवसायाला चाप बसविण्यासाठी नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम (ट्रॅकर) लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १५ टँकरला असे ट्रॅकर लावण्यात आले असून नगरपरिषदेत टंचाई कक्षातून यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. टंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा हा एक प्रयत्न होय.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला महिनाभरानंतरही पाणी येत नाही. परिणामी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु काही खासगी टँकरधारक आपण अधिग्रहित केलेले टँकरधारक असल्याचे सांगून नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करतात आणि त्याची गावात विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाईलाजाने नागरिकांना पैसे मोजून टँकर घ्यावे लागते. हा पाण्याचा व्यवसाय मोडून काढण्यासाठी नगरपरिषदेने एक निर्णय घेतला आहे. अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर मोफत पाणी असा फलक लावावा लागणार आहे. त्यावर नगरसेवकाचे आणि वार्डाचे नावही लिहिले जाणार आहे. या टँकरचा क्रमांक नगरपरिषदेकडे राहणार आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकर कोणत्या भागात पाणी घेऊन पोहोचले, प्रत्यक्ष सांगितलेल्या ठिकाणीच टँकर पोहोचला काय याची माहिती तत्काळ नगरपरिषदेला मिळणार आहे. तसेच कमी फेºया मारून अधिक बिल काढणाºया टँकरधारकांवरही या प्रणालीमुळे चाप बसणार आहे.नगरपरिषदेत यासाठी टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लावलेल्या यंत्रणेत शहरातील सर्वच टँकरची स्थिती दिसणार आहे. तसेच टँकरच्या स्थितीची माहिती नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाºयांना तत्काळ कळविली जाणार आहे. यामुळे टँकरच्या हेराफेरीला आळा बसून शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुकर होणार आहेनगरसेवकाला एसएमएसशहरात १२ दिवसानंतर नळाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. परंतु १२ दिवसानंतरही अनेक भागात पाणी पोहोचत नाही. काही भागात तर महिना झाला तरी नळ आले नाही. आता नळ येत असलेल्या भागातील नगरसेवकाला जीवन प्राधिकरणातून मोबाईलवर संदेश जाणार आहे. त्यासाठी शहरातील नगरसेवकाचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. तसेच ज्या भागात नळ येणार आहे, त्या भागात आॅटोरिक्षाच्या मदतीने ध्वनीक्षेपकावरून माहिती दिली जाणार आहे. तसेच सोडलेले पाणी त्या भागात पोहोचले किंवा नाही याचीही माहिती नगरसेवकांनी प्राधिकरणाला द्यावयाची आहे. पाणी पोहोचत नसल्यास त्या भागात टँकरची व्यवस्था करावयाची आहे.मनुष्यबळाचा तुटवडायवतमाळ शहरातील ७९ विहिरींची साफसफाई करावी लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. परंतु विहीर स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा