शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

उमरखेड शहराचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:11 IST

तालुक्याची जीवनदायीनी पैनगंगा नदी आटल्याचा फटका उमरखेड शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे.

ठळक मुद्दे५० हजार नागरिकांना फटका : पैनगंगा नदी आटल्याचा परिणाम

आॅनलाईन लोकमतउमरखेड : तालुक्याची जीवनदायीनी पैनगंगा नदी आटल्याचा फटका उमरखेड शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. शहराचा पाणीपुरवठा सोमवारपासून ठप्प झाला असून इसापूर धरणाचे पाणी सोडले तरच पाच दिवसानंतर उमरखेडकरांना पाणी मिळण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील सुमारे ५० हजार नागरिकांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.उमरखेड शहराला पैनगंगा नदी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी तालुक्यातील बेलखेड येथे बंधारा बांधण्यात आला आहे. त्या ठिकाणी पाणी अडवून पाईपलाईनद्वारे उमरखेड शहरातील ५० हजार नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे पैनगंगा नदी पात्र कोरडे पडले. इसापूर धरणातही अत्यल्प जलसाठा आहे. परिणामी हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवू लागली. त्यातच बेलखेड येथील बंधाºयातील पाणी संपले. त्यामुळे सोमवारपासून उमरखेड शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ५० हजार नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषदेने कोणतेही पर्यायी उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडल्यास पाच दिवसानंतर पाणी मिळण्याची शक्यता आहे.नदीपात्रात खड्डे खोदण्याचा प्रयत्नउमरखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगेचे पात्र काही महिन्यापूर्वीच कोरडे पडले. परंतु बंधाºयात पाणी असल्याने उमरखेडकरांना पाणी पुरवठा होत होता. आता सोमवारपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नगरपरिषदेने पैनगंगेच्या पात्रात जेसीबीने खड्डे खोदण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे पाणी बंधाºयात आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र केवळ एक दिवस पुरेल एवढेच पाणी मिळण्याची शक्यता आहे. परंतु अपुरेच पाणी मिळेल.पैनगंगा नदी आटली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहे. इसापूर धरणातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. नदीपात्रात पाणी येताच पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येईल.- गणेश चव्हाणमुख्याधिकारी, उमरखेड