शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पेटूर, नायगावात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:41 IST

यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे.

ठळक मुद्देपाणी पेटले : नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव, सावंगीतही टँकरची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. परिस्थिती बिकट झाल्याने तालुक्यातील पेटूर व नायगाव (खु) या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.अन्य गावांमध्येही पाण्याची बिकट अवस्था आहे. गावातील विहीरी व हातपंपांनी तळ गाठला आहे. परिणामी नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. वणी येथून आठ किलोमिटरवर असलेल्या पेटूर गावात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. तिच अवस्था नायगाव (खु.) येथील आहे. या दोनही गावांत दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरचे पाणी गावातील सार्वजनिक विहीरीत सोडले जाते. त्यानंतर गावकरी त्या पाण्याचा वापर करतात. पेटूरमध्ये दररोज २४ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर पाठविले जात आहे. नायगावातही तिच परिस्थिती आहे. गावात टँकर पोहचताच, पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. मात्र या टँकरच्या पाण्याने एक हजार ७२ लोकसंख्या असलेल्या या गावाची तहान भागत नाही. मिळालेल्या पाण्यात गरज भागली नाही, तर गावकऱ्यांना दूरवरील शेतातून पाणी आणून आपली गरज भागवावी लागत आहे.वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथेही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तेथेही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसा प्रस्तावही वणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे पाठविला आहे. तालुक्यातील कुर्ली, पिंपरी कायर, पेटूर व वरझडी बंडा या गावांमध्ये विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर तालुक्यातील गोपालपूर, तेजापूर व निंबाळा (बु.) येथे विहीरीचे अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.पाणीपुरवठा उपविभागाची उदासीनतागेल्या १५ वर्षांपासून पेटूर येथील नागरिक दर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करतात. मागील आठवड्यात या गावातील महिलांनी गटविकास अधिकाºयांना घेराव घालून पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी केली होती. पेटूर येथील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी मानकी येथे बोअर खोदण्यात आली. या बोअरवेलला मुबलक पाणी आहे. नळयोजनेच्या माध्यमातून या बोअरमधून पेटूर गावापर्यंत पाणी पोहचविण्याची जबाबदारी वणी येथील पाणी पुरवठा उपविभागाची आहे. मात्र बोअर तयार होऊन महिना लोटला असला तरी नळयोजनेचे काम सुरू करण्यात न आल्याने नागरिकांध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणी