शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पेटूर, नायगावात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:41 IST

यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे.

ठळक मुद्देपाणी पेटले : नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव, सावंगीतही टँकरची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. परिस्थिती बिकट झाल्याने तालुक्यातील पेटूर व नायगाव (खु) या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.अन्य गावांमध्येही पाण्याची बिकट अवस्था आहे. गावातील विहीरी व हातपंपांनी तळ गाठला आहे. परिणामी नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. वणी येथून आठ किलोमिटरवर असलेल्या पेटूर गावात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. तिच अवस्था नायगाव (खु.) येथील आहे. या दोनही गावांत दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरचे पाणी गावातील सार्वजनिक विहीरीत सोडले जाते. त्यानंतर गावकरी त्या पाण्याचा वापर करतात. पेटूरमध्ये दररोज २४ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर पाठविले जात आहे. नायगावातही तिच परिस्थिती आहे. गावात टँकर पोहचताच, पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. मात्र या टँकरच्या पाण्याने एक हजार ७२ लोकसंख्या असलेल्या या गावाची तहान भागत नाही. मिळालेल्या पाण्यात गरज भागली नाही, तर गावकऱ्यांना दूरवरील शेतातून पाणी आणून आपली गरज भागवावी लागत आहे.वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथेही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तेथेही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसा प्रस्तावही वणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे पाठविला आहे. तालुक्यातील कुर्ली, पिंपरी कायर, पेटूर व वरझडी बंडा या गावांमध्ये विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर तालुक्यातील गोपालपूर, तेजापूर व निंबाळा (बु.) येथे विहीरीचे अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.पाणीपुरवठा उपविभागाची उदासीनतागेल्या १५ वर्षांपासून पेटूर येथील नागरिक दर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करतात. मागील आठवड्यात या गावातील महिलांनी गटविकास अधिकाºयांना घेराव घालून पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी केली होती. पेटूर येथील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी मानकी येथे बोअर खोदण्यात आली. या बोअरवेलला मुबलक पाणी आहे. नळयोजनेच्या माध्यमातून या बोअरमधून पेटूर गावापर्यंत पाणी पोहचविण्याची जबाबदारी वणी येथील पाणी पुरवठा उपविभागाची आहे. मात्र बोअर तयार होऊन महिना लोटला असला तरी नळयोजनेचे काम सुरू करण्यात न आल्याने नागरिकांध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणी