शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

पेटूर, नायगावात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:41 IST

यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे.

ठळक मुद्देपाणी पेटले : नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव, सावंगीतही टँकरची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. परिस्थिती बिकट झाल्याने तालुक्यातील पेटूर व नायगाव (खु) या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.अन्य गावांमध्येही पाण्याची बिकट अवस्था आहे. गावातील विहीरी व हातपंपांनी तळ गाठला आहे. परिणामी नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. वणी येथून आठ किलोमिटरवर असलेल्या पेटूर गावात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. तिच अवस्था नायगाव (खु.) येथील आहे. या दोनही गावांत दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरचे पाणी गावातील सार्वजनिक विहीरीत सोडले जाते. त्यानंतर गावकरी त्या पाण्याचा वापर करतात. पेटूरमध्ये दररोज २४ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर पाठविले जात आहे. नायगावातही तिच परिस्थिती आहे. गावात टँकर पोहचताच, पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. मात्र या टँकरच्या पाण्याने एक हजार ७२ लोकसंख्या असलेल्या या गावाची तहान भागत नाही. मिळालेल्या पाण्यात गरज भागली नाही, तर गावकऱ्यांना दूरवरील शेतातून पाणी आणून आपली गरज भागवावी लागत आहे.वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथेही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तेथेही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसा प्रस्तावही वणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे पाठविला आहे. तालुक्यातील कुर्ली, पिंपरी कायर, पेटूर व वरझडी बंडा या गावांमध्ये विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर तालुक्यातील गोपालपूर, तेजापूर व निंबाळा (बु.) येथे विहीरीचे अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.पाणीपुरवठा उपविभागाची उदासीनतागेल्या १५ वर्षांपासून पेटूर येथील नागरिक दर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करतात. मागील आठवड्यात या गावातील महिलांनी गटविकास अधिकाºयांना घेराव घालून पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी केली होती. पेटूर येथील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी मानकी येथे बोअर खोदण्यात आली. या बोअरवेलला मुबलक पाणी आहे. नळयोजनेच्या माध्यमातून या बोअरमधून पेटूर गावापर्यंत पाणी पोहचविण्याची जबाबदारी वणी येथील पाणी पुरवठा उपविभागाची आहे. मात्र बोअर तयार होऊन महिना लोटला असला तरी नळयोजनेचे काम सुरू करण्यात न आल्याने नागरिकांध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणी