शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दारव्ह्यात पुराचे पाणी घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:07 IST

शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देलेंडी नाल्यामुळे धोका वाढला : वाहतुकीचा खोळंबा, नित्याचाच प्रकार

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.लेंडी नाल्याला पूर आला, की जागोजागी पाणी तुंबते. तुंबलेले पाणी आजूबाजूच्या नगरांतील घरे, दुकानांमध्ये शिरते. रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जुने व नवीन शहराच्या मध्यभागातून हा लेंडी नाला वाहतो. रेल्वे स्टेशन परिसर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, गोळीबार चौक, वर्षा टॉकीज परिसर, असा प्रवास करीत या नाल्याचे पाणी शहराबाहेर जाते. नाला कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढतात. त्यामुळे दरवर्षी नगरपरिषदेला मान्सूनपूर्वी हा नाला जेसीबी मशीनद्वारे स्वच्छ करावा लागतो. तरीसुद्धा पूर्णपणे नाला स्वच्छ होत नाही.काही भागात मशीनच्या कामामुळे दिवसेंदिवस नाल्याचा आकार मोठा होत आहे. नाल्यात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे कचरा अटकून जागोजागी पाणी थोपून राहते. तेच पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरते. थोडासा पाऊस पडला, तरी नाल्याला पूर येतो. १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर कॉलनी, बस स्थानक परिसर, गोळीबार चौक, आर्णी रोड आदी परिसरांमध्ये शिरून अनेक घरे व दुकानांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना फटका बसला.बस स्थानकातील प्रवाशांचे हाल झाले. यवतमाळ, कारंजा, आर्णी राज्य मार्गाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. शहरवासीयांना वेठीस धरणारा ही समस्या कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.नाल्याचे बांधकाम आवश्यकलेंडी नाल्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून पाणी येते. हे पाणी नाल्यात शिरू न देता तेथे एखादा बंधारा बांधणे आवश्यक आहे. शहराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत नाल्याचे बांधकाम करणे व मध्ये असलेल्या दोन पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे. यामुळे पावसाळ्यात होणारा नाल्याचा उपद्रव कायमचा बंद होऊ शकतो. तसेच इतरवेळी साचून राहणाऱ्या पाण्यामुळे होणारी घाण नष्ट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. नगरपरिषदेने याकरिता पुढाकार घेऊन नाल्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर