शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

दारव्ह्यात पुराचे पाणी घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:07 IST

शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देलेंडी नाल्यामुळे धोका वाढला : वाहतुकीचा खोळंबा, नित्याचाच प्रकार

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.लेंडी नाल्याला पूर आला, की जागोजागी पाणी तुंबते. तुंबलेले पाणी आजूबाजूच्या नगरांतील घरे, दुकानांमध्ये शिरते. रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जुने व नवीन शहराच्या मध्यभागातून हा लेंडी नाला वाहतो. रेल्वे स्टेशन परिसर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, गोळीबार चौक, वर्षा टॉकीज परिसर, असा प्रवास करीत या नाल्याचे पाणी शहराबाहेर जाते. नाला कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढतात. त्यामुळे दरवर्षी नगरपरिषदेला मान्सूनपूर्वी हा नाला जेसीबी मशीनद्वारे स्वच्छ करावा लागतो. तरीसुद्धा पूर्णपणे नाला स्वच्छ होत नाही.काही भागात मशीनच्या कामामुळे दिवसेंदिवस नाल्याचा आकार मोठा होत आहे. नाल्यात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे कचरा अटकून जागोजागी पाणी थोपून राहते. तेच पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरते. थोडासा पाऊस पडला, तरी नाल्याला पूर येतो. १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर कॉलनी, बस स्थानक परिसर, गोळीबार चौक, आर्णी रोड आदी परिसरांमध्ये शिरून अनेक घरे व दुकानांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना फटका बसला.बस स्थानकातील प्रवाशांचे हाल झाले. यवतमाळ, कारंजा, आर्णी राज्य मार्गाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. शहरवासीयांना वेठीस धरणारा ही समस्या कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.नाल्याचे बांधकाम आवश्यकलेंडी नाल्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून पाणी येते. हे पाणी नाल्यात शिरू न देता तेथे एखादा बंधारा बांधणे आवश्यक आहे. शहराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत नाल्याचे बांधकाम करणे व मध्ये असलेल्या दोन पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे. यामुळे पावसाळ्यात होणारा नाल्याचा उपद्रव कायमचा बंद होऊ शकतो. तसेच इतरवेळी साचून राहणाऱ्या पाण्यामुळे होणारी घाण नष्ट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. नगरपरिषदेने याकरिता पुढाकार घेऊन नाल्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर