शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

दारव्ह्यात पुराचे पाणी घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:07 IST

शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देलेंडी नाल्यामुळे धोका वाढला : वाहतुकीचा खोळंबा, नित्याचाच प्रकार

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.लेंडी नाल्याला पूर आला, की जागोजागी पाणी तुंबते. तुंबलेले पाणी आजूबाजूच्या नगरांतील घरे, दुकानांमध्ये शिरते. रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जुने व नवीन शहराच्या मध्यभागातून हा लेंडी नाला वाहतो. रेल्वे स्टेशन परिसर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, गोळीबार चौक, वर्षा टॉकीज परिसर, असा प्रवास करीत या नाल्याचे पाणी शहराबाहेर जाते. नाला कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढतात. त्यामुळे दरवर्षी नगरपरिषदेला मान्सूनपूर्वी हा नाला जेसीबी मशीनद्वारे स्वच्छ करावा लागतो. तरीसुद्धा पूर्णपणे नाला स्वच्छ होत नाही.काही भागात मशीनच्या कामामुळे दिवसेंदिवस नाल्याचा आकार मोठा होत आहे. नाल्यात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे कचरा अटकून जागोजागी पाणी थोपून राहते. तेच पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरते. थोडासा पाऊस पडला, तरी नाल्याला पूर येतो. १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर कॉलनी, बस स्थानक परिसर, गोळीबार चौक, आर्णी रोड आदी परिसरांमध्ये शिरून अनेक घरे व दुकानांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना फटका बसला.बस स्थानकातील प्रवाशांचे हाल झाले. यवतमाळ, कारंजा, आर्णी राज्य मार्गाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. शहरवासीयांना वेठीस धरणारा ही समस्या कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.नाल्याचे बांधकाम आवश्यकलेंडी नाल्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून पाणी येते. हे पाणी नाल्यात शिरू न देता तेथे एखादा बंधारा बांधणे आवश्यक आहे. शहराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत नाल्याचे बांधकाम करणे व मध्ये असलेल्या दोन पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे. यामुळे पावसाळ्यात होणारा नाल्याचा उपद्रव कायमचा बंद होऊ शकतो. तसेच इतरवेळी साचून राहणाऱ्या पाण्यामुळे होणारी घाण नष्ट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. नगरपरिषदेने याकरिता पुढाकार घेऊन नाल्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर