शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:22 IST

यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसाने पुसद शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. शहरात आठवड्यातून तीन दिवसच नळ येत असून नगरपरिषदेच्या नियोजनशून्यतेचा फटका नागरिकांना बसत आहे.

ठळक मुद्देमाळपठारात परिस्थिती गंभीर : शहरात नियोजनाअभावी नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसाने पुसद शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. शहरात आठवड्यातून तीन दिवसच नळ येत असून नगरपरिषदेच्या नियोजनशून्यतेचा फटका नागरिकांना बसत आहे. तर पाणीटंचाईसाठी कुप्रसिद्ध माळपठारात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योग्य नियोजन करण्यात आले नाही तर तालुक्यात पाणीटंचाईचा स्फोट होऊ शकतो.पुसद तालुक्यात शासकीय आकडेवारीनुसार सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत मात्र आतापासूनच तळाला गेले आहे. पुसद शहराला पूस धरणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणात जेमतेम १५ ते २० टक्के पाणी आहे. त्यामुळे पुसदकरांना आतापासूनच आठवड्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा केला जातो. तोही अनेक भागात पुरेसा नसतो. गत १५ दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातील नागरिकांनी पाण्यासाठी रस्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला होता. इटावा वार्डातही तीच परिस्थिती आहे. दरवर्षी या भागातील नागरिक पाण्यासाठी आंदोलन करतात. शहरातील पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली असून त्यामुळे योग्य दाबाने पाणी पोहोचत नाही. पूस नदीच्या जवळील एका वॉलमधून अहोरात्र पाण्याची गळती सुरू असते. शिवाजी चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली होती. आठ दिवस दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. त्या ठिकाणी खड्डा पडल्याने नागरिकांनाही त्रास झाला. नगरपरिषद पाण्याबाबत गांभीर्याने घेताना दिसत नाही. शहरासाठी पाण्याच्या तीन टाक्या बांधण्यात आल्या असल्या तरी धरणापासून टाकीपर्यंत पाणी आणण्याचे प्रयत्न अपुरे ठरले आहे. आतापासून पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर एप्रिल-मे महिन्यात शहरात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवस्था याही पेक्षा बिकट आहे. नदी-नाले कोरडे असून हातपंप आणि विहिरींची पातळी तळाला गेली आहे. त्यामुळे गाव, वाडी आणि तांड्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. माळपठार तर पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध आहे. चाळीसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी काही गावांना मिळते आणि काही गावांना मिळतच नाही.माळपठारातील आमटी, कुंभारी, म्हैसमाळ, मारवाडी, हनवतखेडा, पिंपळगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक आतापासून विकतचे पाणी घेत आहेत. टँकरद्वारे पाणी आणून त्याची साठवणूक करावी लागते. श्रीमंत मंडळी पाणी विकत घेतात. परंतु गोरगरिबांना पायपीट करून पाणी आणण्याशिवाय पर्याय नसतो. पंचायत समितीचा कृती आराखडा मंजूर असला तरी अद्यापपर्यंत त्याच्या उपाययोजना सुरु झाल्या नाही. प्रशासकीय मान्यतेतच हा आराखडा रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.खरुस बु. येथे कृत्रिम पाणीटंचाईउमरखेड : ग्रामपंचायतीने वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील खरुस बु. येथील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे येथील मागासवर्गीय वस्तीत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत पाच महिन्यांपासून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन खरुस बु. येथील पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी माजी उपसरपंच विजय कांबळे यांनी एका निवेदनातून केली आहे. मागासवर्गीय वसाहतीमध्ये दोन हातपंपाद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. मजुरांची वस्ती असलेल्या या भागातील नागरिकांची पाण्यासाठी परवड होत आहे.