शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वणीत नवरगाव धरणातून पाण्याचा अल्प विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:59 IST

वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही.

ठळक मुद्देचिंता वाढली : शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर

आॅनलाईन लोकमतवणी : वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही. सोमवारी सायंकाळी काही भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा सुरळीत होईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ‘आडातच नाही, तर पोहºयात कुठून येईल’ या उक्तीचा अनुभव वणीकर घेत आहे. नदीत पाहिजे त्या प्रमाणात पाणीच नसल्याने त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने सध्यस्थितीत नवरगाव धरणात केवळ ३३ टक्के म्हणजे ४.१८ दलघमी पाणी शिल्लक आहे. हे पाणी मेपर्यंत पुरावे, म्हणून जिल्हाधिकाºयांनी नवरगाव धरणातून दरमहा केवळ दोनवेळा पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या आहेत. नवरगाव धरणातून वणीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी पाईपलाईन नसल्याने धरणाचे पाणी निर्गुडा नदीच्या पात्रात सोडले जाते. शुक्रवारी सकाळी १० वाजता सदर धरणातून ००.१९ दलघमी पाणी सोडण्यात आले. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता.पाणी सोडल्यानंतर वणीपर्यंत ते पोहोचण्यासाठी चार दिवस लागतात. त्यानुसार सोमवारी दुपारी निर्गुडा नदीच्या वणीतील पात्रापर्यंत पाणी पोहोचले खरे; परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न जटील झाला आहे. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने नदीवरील दोन पंपांपैकी एकाच पंपाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आमदारांकडून वृत्ताची दखलराजूर पिट्समधून येणारे पाणी हे पिण्यायोग्य असले तरी ते दूषित असल्याचा दावा नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी सायंकाळी लालपुलिया भागातील राजूर पिट्सच्या तलाव व पाईपलाईनची पाहणी केली.