शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वणीत नवरगाव धरणातून पाण्याचा अल्प विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:59 IST

वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही.

ठळक मुद्देचिंता वाढली : शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर

आॅनलाईन लोकमतवणी : वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही. सोमवारी सायंकाळी काही भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा सुरळीत होईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ‘आडातच नाही, तर पोहºयात कुठून येईल’ या उक्तीचा अनुभव वणीकर घेत आहे. नदीत पाहिजे त्या प्रमाणात पाणीच नसल्याने त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने सध्यस्थितीत नवरगाव धरणात केवळ ३३ टक्के म्हणजे ४.१८ दलघमी पाणी शिल्लक आहे. हे पाणी मेपर्यंत पुरावे, म्हणून जिल्हाधिकाºयांनी नवरगाव धरणातून दरमहा केवळ दोनवेळा पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या आहेत. नवरगाव धरणातून वणीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी पाईपलाईन नसल्याने धरणाचे पाणी निर्गुडा नदीच्या पात्रात सोडले जाते. शुक्रवारी सकाळी १० वाजता सदर धरणातून ००.१९ दलघमी पाणी सोडण्यात आले. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता.पाणी सोडल्यानंतर वणीपर्यंत ते पोहोचण्यासाठी चार दिवस लागतात. त्यानुसार सोमवारी दुपारी निर्गुडा नदीच्या वणीतील पात्रापर्यंत पाणी पोहोचले खरे; परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न जटील झाला आहे. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने नदीवरील दोन पंपांपैकी एकाच पंपाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आमदारांकडून वृत्ताची दखलराजूर पिट्समधून येणारे पाणी हे पिण्यायोग्य असले तरी ते दूषित असल्याचा दावा नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी सायंकाळी लालपुलिया भागातील राजूर पिट्सच्या तलाव व पाईपलाईनची पाहणी केली.