शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जिल्ह्यातील पाणीटंचाई गुरूवारी गाजणार

By admin | Updated: April 11, 2017 00:10 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याबाबत विचारविमर्श करण्यासाठी येत्या १३ एप्रिलला तातडीची बैठक बोलाविली आहे.

जि. प. अध्यक्षांनी बैठक बोलाविली : बीडीओ, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीयवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याबाबत विचारविमर्श करण्यासाठी येत्या १३ एप्रिलला तातडीची बैठक बोलाविली आहे. ‘लोकमत’मध्ये १० एप्रिलच्या अंकात पाणीटंचाई बाबतचे वृत्त प्रकाशित होताच पदाधिकारी खडबडून जागे झाले असून या बैठकीत संबंधितांची झाडाझडती घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील २३७ गावे आणि वाड्यांना एप्रिल ते जून दरम्यान तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचा पाणीपुरवठा विभागाचा कयास आहे. यात महागाव आणि पुसद तालुक्यातील सर्वाधिक गावांना तडाखा बसणार आहे. मात्र कृती आराखड्यात असमतोल असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते जून दरम्यान तीव्र उन्हाळा असताना पाणीपुरवठा विभागाने कृती आराखड्यात केवळ २५ टँकर आणि खासगी विहिरी अधिग्रहणाच्या उपाययोजना तेवढ्या सुचविल्या आहेत. यामुळे हा आराखडा किती प्रामाणिकपणे तयार करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अध्यक्ष माधुरी आडे यांनी पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येत्या १३ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंते, विद्युत विभागाचे अभियंते यांना बैठकीला पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई व उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार कृती आराखड्यात बदल केले जाण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी) माजी सदस्याची लुडबूड कायमसोमवारी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी स्थायी समितीच्या जुन्या हॉलमध्ये पाणीटंचाईवरील बैठक बोलविण्यासाठी विचारविमर्श करीत होते. यावेळी एक माजी सदस्यही तेथे उपस्थित होते. तेसुद्धा काही सूचना करीत लुडबुड करीत होते. मात्र ते माजी सदस्य बैठकीनंतर हॉलमध्ये पोहोचल्याचा दावा करण्यात आला. नंतर त्यांनी काही पदाधिकाऱ्यांची भेटही घेतली. पालकमंत्र्यांची धावती भेटनवनिर्वाचित समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे यांच्या पदग्रहणासाठी सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हा परिषदेला धावती भेट दिली. यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी त्यांच्या कक्षात पाणीटंचाई व विविध योजनांवर चर्चा केली. यावेळी उपाध्यक्ष उपस्थित होते. मात्र जुन्या हॉलमध्ये त्यांची प्रतीक्षा करीत असलेले उर्वरित पदाधिकारी पालकमंत्री तिकडे न फिरकल्याने निराश झाले.