शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मार्चपर्यंत पाणीटंचाईची दाहकता कमी होती. मात्र एप्रिल महिना सुरू होताच गावे व वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१४ टँकर सुरू : ३६ खासगी विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. या गावांसाठी १४ टँकर सुरू करण्यात आले असून, ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मार्चपर्यंत पाणीटंचाईची दाहकता कमी होती. मात्र एप्रिल महिना सुरू होताच गावे व वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुर्गम भागातील खेड्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. सध्या पुसद, आर्णी, यवतमाळ आणि कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात पुसद तालुक्यातील खंडाळा-अमृतनगर, लोहारा (खुर्द), बुटी (इजारा), लोहारा (इजारा), सावरगाव (बंगला), मारवाडी (खु.), कारला, म्हैसमाळ, वडसद, जवळा, आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर आणि पाळोदी तर यवतमाळ तालुक्यातील इचोरी व कळंब तालुक्यातील किनवट येथे १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी काही गावांमध्ये टँकरच्या प्रत्येकी दोन तर काही गावांमध्ये प्रत्येकी एक फेरी मारली जात आहे. तब्बल १९ हजार ३६२ नागरिकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.  

४७ हजार नागरिकांची तहान विहिरीवर  प्रशासनाने ४० गावांतील ४७ हजार ५६२ नागरिकांसाठी ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. याशिवाय चार ठिकाणी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आर्णी तालुक्यात १४, दिग्रसमध्ये सात, उमरखेडमध्ये चार, वणी येथे पाच, पुसदमध्ये दोन, यवतमाळमध्ये एक, बाभूळगावमध्ये दोन तर कळंब तालुक्यातील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. महागाव, घाटंजी, दारव्हा, केळापूर आणि झरी जामणी या पाच तालुक्यांत एकाही खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नाही. 

मे महिन्यात दाहक स्थिती   एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील अनेक गावे तहानली आहेत. टँकर आणि खासगी विहिरी अधिग्रहण करून तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. ही स्थिती मे महिन्यात आणखी दाहक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०१९ आणि २०२० मध्ये कमी पाऊस होऊनही जिल्ह्यात टँकरची संख्या कमी होती. गेल्या वेळी समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात १४ टँकर सुरू करावे लागले. त्यामुळे मे महिन्यात स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Waterपाणी