शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मार्चपर्यंत पाणीटंचाईची दाहकता कमी होती. मात्र एप्रिल महिना सुरू होताच गावे व वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१४ टँकर सुरू : ३६ खासगी विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. या गावांसाठी १४ टँकर सुरू करण्यात आले असून, ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मार्चपर्यंत पाणीटंचाईची दाहकता कमी होती. मात्र एप्रिल महिना सुरू होताच गावे व वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुर्गम भागातील खेड्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. सध्या पुसद, आर्णी, यवतमाळ आणि कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात पुसद तालुक्यातील खंडाळा-अमृतनगर, लोहारा (खुर्द), बुटी (इजारा), लोहारा (इजारा), सावरगाव (बंगला), मारवाडी (खु.), कारला, म्हैसमाळ, वडसद, जवळा, आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर आणि पाळोदी तर यवतमाळ तालुक्यातील इचोरी व कळंब तालुक्यातील किनवट येथे १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी काही गावांमध्ये टँकरच्या प्रत्येकी दोन तर काही गावांमध्ये प्रत्येकी एक फेरी मारली जात आहे. तब्बल १९ हजार ३६२ नागरिकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.  

४७ हजार नागरिकांची तहान विहिरीवर  प्रशासनाने ४० गावांतील ४७ हजार ५६२ नागरिकांसाठी ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. याशिवाय चार ठिकाणी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आर्णी तालुक्यात १४, दिग्रसमध्ये सात, उमरखेडमध्ये चार, वणी येथे पाच, पुसदमध्ये दोन, यवतमाळमध्ये एक, बाभूळगावमध्ये दोन तर कळंब तालुक्यातील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. महागाव, घाटंजी, दारव्हा, केळापूर आणि झरी जामणी या पाच तालुक्यांत एकाही खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नाही. 

मे महिन्यात दाहक स्थिती   एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील अनेक गावे तहानली आहेत. टँकर आणि खासगी विहिरी अधिग्रहण करून तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. ही स्थिती मे महिन्यात आणखी दाहक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०१९ आणि २०२० मध्ये कमी पाऊस होऊनही जिल्ह्यात टँकरची संख्या कमी होती. गेल्या वेळी समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात १४ टँकर सुरू करावे लागले. त्यामुळे मे महिन्यात स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Waterपाणी