शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

घाटंजी तालुक्यातील ५० गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:39 IST

पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली.

ठळक मुद्देतुफान आलंया : वाटर कप स्पर्धेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली. कुठे सलग समतल चर (सीसीटी), अनघड दगडी बांध (एलबीएस), तर कुठे शोषखड्डे खोदून स्पर्धेची सुरुवात झाली. काही गावांनी वृक्ष संवर्धनाकरिता खड्डे खोदून स्पर्धेची सुरूवात केली.तालुक्यातील अनेक गावांनी दुष्काळावर मात करण्यासाठी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीचा क्षण अन् क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा असल्याचे दर्शविण्यासाठी पहिल्याच रात्री पहिल्या मिनिटाला विविध कामांची सुरूवात करण्यात आली. पांढुर्णा खु, रामपूर, उंदरणी, कापसी, चांदापूर, खापरी, कालेश्वर, मांडवा, बोधडी, भांबोरा, शिरोली, ससाणी आदी गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवून दुष्काळाशी दोन हात करत जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली.लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तालुक्यात जल चळवळ उभी करणे व एवढ्या उत्साहाने चळवळीची सुरुवात होणे, यात पाणी फाउंडेशनच्या चमूचे कष्टही महत्त्वाचे ठरले आहे.अनेक गावांनी स्पर्धेपूर्वी करता येणारी कामे पूर्ण केली असून आता तत्परतेने गावकरी श्रमदानाला लागले आहे. आपल्या धकाधकीच्या कामातून सकाळ व सायंकाळी वेळ काढून गाव पाणीदार करण्यासाठी सर्वांची धडपड सुरू झाली आहे.ग्रामस्थांमध्ये उत्साहआपले गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेची एवढी जोरदार सुरूवात व गावकऱ्यांचा उत्साह अविश्वसनीय वाटत आहे. श्रमदात्यांचे हजारो हात झटत असल्याने तालुक्यात जलक्रांतीची सुरूवात होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा