शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

घाटंजी तालुक्यातील ५० गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:39 IST

पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली.

ठळक मुद्देतुफान आलंया : वाटर कप स्पर्धेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली. कुठे सलग समतल चर (सीसीटी), अनघड दगडी बांध (एलबीएस), तर कुठे शोषखड्डे खोदून स्पर्धेची सुरुवात झाली. काही गावांनी वृक्ष संवर्धनाकरिता खड्डे खोदून स्पर्धेची सुरूवात केली.तालुक्यातील अनेक गावांनी दुष्काळावर मात करण्यासाठी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीचा क्षण अन् क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा असल्याचे दर्शविण्यासाठी पहिल्याच रात्री पहिल्या मिनिटाला विविध कामांची सुरूवात करण्यात आली. पांढुर्णा खु, रामपूर, उंदरणी, कापसी, चांदापूर, खापरी, कालेश्वर, मांडवा, बोधडी, भांबोरा, शिरोली, ससाणी आदी गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवून दुष्काळाशी दोन हात करत जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली.लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तालुक्यात जल चळवळ उभी करणे व एवढ्या उत्साहाने चळवळीची सुरुवात होणे, यात पाणी फाउंडेशनच्या चमूचे कष्टही महत्त्वाचे ठरले आहे.अनेक गावांनी स्पर्धेपूर्वी करता येणारी कामे पूर्ण केली असून आता तत्परतेने गावकरी श्रमदानाला लागले आहे. आपल्या धकाधकीच्या कामातून सकाळ व सायंकाळी वेळ काढून गाव पाणीदार करण्यासाठी सर्वांची धडपड सुरू झाली आहे.ग्रामस्थांमध्ये उत्साहआपले गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेची एवढी जोरदार सुरूवात व गावकऱ्यांचा उत्साह अविश्वसनीय वाटत आहे. श्रमदात्यांचे हजारो हात झटत असल्याने तालुक्यात जलक्रांतीची सुरूवात होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा