शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आर्णी तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर

By admin | Updated: November 27, 2014 23:41 IST

तालुक्यात सुमारे १०५ गावे असून ह्या वर्षी झालेल्या झालेल्या अपुऱ्या पावसामुळे २५ ते ३० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर प्रशासनाकडून ह्या गंभीर

आर्णी : तालुक्यात सुमारे १०५ गावे असून ह्या वर्षी झालेल्या झालेल्या अपुऱ्या पावसामुळे २५ ते ३० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर प्रशासनाकडून ह्या गंभीर समस्येची अद्याप तरी दखल घेतल्याचे दिसत नाही. पंचायत समिती व तहसील कार्यालयात दरवर्षी ह्या समस्यां संदर्भात आढावा बैठक घेतल्या जाते मात्र ही आढावा बैठक जेव्हा पाणी टंचाईचे खरे चटके सुरु होतात तेव्हा सबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी वेळेवर धडपड करतात व तात्पुरती मलमपट्टी करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतल्या जात नाही. आजही अनेक गावात योजना कागदावर असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो. तरोडा, अंजनखेड, जवळा, चांदणी, उमरी(पठार), शेलू.शे., सुभाषनगर, पाळोदी, चिमटा, इचोरा, सुधाकर नगर, दातोडी, बोरगाव (पुंजी), भानसरा, सुकळी, देऊरवाडी, गवना, कुऱ्हा, यरमल हेटी, भंडारी, रानिधानोरा, पांगरी, जांब, माळेगाव आदी गावांचा पाणी टंचाईशी निकटचा सबंध आहे. काही गावांचे प्रस्ताव कागदावर तर काही कामे मंजूर होऊन ते भ्रष्टाचाराने अपूर्ण स्थितीत आहे. तरोडा येथे लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र ह्या गावात आजही पाणीसमस्या समस्या कायम आहे.तीन महिन्याअगोदर विहिरीचे काम सुरु असताना निकृष्ट कामामुळे मजुरासह स्लॅब कोसळल्याने पाच मजूर गंभीर जखमी झाले होत. तालुक्यात ऐकून १ लाख ४० हजार लोकसंख्या असून कागदोपत्री ६९ नळयोजना ४७८ हात पंप ३४० सार्वजनिक विहिरी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दाखविल्या आहेत. भारत निर्माण योजना व राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत सुमारे ३५ कामे प्रस्तावित असताना काही कामे भ्रष्टाचाराने तर काही कामे उदासीन धोरणामुळे लाखो रुपये खर्च करूनही अपूर्णच आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न याही वर्षी मार्च महिन्यापासून आर्णी तालुक्यात बिकट बनणार आहे. त्यामुळे या विभागातील केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार राजू तोडसाम व आमदार ख्वाजा बेग यांनी संबधित यंत्रणेला धारेवर धरून नागरिकांच्या या जिवनावश्यक प्रश्नाचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)