शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

पाणी वितरण नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:10 IST

पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीनंतर आता नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचारी यवतमाळ शहरात टँकरने पाणी वितरण करणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : यवतमाळातील टँकरचा पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीनंतर आता नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचारी यवतमाळ शहरात टँकरने पाणी वितरण करणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरशिवाय पर्याय नाही. शहरात सध्या नगरसेवकांच्या नेतृत्वात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र यात दुजाभाव होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या. यातून गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाणी वितरण नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचाºयांकडे देण्याचे आदेश काढले आहे. आता टँकरसोबत नगरपरिषदेचा कर्मचारी वार्डात जाऊन पाणी वितरण करणार आहे. ज्या भागात पाणी पोहोचले नाही, त्या ठिकाणी पाणी वाटप करण्याला अग्रक्रम दिला जाणार आहे. यामुळे नगरसेवकांची नागरिकांकडून होणाºया त्रासातून सुटका होणार आहे.चापडोह प्रकल्पावर ४ ते ८ आणि १३ क्रमांकाच्या प्रभागाची भिस्त होती. परंतु हा प्रकल्प कोरडा पडल्याने आता या प्रभागासाठी अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या भागासाठी दहा हजार लिटर टँकरची मागणी करण्यात आली होती. त्याचे टेंडर शुक्रवारी काढण्यात आले. परंतु दर अधिक असल्याने टँकर लावण्यासाठी पुन्हा मंजुरी घ्यावी लागणार आहे.पाणी वितरणासाठी मनुष्यबळाचा प्रश्नपाणी वितरण करण्यासाठी नगरपरिषदेकडे एवढे मनुष्यबळ आहे काय हा मोठा प्रश्न आहे. नगरपरिषदेला यासाठी चाचपणी करावी लागेल. तसेच टँकर पोहोचल्यानंतर विविध ठिकाणी भानगडी उपस्थित होतात. त्यामुळे अनेक कर्मचारी टँकरसोबत जाण्यास नकार देण्याचीही शक्यता आहे.नियंत्रण कक्षावर जिल्हा प्रशासनाचा वॉचपाणीटंचाई संदर्भात नगरपरिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास आणि सातही दिवस उघडा राहणार आहे. या ठिकाणी नागरिकांना पाण्याच्या संदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहे. या कक्षावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई