शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वितरण नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:10 IST

पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीनंतर आता नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचारी यवतमाळ शहरात टँकरने पाणी वितरण करणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : यवतमाळातील टँकरचा पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीनंतर आता नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचारी यवतमाळ शहरात टँकरने पाणी वितरण करणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरशिवाय पर्याय नाही. शहरात सध्या नगरसेवकांच्या नेतृत्वात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र यात दुजाभाव होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या. यातून गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाणी वितरण नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचाºयांकडे देण्याचे आदेश काढले आहे. आता टँकरसोबत नगरपरिषदेचा कर्मचारी वार्डात जाऊन पाणी वितरण करणार आहे. ज्या भागात पाणी पोहोचले नाही, त्या ठिकाणी पाणी वाटप करण्याला अग्रक्रम दिला जाणार आहे. यामुळे नगरसेवकांची नागरिकांकडून होणाºया त्रासातून सुटका होणार आहे.चापडोह प्रकल्पावर ४ ते ८ आणि १३ क्रमांकाच्या प्रभागाची भिस्त होती. परंतु हा प्रकल्प कोरडा पडल्याने आता या प्रभागासाठी अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या भागासाठी दहा हजार लिटर टँकरची मागणी करण्यात आली होती. त्याचे टेंडर शुक्रवारी काढण्यात आले. परंतु दर अधिक असल्याने टँकर लावण्यासाठी पुन्हा मंजुरी घ्यावी लागणार आहे.पाणी वितरणासाठी मनुष्यबळाचा प्रश्नपाणी वितरण करण्यासाठी नगरपरिषदेकडे एवढे मनुष्यबळ आहे काय हा मोठा प्रश्न आहे. नगरपरिषदेला यासाठी चाचपणी करावी लागेल. तसेच टँकर पोहोचल्यानंतर विविध ठिकाणी भानगडी उपस्थित होतात. त्यामुळे अनेक कर्मचारी टँकरसोबत जाण्यास नकार देण्याचीही शक्यता आहे.नियंत्रण कक्षावर जिल्हा प्रशासनाचा वॉचपाणीटंचाई संदर्भात नगरपरिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास आणि सातही दिवस उघडा राहणार आहे. या ठिकाणी नागरिकांना पाण्याच्या संदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहे. या कक्षावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई