शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट

By admin | Updated: June 27, 2015 00:30 IST

तालुक्यामध्ये लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली.

प्रधान सचिवांकडून पाहणी : कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस कामेकळंब : तालुक्यामध्ये लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. विशेष म्हणजे काही कामे अजुनही पूर्ण झालेली नाही. या कामाची मंगळवारी राज्याचे जलसंधारण व रोहयोचे प्रधान सचिव प्रभाकर देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी या कामात अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी झालेल्या कामाविषयी प्रखर नाराजी व्यक्त केली. सचिव प्रभाकर देशमुख यांनी तर शिंगणापूर येथील बंधाऱ्याच्या कामावर अनेक त्रुट्या काढल्या. तसेच कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च करुन जलयुक्त शिवार योजनेंतर्गंत कामे केली जात आहे. परंतु या कामांच्या उपयोगितेवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अनावश्यक ठिकाणी बंधाऱ्याची उभारणी करण्यात आल्याने त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल, याविषयी साशंकता आहे.विशेष म्हणजे शिंगणापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी तहसीलदार संतोष काकडे केली यापूर्वीच केली. त्यावेळी त्यांना बंधाऱ्याची रुंदी ५ मिटरपेक्षा कमी आढळून आली. गुणवत्ता अहवाल मागण्यात आला असता, संबधित अधिकाऱ्यांनी तो दाखविलेला नाही. तसेच नाल्याच्या पाणलोट क्षेत्राची माहितीही देण्यास अधिकारी असमर्थ ठरले. त्यामुळे बंधाऱ्याचे आवश्यक पाणलोट क्षेत्र दिसून येत नाही. शासनाचा लाखो रुपये निधी खर्च होऊन बंधाऱ्याच्या उपयोगितेविषयी तहसीलदार संतोष काकडे यांनी शंका व्यक्त केली होती. तसा अहवालही त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला होता. त्यामुळे अधिकारी स्तरावरसुध्दा बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)अध्यक्ष-सचिवांना अंधारात ठेवलेजलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आहे. तर तालुका कृषी अधिकारी के.बी.आठवले हे सचिव आहे. परंतु लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळच्यावतीने करण्यात आलेल्या कुठल्याही कामाची माहिती अध्यक्ष व सचिवांना देण्यात आली नाही. एवढेच नाही तर लोकप्रतिनिधींनाही यातून डावलण्यात आले. त्यामुळे चक्क अध्यक्ष व सचिवांना अंधारात का ठेवल्या गेले, हा प्रश्न यानिमीत्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.