शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट

By admin | Updated: June 27, 2015 00:30 IST

तालुक्यामध्ये लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली.

प्रधान सचिवांकडून पाहणी : कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस कामेकळंब : तालुक्यामध्ये लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. विशेष म्हणजे काही कामे अजुनही पूर्ण झालेली नाही. या कामाची मंगळवारी राज्याचे जलसंधारण व रोहयोचे प्रधान सचिव प्रभाकर देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी या कामात अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी झालेल्या कामाविषयी प्रखर नाराजी व्यक्त केली. सचिव प्रभाकर देशमुख यांनी तर शिंगणापूर येथील बंधाऱ्याच्या कामावर अनेक त्रुट्या काढल्या. तसेच कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च करुन जलयुक्त शिवार योजनेंतर्गंत कामे केली जात आहे. परंतु या कामांच्या उपयोगितेवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अनावश्यक ठिकाणी बंधाऱ्याची उभारणी करण्यात आल्याने त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल, याविषयी साशंकता आहे.विशेष म्हणजे शिंगणापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी तहसीलदार संतोष काकडे केली यापूर्वीच केली. त्यावेळी त्यांना बंधाऱ्याची रुंदी ५ मिटरपेक्षा कमी आढळून आली. गुणवत्ता अहवाल मागण्यात आला असता, संबधित अधिकाऱ्यांनी तो दाखविलेला नाही. तसेच नाल्याच्या पाणलोट क्षेत्राची माहितीही देण्यास अधिकारी असमर्थ ठरले. त्यामुळे बंधाऱ्याचे आवश्यक पाणलोट क्षेत्र दिसून येत नाही. शासनाचा लाखो रुपये निधी खर्च होऊन बंधाऱ्याच्या उपयोगितेविषयी तहसीलदार संतोष काकडे यांनी शंका व्यक्त केली होती. तसा अहवालही त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला होता. त्यामुळे अधिकारी स्तरावरसुध्दा बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)अध्यक्ष-सचिवांना अंधारात ठेवलेजलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आहे. तर तालुका कृषी अधिकारी के.बी.आठवले हे सचिव आहे. परंतु लघू सिंचन (जलसंधारण) उपविभाग यवतमाळच्यावतीने करण्यात आलेल्या कुठल्याही कामाची माहिती अध्यक्ष व सचिवांना देण्यात आली नाही. एवढेच नाही तर लोकप्रतिनिधींनाही यातून डावलण्यात आले. त्यामुळे चक्क अध्यक्ष व सचिवांना अंधारात का ठेवल्या गेले, हा प्रश्न यानिमीत्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.