शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

पाणी टिकविणारा ‘विश्वासनगर पॅटर्न’

By admin | Updated: May 22, 2016 02:15 IST

जिल्ह्यात धो धो पाऊस बरसतो. तरी उन्हाळ्यात थेंबही मिळत नाही. या दुष्काळी चक्रावर मात करण्यासाठी

पाणी टिकविणारा ‘विश्वासनगर पॅटर्न’यवतमाळ : जिल्ह्यात धो धो पाऊस बरसतो. तरी उन्हाळ्यात थेंबही मिळत नाही. या दुष्काळी चक्रावर मात करण्यासाठी यवतमाळचे जलमित्र नितीन खर्चे यांनी नवी शक्कल लढवली आहे. आज संपूर्ण शहरात पाणी पातळी खाली गेली आहे. मात्र विश्वासनगरात मुबलक पाणी आहे. त्यांच्या या ‘विश्वासनगर पॅटर्न’ची दखल नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. नगरपरिषदेनेही खुल्या मैदानात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या सूचना केंद्राकडे पाठविल्या आहेत. विवेकानंद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक नितीन खर्चे यांनी भूगर्भाचा चांगलाच अभ्यास केला आहे. त्यातून पाणीटंचाईवर मात करण्याचा उपाय सूचविला आहे. त्याची अंमलबजावणी त्यांनी विश्वासनगरातून सुरू केली आहे. ओपन स्पेस, मंदिर, इमारती, खेळाचे मैदान, गावठाण या ठिकाणी उताराच्या भागात खोल खड्डा खोदला जातो. हा खड्डा १५ फूट लांब १५ फूट रूंद आणि सात फूट खोल आहे. यामध्ये प्रथम मोठे दगड, नंतर छोटे दगड आणि सर्वात वर टोळगोट्यांचा थर टाक ला आहे. यामुळे पावसाचे पाणी झिरपून सरळ खाली जाते. त्या ठिकाणी ४० लाख लिटर पाणी मुुरविले जाते. यातून पाणीपातळी रिचार्ज होते. लगतच्या विहरी, बोअरवेल आणि हातपंपाला पाणी येते. याच पॅटर्नने या भागातील पाणी पातळी वाढली आहे. विश्वासनगरसह मनिहार ले-आऊट, राधाकृष्ण आश्रम, जाजू कॉलेज, भुलई, पिंपळशेंडा, श्रीरामपूर या ठिकाणी हा प्रयोग राबविण्यात आला. त्याची दखल घेत नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी त्यांना नंदूरबारमध्ये प्रयोग राबविण्यासाठी निमंत्रण दिले आहे. नगरपरिषदेच मुख्याधिकारी सुधाम धुुपे यांनी यवतमाळ शहरातील आठ मैदानात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. नगरपरिषद स्वखर्चाने हा प्रयोग सार्वजनिक विहिरी, हातपंप आणि बोअरवेलच्या ठिकाणी राबविणार आहे. इतकेच नव्हेतर, केंद्र शासनाकडे यासाठी खर्चे यांनी पत्र दिले आहे. प्रयोग पाहण्याचे निमंत्रणही जलसंपदा विभागाला दिले आहे. कमी खर्चात लोकसहभागातून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. (शहर वार्ताहर)