शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वणी शहरावरील जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:14 IST

येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पोहचणार आहे.

ठळक मुद्देकोटा संपला : नवरगाव धरणात केवळ १२ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पोहचणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून त्या पाण्याचे नळाद्वारे वितरण केले जाणार आहे.सध्या वणी शहरात नगरपरिषदेद्वारे शहरातील विविध प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची भिस्त केवळ टँकरच्या पाण्यावर आहे. रात्रंदिवस हा पाणी पुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी नागरिक भांडी घेऊन टँकरची वाट पाहत असतात. हवामान खात्याचा अंदाज चुकला आणि पाऊस लांबणीवर गेला तर वणी शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीत पाणी नसल्याने गेल्या १० दिवसांपासून न्वणी शहरात नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता नवरगाव धरणातून शेवटचे आरक्षित पाणी सोडण्यात आले आहे. ते सोमवारी रात्रीपर्यंत वणीपर्यंत पोहचेल. त्यानंतर नळयोजनेद्वारे त्याचे वितरण केले जाईल. आजच्या घडीला नवरगाव धरणात ११.९५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. वणी शहराची तहान भागविणारी निर्गुडा नदी कोरडी पडली आहे. शहराची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी वणीसाठी २६ डिसेंबर ते १० जून या काळासाठी २.६२ दलघमी पाणी आरक्षित केले होते. १२ टप्प्यात हे पाणी देण्याच्या सूचनाही त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या.नवरगाव धरणात शिल्लक साठ्यापैैकी १.७५ दलघमी पाणीसाठा मारेगाव शहरासाठी राखीव आहे, तर जिल्हापरिषदेतर्फे ग्रामपंचायती १.५७ दलघमी पाणीसाठा आरक्षित आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रयत्न केल्यास हे आरक्षित पाणीदेखील वणी शहरासाठी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच वणी शहरातील पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले असून लवकर पाऊस न आल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.वितरण व्यवस्थेत नियोजन नाहीनवरगाव धरणातून पाणी सोडल्यानंतर ते निर्गुडा नदीत १० ते १२ दिवस साठून रहायचे. मात्र पाणी वितरणाचे कंत्राट नव्याने एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराकडून वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील काही भागात धो-धो पाणी तर काही भागात पाणीच पोहचत नाही. नदीतील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीत पाणीच टिकून राहत नाही.राजकीय पक्षांच्या टँकरसेवेने दिलासावणी शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता, वणी नगरपालिकेने शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आवश्यक तेवढे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी मारामार सुरू होती. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. रात्रंदिवस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच राष्ट्रवादी महिला आघाडी, शिवसेना आदींनी देखील टँकरसेवा सुरू केली आहे. त्यामुळे वणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई