शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वणी शहरावरील जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:14 IST

येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पोहचणार आहे.

ठळक मुद्देकोटा संपला : नवरगाव धरणात केवळ १२ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पोहचणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून त्या पाण्याचे नळाद्वारे वितरण केले जाणार आहे.सध्या वणी शहरात नगरपरिषदेद्वारे शहरातील विविध प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची भिस्त केवळ टँकरच्या पाण्यावर आहे. रात्रंदिवस हा पाणी पुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी नागरिक भांडी घेऊन टँकरची वाट पाहत असतात. हवामान खात्याचा अंदाज चुकला आणि पाऊस लांबणीवर गेला तर वणी शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीत पाणी नसल्याने गेल्या १० दिवसांपासून न्वणी शहरात नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता नवरगाव धरणातून शेवटचे आरक्षित पाणी सोडण्यात आले आहे. ते सोमवारी रात्रीपर्यंत वणीपर्यंत पोहचेल. त्यानंतर नळयोजनेद्वारे त्याचे वितरण केले जाईल. आजच्या घडीला नवरगाव धरणात ११.९५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. वणी शहराची तहान भागविणारी निर्गुडा नदी कोरडी पडली आहे. शहराची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी वणीसाठी २६ डिसेंबर ते १० जून या काळासाठी २.६२ दलघमी पाणी आरक्षित केले होते. १२ टप्प्यात हे पाणी देण्याच्या सूचनाही त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या.नवरगाव धरणात शिल्लक साठ्यापैैकी १.७५ दलघमी पाणीसाठा मारेगाव शहरासाठी राखीव आहे, तर जिल्हापरिषदेतर्फे ग्रामपंचायती १.५७ दलघमी पाणीसाठा आरक्षित आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रयत्न केल्यास हे आरक्षित पाणीदेखील वणी शहरासाठी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच वणी शहरातील पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले असून लवकर पाऊस न आल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.वितरण व्यवस्थेत नियोजन नाहीनवरगाव धरणातून पाणी सोडल्यानंतर ते निर्गुडा नदीत १० ते १२ दिवस साठून रहायचे. मात्र पाणी वितरणाचे कंत्राट नव्याने एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कंत्राटदाराकडून वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील काही भागात धो-धो पाणी तर काही भागात पाणीच पोहचत नाही. नदीतील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीत पाणीच टिकून राहत नाही.राजकीय पक्षांच्या टँकरसेवेने दिलासावणी शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता, वणी नगरपालिकेने शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आवश्यक तेवढे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी मारामार सुरू होती. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. रात्रंदिवस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच राष्ट्रवादी महिला आघाडी, शिवसेना आदींनी देखील टँकरसेवा सुरू केली आहे. त्यामुळे वणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई