शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कालव्यात पाणी, पण शेती कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:42 IST

सिंचन क्षेत्रात मागासलेल्या मारेगाव तालुक्यात महत्वकांक्षी बेंबळा प्रकल्पाचे पाण्याचा सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षीत धोरणाने तालुक्यातील मुख्य कालव्यालगत उपकालवे, वितरीका, पाटसऱ्यांची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी बेंबळाचे सिंचन दिवास्वप्नच ठरू पाहत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हिरमुसले : बेंबळाचे सिंचन शेतकऱ्यांसाठी ठरले दिवास्वप्न

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : सिंचन क्षेत्रात मागासलेल्या मारेगाव तालुक्यात महत्वकांक्षी बेंबळा प्रकल्पाचे पाण्याचा सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षीत धोरणाने तालुक्यातील मुख्य कालव्यालगत उपकालवे, वितरीका, पाटसऱ्यांची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी बेंबळाचे सिंचन दिवास्वप्नच ठरू पाहत आहे.बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा नदीवर मोठे धरण बांधण्यात आले. या धरणाची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. या धरणाचा लाभ मारेगाव तालुक्यातील कुंभा-मार्डी सर्कलमधील २३ गावातील नऊ हजार हेक्टरला होण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या एकुण ११३ किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्याचा शेवट मार्डी लगतच्या चोपण गावाजवळ होतो. तालुक्यात कुंभा-मार्डी सर्कलमध्ये ९७ ते ११३ अशा १६ किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले. तथापि ९७ ते १०० किलोमीटर असे केवळ तीन किलोमीटरमध्ये उपकालव्यांची, वितरीकेची कामे करण्यात आली.उर्वरित १३ किलोमीटरमधील उपकालवे, वितरीका, पाटसऱ्यांची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. कालव्याला भरपूर पाणी येऊनही लाभ क्षेत्रातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. शासनाच्या दुर्लक्षीत धोरणानेच या परिसरातील कामांना विलंब होत असल्याचा आरोप होत आहे. नुकतेच १२ नोव्हेंबरला या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याद्वारे पाणी ११३ किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. पण मुख्य कालव्यालगत उपकालवे, वितरीका, पाटसºया ही कामे झालीच नसल्याने शेतकरी शेताजवळ आलेल्या पाण्याचा उपयोग करू शकत नाही. कालव्यावर इंजिन लाऊन काही शेतकरी सिंचन करीत आहे. गेल्या एक वर्षापासून या परिसरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी उर्वरित कामे अविलंब पूर्ण करण्याची मागणी करीत असूनसुद्धा शासनाला जाग आली नसल्याचे दिसून येते, तर प्रकल्पाचे अधिकारीसुद्धा हतबल झाले आहेत. शासन जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यावधी खर्च करीत असताना शेतकºयांसाठी वरदान ठरणाºया या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यासाठी शासनाकडे निधी नसावा, याचे आश्चर्य वाटते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई