शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात पाणी, पण शेती कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:42 IST

सिंचन क्षेत्रात मागासलेल्या मारेगाव तालुक्यात महत्वकांक्षी बेंबळा प्रकल्पाचे पाण्याचा सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षीत धोरणाने तालुक्यातील मुख्य कालव्यालगत उपकालवे, वितरीका, पाटसऱ्यांची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी बेंबळाचे सिंचन दिवास्वप्नच ठरू पाहत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हिरमुसले : बेंबळाचे सिंचन शेतकऱ्यांसाठी ठरले दिवास्वप्न

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : सिंचन क्षेत्रात मागासलेल्या मारेगाव तालुक्यात महत्वकांक्षी बेंबळा प्रकल्पाचे पाण्याचा सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षीत धोरणाने तालुक्यातील मुख्य कालव्यालगत उपकालवे, वितरीका, पाटसऱ्यांची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने लाभ क्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी बेंबळाचे सिंचन दिवास्वप्नच ठरू पाहत आहे.बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा नदीवर मोठे धरण बांधण्यात आले. या धरणाची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. या धरणाचा लाभ मारेगाव तालुक्यातील कुंभा-मार्डी सर्कलमधील २३ गावातील नऊ हजार हेक्टरला होण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या एकुण ११३ किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्याचा शेवट मार्डी लगतच्या चोपण गावाजवळ होतो. तालुक्यात कुंभा-मार्डी सर्कलमध्ये ९७ ते ११३ अशा १६ किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले. तथापि ९७ ते १०० किलोमीटर असे केवळ तीन किलोमीटरमध्ये उपकालव्यांची, वितरीकेची कामे करण्यात आली.उर्वरित १३ किलोमीटरमधील उपकालवे, वितरीका, पाटसऱ्यांची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. कालव्याला भरपूर पाणी येऊनही लाभ क्षेत्रातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. शासनाच्या दुर्लक्षीत धोरणानेच या परिसरातील कामांना विलंब होत असल्याचा आरोप होत आहे. नुकतेच १२ नोव्हेंबरला या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याद्वारे पाणी ११३ किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. पण मुख्य कालव्यालगत उपकालवे, वितरीका, पाटसºया ही कामे झालीच नसल्याने शेतकरी शेताजवळ आलेल्या पाण्याचा उपयोग करू शकत नाही. कालव्यावर इंजिन लाऊन काही शेतकरी सिंचन करीत आहे. गेल्या एक वर्षापासून या परिसरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी उर्वरित कामे अविलंब पूर्ण करण्याची मागणी करीत असूनसुद्धा शासनाला जाग आली नसल्याचे दिसून येते, तर प्रकल्पाचे अधिकारीसुद्धा हतबल झाले आहेत. शासन जलयुक्त शिवार योजनेवर कोट्यावधी खर्च करीत असताना शेतकºयांसाठी वरदान ठरणाºया या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यासाठी शासनाकडे निधी नसावा, याचे आश्चर्य वाटते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई