शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

पाणी वाटपाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:28 IST

शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.

ठळक मुद्देगैरवापराविरूद्ध बडगा : गरजवंतापर्यंत टँकर पोहोचलेच नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.यवतमाळात यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी नगरपरिषदेने टँकर सुरू केले. तरीही नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहे. शहरात २८ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दोन टँकर पाठविण्यात येतात. एका टँकरला दररोज सहा फेºया मारायच्या असतात. यात दोन टँकरच्या एका प्रभागात १२ फेºया होतात. पाणी वितरणासाठी टँकर मालकाला दररोज प्रत्येकी दोन हजार ४५० रूपये देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार ६४ टँकरने पाणी वितरणासाठी पालिकेला दररोज एक लाख ५६ हजार ८०० रूपये मोजावे लागतात.पाणी उपलब्ध करण्यासाठी ७९ सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्यात आला. त्यासाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च झाला. या विहिरींवरून टँकर पाणी भरतात. सोबतच गोखी प्रकल्पावरूनही पाणी घेतले जाते. शहरातील विहिरी आणि गोखीतील पाणी भरून ते प्रभागात वाटले जाते. यात दिवसभरात सर्व टँकरच्या ३८४ फेºया होतात. या ३८४ फेºयांव्दारे दररोज ११ लाख ५२ हजार लिटर पाणी वितरित केले जाते. एवढे मुबलक पाणी वाटप होऊनही गरजवंतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.या तक्रारींचे वास्तव जाणून घेण्यासाठी आता मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी २८ प्रभागांचे चार झोन पाडून पाणी वितरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चार अभियंत्यांना पाणी वाटप व्यवस्थित होती काही, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यात प्रत्येक अभियंत्याकडे सात प्रभागांची चौकशी सोपविण्यात आली. त्यांच्या सोबतीला पाच आरोग्य निरीक्षक आणि २८ वॉर्ड शिपाई नियुक्त करण्यात आले आहे.आता पाणी वाटपाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचते काय, कुठल्या भागात पाणी मिळाले आणि कुठल्या भागात पाणीच मिळाले नाही, त्याची कारणे काय, टँकरच्या खरोखर किती फेºया होतात, पाणी शुद्ध होते काय, याची तपासणी केली जात आहे. ज्या विहिरींचा गाळ उपसा करण्यात आला, त्या विहिरींची सध्याची स्थिती काय, पाणी खोल गेले काय, विहिरीतील गाळ खरच उपसला गेला का, यासह अनेक विषयाची माहिती चौकशी चमू गोळा करीत आहे. चौकशी झाल्यानंतर मुख्याधिकाºयांना अहवाल सोपविला जाणार आहे.अशा आहेत गंभीर तक्रारीविहीर अधिग्रहित करण्यापूर्वी पाण्याचे बिल काढण्यात आले. विहिरी स्वच्छ न करताच काहींना देयक देण्यात आले. काही विहिरींचा तर गाळही काढण्यात आला नाही. विहिरीतील मोटरपंप परस्पर बदलवले जातात. काही भागात टँकर पोहोचतच नाही. पाणी वाटपाच्या रजिस्टरवर तशा नोंदीही नाही. पिंपळगाव प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना पाणीच मिळाले नाही. झोपडपट्टीला वगळण्यात आले. या संदर्भात अभियंता उके यांनी पाहणी केली. त्यांना पाणी वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आले. अद्यापही या भागात टँकर पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता चौकशीअंती कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.पाण्याचा खर्च६४ टँकर, दररोज प्रती टँकर २४५० रूपये२५ सबमर्शिबल पंप, २००० रूपये प्रती दिवस७९ विहिरींची स्वच्छता, ६९ लाखांचा खर्चफ्लोटिंगपंप १४ लाख रुपयांचा खर्चगोखीतून पाणी उचलण्यासाठी सहा लाख ४८ हजारपाच लाख महावितरणकडे अनामत ठेवलोडींगसाठी एक लाख ९७ हजार भरलेप्रशासनाने पाणी वाटपाची आणि विहिरींच्या जलस्त्रोताची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अहवालानुसार कारवाई होईल.- अनिल अढागळेमुख्याधिकारी, न.प. यवतमाळ