शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाटपाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:28 IST

शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.

ठळक मुद्देगैरवापराविरूद्ध बडगा : गरजवंतापर्यंत टँकर पोहोचलेच नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.यवतमाळात यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी नगरपरिषदेने टँकर सुरू केले. तरीही नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहे. शहरात २८ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दोन टँकर पाठविण्यात येतात. एका टँकरला दररोज सहा फेºया मारायच्या असतात. यात दोन टँकरच्या एका प्रभागात १२ फेºया होतात. पाणी वितरणासाठी टँकर मालकाला दररोज प्रत्येकी दोन हजार ४५० रूपये देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार ६४ टँकरने पाणी वितरणासाठी पालिकेला दररोज एक लाख ५६ हजार ८०० रूपये मोजावे लागतात.पाणी उपलब्ध करण्यासाठी ७९ सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्यात आला. त्यासाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च झाला. या विहिरींवरून टँकर पाणी भरतात. सोबतच गोखी प्रकल्पावरूनही पाणी घेतले जाते. शहरातील विहिरी आणि गोखीतील पाणी भरून ते प्रभागात वाटले जाते. यात दिवसभरात सर्व टँकरच्या ३८४ फेºया होतात. या ३८४ फेºयांव्दारे दररोज ११ लाख ५२ हजार लिटर पाणी वितरित केले जाते. एवढे मुबलक पाणी वाटप होऊनही गरजवंतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.या तक्रारींचे वास्तव जाणून घेण्यासाठी आता मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी २८ प्रभागांचे चार झोन पाडून पाणी वितरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चार अभियंत्यांना पाणी वाटप व्यवस्थित होती काही, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यात प्रत्येक अभियंत्याकडे सात प्रभागांची चौकशी सोपविण्यात आली. त्यांच्या सोबतीला पाच आरोग्य निरीक्षक आणि २८ वॉर्ड शिपाई नियुक्त करण्यात आले आहे.आता पाणी वाटपाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचते काय, कुठल्या भागात पाणी मिळाले आणि कुठल्या भागात पाणीच मिळाले नाही, त्याची कारणे काय, टँकरच्या खरोखर किती फेºया होतात, पाणी शुद्ध होते काय, याची तपासणी केली जात आहे. ज्या विहिरींचा गाळ उपसा करण्यात आला, त्या विहिरींची सध्याची स्थिती काय, पाणी खोल गेले काय, विहिरीतील गाळ खरच उपसला गेला का, यासह अनेक विषयाची माहिती चौकशी चमू गोळा करीत आहे. चौकशी झाल्यानंतर मुख्याधिकाºयांना अहवाल सोपविला जाणार आहे.अशा आहेत गंभीर तक्रारीविहीर अधिग्रहित करण्यापूर्वी पाण्याचे बिल काढण्यात आले. विहिरी स्वच्छ न करताच काहींना देयक देण्यात आले. काही विहिरींचा तर गाळही काढण्यात आला नाही. विहिरीतील मोटरपंप परस्पर बदलवले जातात. काही भागात टँकर पोहोचतच नाही. पाणी वाटपाच्या रजिस्टरवर तशा नोंदीही नाही. पिंपळगाव प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना पाणीच मिळाले नाही. झोपडपट्टीला वगळण्यात आले. या संदर्भात अभियंता उके यांनी पाहणी केली. त्यांना पाणी वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आले. अद्यापही या भागात टँकर पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता चौकशीअंती कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.पाण्याचा खर्च६४ टँकर, दररोज प्रती टँकर २४५० रूपये२५ सबमर्शिबल पंप, २००० रूपये प्रती दिवस७९ विहिरींची स्वच्छता, ६९ लाखांचा खर्चफ्लोटिंगपंप १४ लाख रुपयांचा खर्चगोखीतून पाणी उचलण्यासाठी सहा लाख ४८ हजारपाच लाख महावितरणकडे अनामत ठेवलोडींगसाठी एक लाख ९७ हजार भरलेप्रशासनाने पाणी वाटपाची आणि विहिरींच्या जलस्त्रोताची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अहवालानुसार कारवाई होईल.- अनिल अढागळेमुख्याधिकारी, न.प. यवतमाळ