शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाटपाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:28 IST

शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.

ठळक मुद्देगैरवापराविरूद्ध बडगा : गरजवंतापर्यंत टँकर पोहोचलेच नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.यवतमाळात यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी नगरपरिषदेने टँकर सुरू केले. तरीही नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहे. शहरात २८ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दोन टँकर पाठविण्यात येतात. एका टँकरला दररोज सहा फेºया मारायच्या असतात. यात दोन टँकरच्या एका प्रभागात १२ फेºया होतात. पाणी वितरणासाठी टँकर मालकाला दररोज प्रत्येकी दोन हजार ४५० रूपये देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार ६४ टँकरने पाणी वितरणासाठी पालिकेला दररोज एक लाख ५६ हजार ८०० रूपये मोजावे लागतात.पाणी उपलब्ध करण्यासाठी ७९ सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्यात आला. त्यासाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च झाला. या विहिरींवरून टँकर पाणी भरतात. सोबतच गोखी प्रकल्पावरूनही पाणी घेतले जाते. शहरातील विहिरी आणि गोखीतील पाणी भरून ते प्रभागात वाटले जाते. यात दिवसभरात सर्व टँकरच्या ३८४ फेºया होतात. या ३८४ फेºयांव्दारे दररोज ११ लाख ५२ हजार लिटर पाणी वितरित केले जाते. एवढे मुबलक पाणी वाटप होऊनही गरजवंतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.या तक्रारींचे वास्तव जाणून घेण्यासाठी आता मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी २८ प्रभागांचे चार झोन पाडून पाणी वितरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चार अभियंत्यांना पाणी वाटप व्यवस्थित होती काही, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यात प्रत्येक अभियंत्याकडे सात प्रभागांची चौकशी सोपविण्यात आली. त्यांच्या सोबतीला पाच आरोग्य निरीक्षक आणि २८ वॉर्ड शिपाई नियुक्त करण्यात आले आहे.आता पाणी वाटपाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचते काय, कुठल्या भागात पाणी मिळाले आणि कुठल्या भागात पाणीच मिळाले नाही, त्याची कारणे काय, टँकरच्या खरोखर किती फेºया होतात, पाणी शुद्ध होते काय, याची तपासणी केली जात आहे. ज्या विहिरींचा गाळ उपसा करण्यात आला, त्या विहिरींची सध्याची स्थिती काय, पाणी खोल गेले काय, विहिरीतील गाळ खरच उपसला गेला का, यासह अनेक विषयाची माहिती चौकशी चमू गोळा करीत आहे. चौकशी झाल्यानंतर मुख्याधिकाºयांना अहवाल सोपविला जाणार आहे.अशा आहेत गंभीर तक्रारीविहीर अधिग्रहित करण्यापूर्वी पाण्याचे बिल काढण्यात आले. विहिरी स्वच्छ न करताच काहींना देयक देण्यात आले. काही विहिरींचा तर गाळही काढण्यात आला नाही. विहिरीतील मोटरपंप परस्पर बदलवले जातात. काही भागात टँकर पोहोचतच नाही. पाणी वाटपाच्या रजिस्टरवर तशा नोंदीही नाही. पिंपळगाव प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना पाणीच मिळाले नाही. झोपडपट्टीला वगळण्यात आले. या संदर्भात अभियंता उके यांनी पाहणी केली. त्यांना पाणी वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आले. अद्यापही या भागात टँकर पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता चौकशीअंती कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.पाण्याचा खर्च६४ टँकर, दररोज प्रती टँकर २४५० रूपये२५ सबमर्शिबल पंप, २००० रूपये प्रती दिवस७९ विहिरींची स्वच्छता, ६९ लाखांचा खर्चफ्लोटिंगपंप १४ लाख रुपयांचा खर्चगोखीतून पाणी उचलण्यासाठी सहा लाख ४८ हजारपाच लाख महावितरणकडे अनामत ठेवलोडींगसाठी एक लाख ९७ हजार भरलेप्रशासनाने पाणी वाटपाची आणि विहिरींच्या जलस्त्रोताची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अहवालानुसार कारवाई होईल.- अनिल अढागळेमुख्याधिकारी, न.प. यवतमाळ