शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:37 IST

पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत.

ठळक मुद्देटँकर चालकांची मनमानी : नियम मोडत असूनही ३५ हजार व्याकूळ लोक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाकडे टँकर उपलब्ध होणे शक्य नसल्याने खासगी ठेकेदारांमार्फत हे टँकर चालविले जातात. मात्र ‘लोकमत’चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या टँकर मालक-चालकांची मनमानी उघड झाली. टँकरवाले सर्रास नियम मोडून पुढे जात आहेत. गावकऱ्यांना ही बाब माहीत आहे. तरीही ड्रमभर नको पण निदान बकेटभर तरी पाणी मिळते, या आशेपायी ते टँकर चालकांच्या नियमबाह्य वर्तनाबाबत गप्प आहेत. अडला नारायण धरी गाढवाचे पाय, अशी गावकऱ्यांची अवस्था आहे. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही प्रचंड गाफिल आहे. टँकरची फेरी कुठे सुरू आहे, कोठून पाणी भरले, कोणत्या गावात वाटप केले, हे कळण्यासाठी वाहनावर जीपीएस यंत्र बसविणे बंधनकारक आहे. मात्र ‘लोकमत’च्या पाहणीत अनेक टँकरवर जीपीएस यंत्र आढळले नाही. काही टँकरवर हे यंत्र असले तरी ते कार्यान्वित नाही. त्यामुळे प्रशासनच जाणीवपूर्वक टँकरकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यात टँकर चालक आणि प्रशासनातील कर्मचाºयांचेही साटेलोटे असण्याची शक्यता आहे. टँकर शासकीय आहे की खासगी हे कळण्यासाठी टँकरवर बॅनर लावणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात कोणत्याही टँकरवर बॅनरचा पत्ता नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या गावात पाणी वाटपाची जबाबदारी टँकर चालकाला दिली गेली आहे, त्या गावातील नामनिर्देशित महिलांची स्वाक्षरी दररोज लॉगबुकवर घेणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश गावांमधील टँकर चालकांकडे असलेले लॉगबुक कोरे करकरीत आढळले. गावातील महिलांना विचारले असता कधीच आमच्या सह्या घेतल्या जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व परिस्थितीवरुन शासकीय टँकरच्या नावाखाली काही गावांमध्ये पाण्याचा धंदा सुरू असण्याची भीती आहे. गावकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे.या गावांची तहान टँकरवरचयवतमाळ - पांढरी, इचोरी, किटा, आर्णी - सुधाकरनगर, नेर - खरडगाव, आजंती, घुई, बाभूळगाव - फत्तेपूर, सारफळी, दारव्हा - भांडेगाव, करजगाव, पुसद - बाळवाडी, पन्हाळा, मारवाडी, लोहरा खुर्द., म्हैसमाळ, वडसद, बुटी ई., सावरगाव बंगला, लोहरा ई., महागाव - फुलसावंगी, घाटंजी - चांदापूर, निंबर्डा.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई