शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:37 IST

पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत.

ठळक मुद्देटँकर चालकांची मनमानी : नियम मोडत असूनही ३५ हजार व्याकूळ लोक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाकडे टँकर उपलब्ध होणे शक्य नसल्याने खासगी ठेकेदारांमार्फत हे टँकर चालविले जातात. मात्र ‘लोकमत’चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या टँकर मालक-चालकांची मनमानी उघड झाली. टँकरवाले सर्रास नियम मोडून पुढे जात आहेत. गावकऱ्यांना ही बाब माहीत आहे. तरीही ड्रमभर नको पण निदान बकेटभर तरी पाणी मिळते, या आशेपायी ते टँकर चालकांच्या नियमबाह्य वर्तनाबाबत गप्प आहेत. अडला नारायण धरी गाढवाचे पाय, अशी गावकऱ्यांची अवस्था आहे. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही प्रचंड गाफिल आहे. टँकरची फेरी कुठे सुरू आहे, कोठून पाणी भरले, कोणत्या गावात वाटप केले, हे कळण्यासाठी वाहनावर जीपीएस यंत्र बसविणे बंधनकारक आहे. मात्र ‘लोकमत’च्या पाहणीत अनेक टँकरवर जीपीएस यंत्र आढळले नाही. काही टँकरवर हे यंत्र असले तरी ते कार्यान्वित नाही. त्यामुळे प्रशासनच जाणीवपूर्वक टँकरकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यात टँकर चालक आणि प्रशासनातील कर्मचाºयांचेही साटेलोटे असण्याची शक्यता आहे. टँकर शासकीय आहे की खासगी हे कळण्यासाठी टँकरवर बॅनर लावणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात कोणत्याही टँकरवर बॅनरचा पत्ता नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या गावात पाणी वाटपाची जबाबदारी टँकर चालकाला दिली गेली आहे, त्या गावातील नामनिर्देशित महिलांची स्वाक्षरी दररोज लॉगबुकवर घेणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश गावांमधील टँकर चालकांकडे असलेले लॉगबुक कोरे करकरीत आढळले. गावातील महिलांना विचारले असता कधीच आमच्या सह्या घेतल्या जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व परिस्थितीवरुन शासकीय टँकरच्या नावाखाली काही गावांमध्ये पाण्याचा धंदा सुरू असण्याची भीती आहे. गावकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे.या गावांची तहान टँकरवरचयवतमाळ - पांढरी, इचोरी, किटा, आर्णी - सुधाकरनगर, नेर - खरडगाव, आजंती, घुई, बाभूळगाव - फत्तेपूर, सारफळी, दारव्हा - भांडेगाव, करजगाव, पुसद - बाळवाडी, पन्हाळा, मारवाडी, लोहरा खुर्द., म्हैसमाळ, वडसद, बुटी ई., सावरगाव बंगला, लोहरा ई., महागाव - फुलसावंगी, घाटंजी - चांदापूर, निंबर्डा.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई