शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:37 IST

पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत.

ठळक मुद्देटँकर चालकांची मनमानी : नियम मोडत असूनही ३५ हजार व्याकूळ लोक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाकडे टँकर उपलब्ध होणे शक्य नसल्याने खासगी ठेकेदारांमार्फत हे टँकर चालविले जातात. मात्र ‘लोकमत’चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या टँकर मालक-चालकांची मनमानी उघड झाली. टँकरवाले सर्रास नियम मोडून पुढे जात आहेत. गावकऱ्यांना ही बाब माहीत आहे. तरीही ड्रमभर नको पण निदान बकेटभर तरी पाणी मिळते, या आशेपायी ते टँकर चालकांच्या नियमबाह्य वर्तनाबाबत गप्प आहेत. अडला नारायण धरी गाढवाचे पाय, अशी गावकऱ्यांची अवस्था आहे. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही प्रचंड गाफिल आहे. टँकरची फेरी कुठे सुरू आहे, कोठून पाणी भरले, कोणत्या गावात वाटप केले, हे कळण्यासाठी वाहनावर जीपीएस यंत्र बसविणे बंधनकारक आहे. मात्र ‘लोकमत’च्या पाहणीत अनेक टँकरवर जीपीएस यंत्र आढळले नाही. काही टँकरवर हे यंत्र असले तरी ते कार्यान्वित नाही. त्यामुळे प्रशासनच जाणीवपूर्वक टँकरकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यात टँकर चालक आणि प्रशासनातील कर्मचाºयांचेही साटेलोटे असण्याची शक्यता आहे. टँकर शासकीय आहे की खासगी हे कळण्यासाठी टँकरवर बॅनर लावणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात कोणत्याही टँकरवर बॅनरचा पत्ता नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या गावात पाणी वाटपाची जबाबदारी टँकर चालकाला दिली गेली आहे, त्या गावातील नामनिर्देशित महिलांची स्वाक्षरी दररोज लॉगबुकवर घेणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश गावांमधील टँकर चालकांकडे असलेले लॉगबुक कोरे करकरीत आढळले. गावातील महिलांना विचारले असता कधीच आमच्या सह्या घेतल्या जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व परिस्थितीवरुन शासकीय टँकरच्या नावाखाली काही गावांमध्ये पाण्याचा धंदा सुरू असण्याची भीती आहे. गावकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे.या गावांची तहान टँकरवरचयवतमाळ - पांढरी, इचोरी, किटा, आर्णी - सुधाकरनगर, नेर - खरडगाव, आजंती, घुई, बाभूळगाव - फत्तेपूर, सारफळी, दारव्हा - भांडेगाव, करजगाव, पुसद - बाळवाडी, पन्हाळा, मारवाडी, लोहरा खुर्द., म्हैसमाळ, वडसद, बुटी ई., सावरगाव बंगला, लोहरा ई., महागाव - फुलसावंगी, घाटंजी - चांदापूर, निंबर्डा.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई