शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कृत्रिम टंचाईवर १७ भरारी पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे.

ठळक मुद्देकलेक्टरची बैठक : बोगस बियाणे, जादा दराने विक्रीवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोयाबीनसह अन्य बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने होणारी विक्री रोखणे, बोगस बियाणे थांबविणे आदी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाची १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सोमवारी येथे बैठकीत दिले.यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे. प्रमुख वितरकांची गोदामे बियाण्यांनी भरली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या सर्व मुद्यांवर ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाशझोत टाकून वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यां यवतमाळातील व ग्रामीणमधील प्रमुख वितरकांचा पर्दाफाश केला. ही वृत्तमालिका कृषी आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने पुण्यातूनही येथील कृषी अधिकाºयांची झाडाझडती घेतली गेली.या वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सर्व सोळाही तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. त्यात खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध मुद्यावर चर्चा केली गेली. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर वॉच ठेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. एमआरपी पेक्षा जादा दराने विकणाऱ्यांनाही दणका देण्याची सूचना केली गेली. सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बियाणे व खतांच्या मागणी व पुरवठ्यात तफावत येणार नाही या दृष्टीने निरीक्षण व नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले गेले. वणीपासून उमरखेडपर्यंत बियाणे व खतातील गोंधळ थांबविण्यासाठी १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली.फवारणी विषबाधेबाबतही सावधगिरीतीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन अनेक शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कीटकनाशक फवारणीच्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देश देण्यात आले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कुण्या शेतकºयाला विषबाधा झाल्यास लगेच तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाºयांना याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या गेल्या. या बैठकीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. कृषी अधिकाºयांनी बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईचे मूळ शोधण्याची व कंपन्यांसह विविध ठिकाणावरून माहिती मागविण्याची व्युहरचनाही केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :agricultureशेती