शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

वरोरा, कळमना बोगस बियाणांचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:53 IST

पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देगुजरातमध्ये निर्मिती : नफेखोरीच्या लालसेतून शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. उत्पादनाची कोणतीही खात्री नसलेले हे वाण कोणत्याही प्रकारची पावती न देता शेतकऱ्यांना विकले जात असून शेतकरीही भाबडेपणाने ते विकत घेत आहेत.यातून फसवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्याला कोणतीही कारवाई करता येऊ नये, यासाठी बनावट बियाणांचे विक्रेते बियाणे विकल्याचा कोणताही पुरावा मागे सोडत नाहीत. यातून आजवर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाची बियाणांची या तस्करीवर करडी नजर असली तरी कृषी विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून राजरोसपणे बियाणांची तस्करी सुरूच आहे. यापूर्वी मारेगाव येथील एका अण्णाला बोगस बियाणे प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता मात्र थेट आंध्रातील एजंटच या भागात सक्रिय झाले असून कोणतीही मान्यता नसलेले हे बियाणे मान्यताप्राप्त बियाणांच्या तुलनेत कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकण्यात येत आहेत. या बियाणांना आंध्रप्रदेशात मान्यता आहे. मात्र महाराष्ट्रात या बियाणांवर बॅन आणण्यात आले आहेत. असे असले तरी या बियाणांवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरीदेखिल या बियाणे लागवडीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातही अशा प्रकारचे बनावट बियाणे विकल्या गेल्याचा कृषी विभागाला संशय आहे. गंभीर बाब ही की, बीजी थ्री म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे वाण पर्यावरण व शेतीसाठी घातक असताना शेतकरी या बियाणांची लागवड शेतात करताना दिसतात. या बियाणांच्या झाडांवर थेट तणनाशक फवारले तरी झाडाला कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे निंदणाच्या खर्चाची बचत होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव असला तरी या बियाणाला अद्याप कोणतीही परवानगी नसून त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.बोंडअळीचे शेतकऱ्यांमध्ये अद्यापही धास्तीमागीलवर्षी वणी उपविभागात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी विषप्रयोग केले. परंतु हा विषप्रयोग शेतकऱ्यांवरच उलटला. यंदाही शेतकऱ्यांच्या मनात बोंडअळीची धास्ती असून पुन्हा ही बोंडअळी कपाशी उद्ध्वस्त करेल काय, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहेत.

टॅग्स :cottonकापूस