शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वरोरा, कळमना बोगस बियाणांचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:53 IST

पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देगुजरातमध्ये निर्मिती : नफेखोरीच्या लालसेतून शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. उत्पादनाची कोणतीही खात्री नसलेले हे वाण कोणत्याही प्रकारची पावती न देता शेतकऱ्यांना विकले जात असून शेतकरीही भाबडेपणाने ते विकत घेत आहेत.यातून फसवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्याला कोणतीही कारवाई करता येऊ नये, यासाठी बनावट बियाणांचे विक्रेते बियाणे विकल्याचा कोणताही पुरावा मागे सोडत नाहीत. यातून आजवर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाची बियाणांची या तस्करीवर करडी नजर असली तरी कृषी विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून राजरोसपणे बियाणांची तस्करी सुरूच आहे. यापूर्वी मारेगाव येथील एका अण्णाला बोगस बियाणे प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता मात्र थेट आंध्रातील एजंटच या भागात सक्रिय झाले असून कोणतीही मान्यता नसलेले हे बियाणे मान्यताप्राप्त बियाणांच्या तुलनेत कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकण्यात येत आहेत. या बियाणांना आंध्रप्रदेशात मान्यता आहे. मात्र महाराष्ट्रात या बियाणांवर बॅन आणण्यात आले आहेत. असे असले तरी या बियाणांवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरीदेखिल या बियाणे लागवडीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातही अशा प्रकारचे बनावट बियाणे विकल्या गेल्याचा कृषी विभागाला संशय आहे. गंभीर बाब ही की, बीजी थ्री म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे वाण पर्यावरण व शेतीसाठी घातक असताना शेतकरी या बियाणांची लागवड शेतात करताना दिसतात. या बियाणांच्या झाडांवर थेट तणनाशक फवारले तरी झाडाला कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे निंदणाच्या खर्चाची बचत होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव असला तरी या बियाणाला अद्याप कोणतीही परवानगी नसून त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.बोंडअळीचे शेतकऱ्यांमध्ये अद्यापही धास्तीमागीलवर्षी वणी उपविभागात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी विषप्रयोग केले. परंतु हा विषप्रयोग शेतकऱ्यांवरच उलटला. यंदाही शेतकऱ्यांच्या मनात बोंडअळीची धास्ती असून पुन्हा ही बोंडअळी कपाशी उद्ध्वस्त करेल काय, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहेत.

टॅग्स :cottonकापूस