शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वरोरा, कळमना बोगस बियाणांचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:53 IST

पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देगुजरातमध्ये निर्मिती : नफेखोरीच्या लालसेतून शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. उत्पादनाची कोणतीही खात्री नसलेले हे वाण कोणत्याही प्रकारची पावती न देता शेतकऱ्यांना विकले जात असून शेतकरीही भाबडेपणाने ते विकत घेत आहेत.यातून फसवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्याला कोणतीही कारवाई करता येऊ नये, यासाठी बनावट बियाणांचे विक्रेते बियाणे विकल्याचा कोणताही पुरावा मागे सोडत नाहीत. यातून आजवर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाची बियाणांची या तस्करीवर करडी नजर असली तरी कृषी विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून राजरोसपणे बियाणांची तस्करी सुरूच आहे. यापूर्वी मारेगाव येथील एका अण्णाला बोगस बियाणे प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता मात्र थेट आंध्रातील एजंटच या भागात सक्रिय झाले असून कोणतीही मान्यता नसलेले हे बियाणे मान्यताप्राप्त बियाणांच्या तुलनेत कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकण्यात येत आहेत. या बियाणांना आंध्रप्रदेशात मान्यता आहे. मात्र महाराष्ट्रात या बियाणांवर बॅन आणण्यात आले आहेत. असे असले तरी या बियाणांवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरीदेखिल या बियाणे लागवडीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातही अशा प्रकारचे बनावट बियाणे विकल्या गेल्याचा कृषी विभागाला संशय आहे. गंभीर बाब ही की, बीजी थ्री म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे वाण पर्यावरण व शेतीसाठी घातक असताना शेतकरी या बियाणांची लागवड शेतात करताना दिसतात. या बियाणांच्या झाडांवर थेट तणनाशक फवारले तरी झाडाला कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे निंदणाच्या खर्चाची बचत होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव असला तरी या बियाणाला अद्याप कोणतीही परवानगी नसून त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.बोंडअळीचे शेतकऱ्यांमध्ये अद्यापही धास्तीमागीलवर्षी वणी उपविभागात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी विषप्रयोग केले. परंतु हा विषप्रयोग शेतकऱ्यांवरच उलटला. यंदाही शेतकऱ्यांच्या मनात बोंडअळीची धास्ती असून पुन्हा ही बोंडअळी कपाशी उद्ध्वस्त करेल काय, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहेत.

टॅग्स :cottonकापूस