शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पर्णगळतीने झाले उन्हाळ्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:18 IST

पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते.

ठळक मुद्देवसंताची चाहूल : ऋतूमानात होतोयं बदल, दिवसाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते, हे विशेष. सध्या वसंत ऋतूची चाहुल लागली असून दिवसाच्या तापमानातही वाढ होत आहे.‘आला शिशिर संपत, पाने गळत चालली’ या ओवीतून कवी निसर्गाचे छान विश्लेषण केले. शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा वसंत आला, असे कोकिळा गाणे गात असते. पर्यावरणाच्या दृष्टीने वर्षभरात सहा ऋतू येतात. प्रत्येक ऋतू वैशिष्ट्यपूर्णच. वर्षा ऋतूत पावसाच्या सरी कोसळतात. शिशिर ऋतूत थंडीचा कडाका असतो. शरद, हेमंत ऋतू व वसंत ऋतूत शुष्क वातावरणामुळे वनस्पतींना उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारी महिन्यात जवळपास ९५ टक्के झाडांची पाने गळून पडतात. याचे कारणच हे की, प्रत्येक वनस्पती हवा, पाणी व सूर्यप्रकाशावर जगतात. शिशिर ऋतूपर्यंत झाडांना पाणी मुबलक राहत असल्याने मुळातून पानापर्यंत पाणी पोहोचते. मात्र शुष्क वातावरणात पाण्याची पातळी खालावत असल्याने झाडे मुळात पाणी साठवितात. पानांना पाण्याचा पुरवठा बंद होतो. परिणामी पान गळाली तरी झाड मात्र ओलसरच राहते.आम्रवृक्षावर परिणाम नाहीविदर्भात वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी पाच टक्के प्रजाती अशा आहेत, ज्यांची पाने वर्षभर गळत नाहीत. आम्रवृक्षाचीही पाने गळतात. मात्र एकाचवेळी पूर्णत: गळत नसल्याने दिसून पडत नाही. कारण त्याची मुळे जमिनीत अत्यंत खोलवर गेलेल्या असतात. फांद्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने एकाच वेळी पूर्णत: पानगळ होत नसल्याची माहिती प्रा.डॉ.केतन हटवारे यांनी दिली.

टॅग्स :weatherहवामान