शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

शासन भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध योजना आखते. मात्र तरीही भटक्यांची भटकंती अद्याप ....

उपाययोजना शून्य : मुले शिक्षणापासून वंचितवणी : शासन भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध योजना आखते. मात्र तरीही भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच आहे. वितभर पोटाची टिचभर खळगी भरण्याकरिता त्यांना अद्याप भटकंती करावी लागत आहे. भटक्या जमातीची अनेक कुटुंबे तालुक्यात वास्तव्याला आहेत. वणी शहरताही दीपक टॉकिज परिसरात हे बांधव दिसून येतात. त्यापैकी अनेक जण गेल्या कित्येक वर्षांपासून तेथेच ठिय्या मांडून आहेत. हाताला काम मिळत असल्याने ते तेथे ठाण मांडून बसले आहे. मात्र इतर अनेक भटके बांधव सदैव भटकत आहेत. ते विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करते. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यांना राहायला साधी जागा मिळत नाही. परिणामी कोणत्याही गावानजीक रस्त्याच्या कडेला किंवा गावातील पडिक जागेवर तंबू, पाल ठोकून ते उन्हा-तान्हात, पावसात वास्तव्य करतात. त्याच पालात चिलीपाली बागडतात. त्यांना शाळेचे तोंडी बघता येत नाही. या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरू असल्याने त्यांना शिक्षण मिळत नाही. परिणामी अनेक चिमुरडे हातात ‘घण’ लोखंडाचेच चणे फोडतात. या घणाचे घाव घातल्यानेच त्यांच्यासह कुटुंबाची पोटाची आग शांत होण्यास मदत मिळते. ही मुले शिक्षणापासून अद्याप दूर आहे. सतत भटकंती सुरू असल्याने त्यांच्याजवळ कायम रहिवासी असल्याच कुठलाही पुरावा नसतो. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेतानाही अडचण निर्माण होते. कागदपत्रांअभावी त्यांना योजनांचा लाभ मिळणे दुरापास्त होते. तालुक्यात अनेक गावांमध्ये भटका समाज वास्तव्यास आहे़ मात्र त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे आता प्रचंड कठीण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)