शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

शासन भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध योजना आखते. मात्र तरीही भटक्यांची भटकंती अद्याप ....

उपाययोजना शून्य : मुले शिक्षणापासून वंचितवणी : शासन भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध योजना आखते. मात्र तरीही भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच आहे. वितभर पोटाची टिचभर खळगी भरण्याकरिता त्यांना अद्याप भटकंती करावी लागत आहे. भटक्या जमातीची अनेक कुटुंबे तालुक्यात वास्तव्याला आहेत. वणी शहरताही दीपक टॉकिज परिसरात हे बांधव दिसून येतात. त्यापैकी अनेक जण गेल्या कित्येक वर्षांपासून तेथेच ठिय्या मांडून आहेत. हाताला काम मिळत असल्याने ते तेथे ठाण मांडून बसले आहे. मात्र इतर अनेक भटके बांधव सदैव भटकत आहेत. ते विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करते. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यांना राहायला साधी जागा मिळत नाही. परिणामी कोणत्याही गावानजीक रस्त्याच्या कडेला किंवा गावातील पडिक जागेवर तंबू, पाल ठोकून ते उन्हा-तान्हात, पावसात वास्तव्य करतात. त्याच पालात चिलीपाली बागडतात. त्यांना शाळेचे तोंडी बघता येत नाही. या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरू असल्याने त्यांना शिक्षण मिळत नाही. परिणामी अनेक चिमुरडे हातात ‘घण’ लोखंडाचेच चणे फोडतात. या घणाचे घाव घातल्यानेच त्यांच्यासह कुटुंबाची पोटाची आग शांत होण्यास मदत मिळते. ही मुले शिक्षणापासून अद्याप दूर आहे. सतत भटकंती सुरू असल्याने त्यांच्याजवळ कायम रहिवासी असल्याच कुठलाही पुरावा नसतो. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेतानाही अडचण निर्माण होते. कागदपत्रांअभावी त्यांना योजनांचा लाभ मिळणे दुरापास्त होते. तालुक्यात अनेक गावांमध्ये भटका समाज वास्तव्यास आहे़ मात्र त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे आता प्रचंड कठीण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)