शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

शासन भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध योजना आखते. मात्र तरीही भटक्यांची भटकंती अद्याप ....

उपाययोजना शून्य : मुले शिक्षणापासून वंचितवणी : शासन भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध योजना आखते. मात्र तरीही भटक्यांची भटकंती अद्याप सुरूच आहे. वितभर पोटाची टिचभर खळगी भरण्याकरिता त्यांना अद्याप भटकंती करावी लागत आहे. भटक्या जमातीची अनेक कुटुंबे तालुक्यात वास्तव्याला आहेत. वणी शहरताही दीपक टॉकिज परिसरात हे बांधव दिसून येतात. त्यापैकी अनेक जण गेल्या कित्येक वर्षांपासून तेथेच ठिय्या मांडून आहेत. हाताला काम मिळत असल्याने ते तेथे ठाण मांडून बसले आहे. मात्र इतर अनेक भटके बांधव सदैव भटकत आहेत. ते विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करते. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यांना राहायला साधी जागा मिळत नाही. परिणामी कोणत्याही गावानजीक रस्त्याच्या कडेला किंवा गावातील पडिक जागेवर तंबू, पाल ठोकून ते उन्हा-तान्हात, पावसात वास्तव्य करतात. त्याच पालात चिलीपाली बागडतात. त्यांना शाळेचे तोंडी बघता येत नाही. या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरू असल्याने त्यांना शिक्षण मिळत नाही. परिणामी अनेक चिमुरडे हातात ‘घण’ लोखंडाचेच चणे फोडतात. या घणाचे घाव घातल्यानेच त्यांच्यासह कुटुंबाची पोटाची आग शांत होण्यास मदत मिळते. ही मुले शिक्षणापासून अद्याप दूर आहे. सतत भटकंती सुरू असल्याने त्यांच्याजवळ कायम रहिवासी असल्याच कुठलाही पुरावा नसतो. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेतानाही अडचण निर्माण होते. कागदपत्रांअभावी त्यांना योजनांचा लाभ मिळणे दुरापास्त होते. तालुक्यात अनेक गावांमध्ये भटका समाज वास्तव्यास आहे़ मात्र त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे आता प्रचंड कठीण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)