शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

भटक्यांचे बिर्‍हाड अद्याप पाठीवरच

By admin | Updated: June 8, 2014 00:11 IST

शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्‍हाड

वणी : शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्‍हाड पाठीवरच दिसून येत आहे. शासनाच्या विविध योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे.भटक्या जमातीची अनेक कुटुंबे राज्यात वास्तव्यास आहेत. त्यांची सदैव भटकंती सुरू असते. हाताला काम मिळेल, या आशेने अद्यापही त्यांची अविरत भटकंती सुरूच आहे. परिणामी असे भटके समाज बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यांच्यापर्यंत विविध शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभच मिळत नाही. वीतभर पोटाची टीचभर भूक शमविण्याकरिता अद्यापही त्यांना या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे.भटक्या जमातीतील नागरिकांना कुठेही राहायला जागा मिळत नसल्यामुळे कोणत्याही गावानजीकच्या रस्त्याच्या कडेलाच किंवा गावातील पडीत जागेवर तंबू ठोकून ते उन्हा-तान्हात कसेतरी वास्तव्य करतात. पडित असलेल्या मोकळय़ा जागेवर पाल बांधून त्यांचे वास्तव्य सुरू होते. त्याच पालात त्यांची चिलीपाली असतात. त्यांची या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरूच असते. परिणामी त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणेही कठीण झाले आहे. भटक्या जमातीतील अनेक चिमुरडी हातात ‘घण’ घेऊन कुटुंबाला मदत करतात. घणाचे घावच त्यांचे पोट भरते. शिक्षणाचा त्यांना गंधही नसतो.  ही मुले शिक्षणापासून कोसो दूर आहेत. उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकंती करणार्‍या भटक्या समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभच मिळताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर त्यानील अनेकांची मतदार यादीतही नावे नसतात. सतत भटकत असल्याने त्यांच्याजवळ कायमचा कोणताही पुरावासुद्धा नसतो. परिसरातील बर्‍याच गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात भटका समाज वास्तव्यास आला आहे. त्यांना सतत कामाच्या शोधात या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. शाळा हा शब्दच त्यांना कळेनासा झाला आहे.  सततच्या भटकंतीमुळेच भटक्या समाजात आजही अशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे दुरापास्त झाले आहे. विविध योजनांसाठी कुठे जावे, कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडतो. योजनाच माहत नसल्याने त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही. परिणामी वार्षानुवर्षे हा भटका समाज अद्यापही भटकंती करीत फिरतच आहे. शासन आणि प्रशासनाने अशा भटक्या जमातींकडे लक्ष देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याची खरी गरज आहे. त्यांनाही इतर मानवाप्रमाणे मानव म्हणून ओळख देण्याची नितांत गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)