शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

भटक्यांचे बिर्‍हाड अद्याप पाठीवरच

By admin | Updated: June 8, 2014 00:11 IST

शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्‍हाड

वणी : शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्‍हाड पाठीवरच दिसून येत आहे. शासनाच्या विविध योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे.भटक्या जमातीची अनेक कुटुंबे राज्यात वास्तव्यास आहेत. त्यांची सदैव भटकंती सुरू असते. हाताला काम मिळेल, या आशेने अद्यापही त्यांची अविरत भटकंती सुरूच आहे. परिणामी असे भटके समाज बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यांच्यापर्यंत विविध शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभच मिळत नाही. वीतभर पोटाची टीचभर भूक शमविण्याकरिता अद्यापही त्यांना या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे.भटक्या जमातीतील नागरिकांना कुठेही राहायला जागा मिळत नसल्यामुळे कोणत्याही गावानजीकच्या रस्त्याच्या कडेलाच किंवा गावातील पडीत जागेवर तंबू ठोकून ते उन्हा-तान्हात कसेतरी वास्तव्य करतात. पडित असलेल्या मोकळय़ा जागेवर पाल बांधून त्यांचे वास्तव्य सुरू होते. त्याच पालात त्यांची चिलीपाली असतात. त्यांची या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरूच असते. परिणामी त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणेही कठीण झाले आहे. भटक्या जमातीतील अनेक चिमुरडी हातात ‘घण’ घेऊन कुटुंबाला मदत करतात. घणाचे घावच त्यांचे पोट भरते. शिक्षणाचा त्यांना गंधही नसतो.  ही मुले शिक्षणापासून कोसो दूर आहेत. उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकंती करणार्‍या भटक्या समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभच मिळताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर त्यानील अनेकांची मतदार यादीतही नावे नसतात. सतत भटकत असल्याने त्यांच्याजवळ कायमचा कोणताही पुरावासुद्धा नसतो. परिसरातील बर्‍याच गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात भटका समाज वास्तव्यास आला आहे. त्यांना सतत कामाच्या शोधात या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. शाळा हा शब्दच त्यांना कळेनासा झाला आहे.  सततच्या भटकंतीमुळेच भटक्या समाजात आजही अशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे दुरापास्त झाले आहे. विविध योजनांसाठी कुठे जावे, कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडतो. योजनाच माहत नसल्याने त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही. परिणामी वार्षानुवर्षे हा भटका समाज अद्यापही भटकंती करीत फिरतच आहे. शासन आणि प्रशासनाने अशा भटक्या जमातींकडे लक्ष देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याची खरी गरज आहे. त्यांनाही इतर मानवाप्रमाणे मानव म्हणून ओळख देण्याची नितांत गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)