लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आज घरात, गावात माणसांची बेटं बनली आहेत. माणसामाणसात जात, धर्म, पंथ, समुदायाची काचेची भिंत उभी झाली आहे. ही दरी मिटविण्यासाठी युद्धाची नव्हे, तर सामोपचाराच्या भाषेची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘सर्च’च्या प्रमुख डॉ. राणी बंग यांनी येथे केले. दिवंगत मोहनलाल राठी स्मृती प्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘वंदन’ सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावर्षी चतुर्थ वंदन सन्मान यवतमाळ येथील डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल पटेल यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. श्यामसुंदर भुतडा होते. यावेळी शांताबाई राठी, ‘सर्च’चे विश्वस्त डॉ. उपेंद्र वेदपाठक प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठेच मिळत नाही. आपल्या आजुबाजूच्या लोकांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. अनिल पटेलांसारखे समाजसेवी डॉक्टर सतत कार्यरत असतात. समाजाला दिशा देण्याचे काम संवेदनशील माणसंच करतात. नवीन पिढीकडे प्रचंड ऊर्जा आहे. या ऊजेर्चा समाजाच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे, असे डॉ. बंग म्हणाल्या.यावेळी डॉ. अनिल पटेल यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान समाजातील पीडित आणि गरीब रुग्णांना समर्पित करत असल्याचे डॉ. अनिल पटेल यांनी सांगितले.डॉ. श्यामसुंदर भूतडा यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यापूर्वी वंदन सन्मान शेषराव डोंगरे, मतीन भोसले, मधुकरराव उपलेंचवार यांना प्रदान करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण अग्रवाल, संचालन कमल बागडी यांनी केले. आभार सुरेश राठी यांनी मानले. यशस्वीतेसाठी राठी परिवारासह मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.
माणसामाणसात जात, धर्म, पंथाची भिंत उभी झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST
डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठेच मिळत नाही. आपल्या आजुबाजूच्या लोकांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. अनिल पटेलांसारखे समाजसेवी डॉक्टर सतत कार्यरत असतात.
माणसामाणसात जात, धर्म, पंथाची भिंत उभी झाली
ठळक मुद्देराणी बंग यांची खंत : अनिल पटेल यांना ‘वंदन’ सन्मान, राठी परिवारासह मित्र परिवाराचा उपक्रम