शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

माणसामाणसात जात, धर्म, पंथाची भिंत उभी झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठेच मिळत नाही. आपल्या आजुबाजूच्या लोकांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. अनिल पटेलांसारखे समाजसेवी डॉक्टर सतत कार्यरत असतात.

ठळक मुद्देराणी बंग यांची खंत : अनिल पटेल यांना ‘वंदन’ सन्मान, राठी परिवारासह मित्र परिवाराचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आज घरात, गावात माणसांची बेटं बनली आहेत. माणसामाणसात जात, धर्म, पंथ, समुदायाची काचेची भिंत उभी झाली आहे. ही दरी मिटविण्यासाठी युद्धाची नव्हे, तर सामोपचाराच्या भाषेची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘सर्च’च्या प्रमुख डॉ. राणी बंग यांनी येथे केले. दिवंगत मोहनलाल राठी स्मृती प्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘वंदन’ सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावर्षी चतुर्थ वंदन सन्मान यवतमाळ येथील डॉक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल पटेल यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. श्यामसुंदर भुतडा होते. यावेळी शांताबाई राठी, ‘सर्च’चे विश्वस्त डॉ. उपेंद्र वेदपाठक प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठेच मिळत नाही. आपल्या आजुबाजूच्या लोकांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. अनिल पटेलांसारखे समाजसेवी डॉक्टर सतत कार्यरत असतात. समाजाला दिशा देण्याचे काम संवेदनशील माणसंच करतात. नवीन पिढीकडे प्रचंड ऊर्जा आहे. या ऊजेर्चा समाजाच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे, असे डॉ. बंग म्हणाल्या.यावेळी डॉ. अनिल पटेल यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान समाजातील पीडित आणि गरीब रुग्णांना समर्पित करत असल्याचे डॉ. अनिल पटेल यांनी सांगितले.डॉ. श्यामसुंदर भूतडा यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यापूर्वी वंदन सन्मान शेषराव डोंगरे, मतीन भोसले, मधुकरराव उपलेंचवार यांना प्रदान करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण अग्रवाल, संचालन कमल बागडी यांनी केले. आभार सुरेश राठी यांनी मानले. यशस्वीतेसाठी राठी परिवारासह मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.