शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

स्वतंत्र विदर्भासाठी पदयात्रा

By admin | Updated: December 6, 2014 22:55 IST

वेगळ्या विदर्भाची मागणी १०८ वर्षे जुनी आहे. मात्र विदर्भाला न्याय मिळाला नाही. उलट शोषण झाले. विदर्भ विकासात मागे पडला. या विरोेधात जिल्हा वकील संघ, आंदोलन समिती, जनमंच आणि शेतकरी

यवतमाळ : वेगळ्या विदर्भाची मागणी १०८ वर्षे जुनी आहे. मात्र विदर्भाला न्याय मिळाला नाही. उलट शोषण झाले. विदर्भ विकासात मागे पडला. या विरोेधात जिल्हा वकील संघ, आंदोलन समिती, जनमंच आणि शेतकरी संघटनेने येथून जनजागरण पदयात्रा काढली. नागपूर अधिवेशनावर ही पदयात्रा धडक देणार आहे. सन १९०५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे. त्याकरिता सतत शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. याकाळात मिळालेली आश्वासने फोल ठरली. सिंचन, उद्योग, बेरोेजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, प्रशासनातील रिक्त पदे, विकास कामांचा तुटवडा, निधीची कमतरता यासारखे अनेक प्रश्न विदर्भात निर्माण झाले. यावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीला संमती द्यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. येथील जिल्हा न्यायालयासमोरून पदयात्रेला सुरुवात ाली. बसस्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पाच कंदील चौकातील लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तेथून पदयात्रा पुढील प्रवासाला निघाली. ही पदयात्रा वर्धा, खडकी, बुटीबोरी मार्गे १२ डिसेंबरला धडकणार आहे. जनजागरण पदयात्रेत वामनराव चटप, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, अ‍ॅड. अजय चमेडिया, अ‍ॅड. ए.पी. दर्डा, अ‍ॅड. वीरेन्द्र्र दरणे, अ‍ॅड. संतोष कुचनकर, अ‍ॅड. अमोल बोरखडे, सुजित राय, अ‍ॅड. सचिन बोबडे, अ‍ॅड. बी. आर. गोडे, अ‍ॅड. सुरज काकडे, अ‍ॅड जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. उमेश राऊत, संजय मसराम, दिनेश शाहू, राजेश चव्हाण, रूपेश घोसे, दीपक हांडे, निरंजन दाढे, राजेंद्र डांगे, राजेश पडगिलवार, अजय बिहाडे आदींनी सहभाग नोंदविला. (शहर वार्ताहर)