शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

७०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाची सहा वर्षांपासून प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:26 IST

--संथ गती, असुविधेमुळे वाहनधारक त्रस्त, कंत्राटदाराविरुध्द रोष फोटो दारव्हा : सन २०१५ मध्ये मंजूर झालेल्या दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय या ७०० ...

--संथ गती, असुविधेमुळे वाहनधारक त्रस्त, कंत्राटदाराविरुध्द रोष

फोटो दारव्हा : सन २०१५ मध्ये मंजूर झालेल्या दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय या ७०० कोटींच्या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जवळपास गेल्या सहा वर्षांपासून नागरिक या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. एवढा कालावधी होऊनही काम अपूर्णच असल्याने कंत्राटदार कंपनीविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.

पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला ७० किलोमीटर अंतरातील ७०० कोटींच्या रस्त्याच्या कामाचे कंत्राट मिळाले. मात्र ढिसाळ नियोजन, संथगती यांसह अनेक कारणांमुळे कामाला विलंब लागत आहे. परिणामी वाहनधारकांना अनेक वर्षांपासून असुविधेचा सामना करावा लागत आहे. २८२ क्रमांकाचा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यात आला. या मार्गाच्या ७०० कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून २०१५ मध्ये मान्यता दिली. त्याच वर्षी २५ नोव्हेंबरला यवतमाळ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला.

कंत्राटदार कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कारंजा, अकोला, यवतमाळ, आर्णी, दिग्रस, पुसद, नेर, अमरावतीसह अनेक मोठ्या शहरांकडे ये-जा करणारी सर्व वाहने याच मार्गावरून मार्गस्थ होतात. दिग्रस, दारव्हा, नेर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गावर अनेक गावे आहेत. वाहतुकीला कोणताही अडथळा न होता, या महामार्गाचे काम त्वरित होणे आवश्यक होते; परंतु या कामाला मुदतीपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. शिवाय रस्त्यावरील असुविधेमुळे वाहनधारक प्रचंड त्रस्त आहेत.

एका बाजूने खोदकाम करून बांधकाम करताना दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोकळी ठेवणे आवश्यक असते. या मार्गावर काही ठिकाणी एकाच वेळी पूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आला. पुलांचे बांधकाम करताना पक्के वळणरस्ते तयार केले नाहीत. उपकंत्राटदार नेमून तुकड्या-तुकड्यांत काम केले जात आहे. दोन्ही बाजूंनी नालीचे खोदकाम केल्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, अशा तक्रारी आहेत. पावसाळ्यात चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. अर्धवट कामांमुळे अद्यापही हे ग्रहण सुटलेले नाही.

बॉक्स

कामाच्या दर्जाबाबत तक्रारी

मोठा खर्च करून दोन जिल्हे, तीन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. यामुळे काही ठिकाणी लाखो रुपयांचे झालेले काम कंत्राटदाराला पुन्हा करावे लागले. यावरून तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट होते; परंतु कंत्राटदार स्थानिक बांधकाम विभागाला जुमानत नाही. महामार्ग अधिकाऱ्यांचा थांगपत्ता नाही. त्यामुळे कंपनीची मनमानी सुरू आहे. कामातील विलंब, दर्जा यांची चौकशी होण्यासोबत रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी आहे.