शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा

By admin | Updated: December 21, 2014 23:06 IST

अल्प पावसाने जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ३५ लाख मजूर क्षमता असणारे काम उपलब्ध आहे. परंतु १३ हजार

यवतमाळ : अल्प पावसाने जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ३५ लाख मजूर क्षमता असणारे काम उपलब्ध आहे. परंतु १३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा असल्याने या योजनेला हादरा बसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पावसाने भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. मजुरांचे स्थलांतरण सुरू आहे. अशा स्थितीत शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ग्रामपंचायत, वनविभाग, रस्ते आणि विहिरींसह १३ हजार १३७ कामांना मंजुरी मिळाली. मात्र या कामांवर मजूरच यायला तयार नाही. या सर्व कामांवर ३४ लाख मजुरांच्या हाताला काम देण्याची क्षमता आहे. परंतु जिल्ह्यातील मजूर रोहयोच्या कामावर यायला तयार नाही. मजूर का या कामांवर येत नाही. याकडे कुणाचेही लक्ष नाही. यामुळे जिल्ह्यातील रोहयोची कामे खोळंबली आहे. जिल्ह्यात १३ हजार कामांपैकी ८१ कामांनाच सुरुवात झाली आहे. संपूर्ण वर्षभरात ७० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची तरतूद या कामांसाठी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ४७ कोटींचा निधी खर्च झाला. यामध्ये ३० कोटी रुपयांचा निधी मजुरांवर खर्च झाला आहे. मात्र सद्यस्थितीत १३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा असून रोहयोकडे मात्र जिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. (शहर वार्ताहर)