शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा

By admin | Updated: February 11, 2015 00:07 IST

शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव ....

दारव्हा : शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ४३ कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांच्या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, दारव्ह्याचे नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद प्रशासन संचालनालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या दारव्हा शहरात नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी चांगली योजना कार्यान्वित नाही. १९७३ मध्ये सुरू झालेली कुपटी नदीवरील मूळ योजना आणि १९९३ मध्ये सुरू झालेली अडाण नदीवरील पेकर्डा पूरक योजना या दोन योजनांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या दारव्हा शहरात तीन हजार १५५ नळजोडण्या आहेत. दररोज १४ लाख लिटर पाणी सोडण्यात येते. परंतु आळीपाळीने पाणी सोडले जात असल्याने नळधारकांना दर दोन दिवसांनी केवळ एक तास पाणी मिळते. त्यातही गेल्या काही वर्षात शहरात विविध कारणांमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाई निवारणार्थ २००९-१० मध्ये अरुणावतीवरून पाईपलाईन टाकण्यात आली. त्यापूर्वी २००४ मध्येसुद्धा कुंभारकिन्ही प्रकल्पावरून पाईप लाईन टाकण्यात आली होती. तरीदेखील शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकला नाही. अनेक वेळा टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती अधूनमधून निर्माण होतच आहे.या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अनेक वर्षांपासून शहरवासीयांची मागणी आहे. शहरातील पाणीप्रश्न लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी पुढाकार घेवून सुजल व निर्मल अभियानांतर्गत पाणीयोजनेचा प्रस्ताव तयार केला. त्याला तांत्रिक मंजुरात घेवून तो प्रस्ताव फार पूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला. नगराध्यक्ष चिरडे यांच्या मागणीवरून पालकमंत्री संजय राठोड यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे याबाबतचा पाठपुरावा केला. दारव्हा नगरपरिषदेचा हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु शासनाकडून हिरमोड झाला. (तालुका प्रतिनिधी)प्रस्तावाला मिळाल्या वाटाण्याच्या अक्षतासुजल व निर्मल योजनेंतर्गत दारव्हा नगर परिषदेने सादर केलेला पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा यासाठी पालकमंत्री संजय राठोड व नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी बैठकीत जोरदार प्रयत्न केले. परंतु सुजल व निर्मल योजना बंद झाली आहे व शहरी पाणीपुरवठा हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे येतो, त्यामुळे सदर योजनेसाठी नगरोत्थान किंवा राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रस्ताव सादर करावा, असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने सुचविण्यात आले. दारव्हा नगर परिषदेने अतिशय परिश्रमपूर्वक प्रस्ताव तयार केला. त्यानंतर त्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरली. नगराध्यक्ष चिरडे यांच्यासाठी हा प्रकल्प महत्कांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्यामुळे नगराध्यक्षांसह सर्वांचाच हिरमोड झाला असून पुन्हा दारव्हेकरांना पाण्यासाठी पुन्हा प्रतिक्षा करावी लागेल, असे दिसते.