शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा

By admin | Updated: February 11, 2015 00:07 IST

शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव ....

दारव्हा : शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ४३ कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांच्या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, दारव्ह्याचे नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद प्रशासन संचालनालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या दारव्हा शहरात नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी चांगली योजना कार्यान्वित नाही. १९७३ मध्ये सुरू झालेली कुपटी नदीवरील मूळ योजना आणि १९९३ मध्ये सुरू झालेली अडाण नदीवरील पेकर्डा पूरक योजना या दोन योजनांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या दारव्हा शहरात तीन हजार १५५ नळजोडण्या आहेत. दररोज १४ लाख लिटर पाणी सोडण्यात येते. परंतु आळीपाळीने पाणी सोडले जात असल्याने नळधारकांना दर दोन दिवसांनी केवळ एक तास पाणी मिळते. त्यातही गेल्या काही वर्षात शहरात विविध कारणांमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाई निवारणार्थ २००९-१० मध्ये अरुणावतीवरून पाईपलाईन टाकण्यात आली. त्यापूर्वी २००४ मध्येसुद्धा कुंभारकिन्ही प्रकल्पावरून पाईप लाईन टाकण्यात आली होती. तरीदेखील शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकला नाही. अनेक वेळा टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती अधूनमधून निर्माण होतच आहे.या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अनेक वर्षांपासून शहरवासीयांची मागणी आहे. शहरातील पाणीप्रश्न लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी पुढाकार घेवून सुजल व निर्मल अभियानांतर्गत पाणीयोजनेचा प्रस्ताव तयार केला. त्याला तांत्रिक मंजुरात घेवून तो प्रस्ताव फार पूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला. नगराध्यक्ष चिरडे यांच्या मागणीवरून पालकमंत्री संजय राठोड यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे याबाबतचा पाठपुरावा केला. दारव्हा नगरपरिषदेचा हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु शासनाकडून हिरमोड झाला. (तालुका प्रतिनिधी)प्रस्तावाला मिळाल्या वाटाण्याच्या अक्षतासुजल व निर्मल योजनेंतर्गत दारव्हा नगर परिषदेने सादर केलेला पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा यासाठी पालकमंत्री संजय राठोड व नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी बैठकीत जोरदार प्रयत्न केले. परंतु सुजल व निर्मल योजना बंद झाली आहे व शहरी पाणीपुरवठा हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे येतो, त्यामुळे सदर योजनेसाठी नगरोत्थान किंवा राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रस्ताव सादर करावा, असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने सुचविण्यात आले. दारव्हा नगर परिषदेने अतिशय परिश्रमपूर्वक प्रस्ताव तयार केला. त्यानंतर त्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरली. नगराध्यक्ष चिरडे यांच्यासाठी हा प्रकल्प महत्कांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्यामुळे नगराध्यक्षांसह सर्वांचाच हिरमोड झाला असून पुन्हा दारव्हेकरांना पाण्यासाठी पुन्हा प्रतिक्षा करावी लागेल, असे दिसते.