शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा

By admin | Updated: February 11, 2015 00:07 IST

शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव ....

दारव्हा : शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ४३ कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांच्या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, दारव्ह्याचे नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद प्रशासन संचालनालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या दारव्हा शहरात नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी चांगली योजना कार्यान्वित नाही. १९७३ मध्ये सुरू झालेली कुपटी नदीवरील मूळ योजना आणि १९९३ मध्ये सुरू झालेली अडाण नदीवरील पेकर्डा पूरक योजना या दोन योजनांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या दारव्हा शहरात तीन हजार १५५ नळजोडण्या आहेत. दररोज १४ लाख लिटर पाणी सोडण्यात येते. परंतु आळीपाळीने पाणी सोडले जात असल्याने नळधारकांना दर दोन दिवसांनी केवळ एक तास पाणी मिळते. त्यातही गेल्या काही वर्षात शहरात विविध कारणांमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाई निवारणार्थ २००९-१० मध्ये अरुणावतीवरून पाईपलाईन टाकण्यात आली. त्यापूर्वी २००४ मध्येसुद्धा कुंभारकिन्ही प्रकल्पावरून पाईप लाईन टाकण्यात आली होती. तरीदेखील शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकला नाही. अनेक वेळा टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती अधूनमधून निर्माण होतच आहे.या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अनेक वर्षांपासून शहरवासीयांची मागणी आहे. शहरातील पाणीप्रश्न लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी पुढाकार घेवून सुजल व निर्मल अभियानांतर्गत पाणीयोजनेचा प्रस्ताव तयार केला. त्याला तांत्रिक मंजुरात घेवून तो प्रस्ताव फार पूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला. नगराध्यक्ष चिरडे यांच्या मागणीवरून पालकमंत्री संजय राठोड यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे याबाबतचा पाठपुरावा केला. दारव्हा नगरपरिषदेचा हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु शासनाकडून हिरमोड झाला. (तालुका प्रतिनिधी)प्रस्तावाला मिळाल्या वाटाण्याच्या अक्षतासुजल व निर्मल योजनेंतर्गत दारव्हा नगर परिषदेने सादर केलेला पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा यासाठी पालकमंत्री संजय राठोड व नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी बैठकीत जोरदार प्रयत्न केले. परंतु सुजल व निर्मल योजना बंद झाली आहे व शहरी पाणीपुरवठा हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे येतो, त्यामुळे सदर योजनेसाठी नगरोत्थान किंवा राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रस्ताव सादर करावा, असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने सुचविण्यात आले. दारव्हा नगर परिषदेने अतिशय परिश्रमपूर्वक प्रस्ताव तयार केला. त्यानंतर त्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरली. नगराध्यक्ष चिरडे यांच्यासाठी हा प्रकल्प महत्कांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्यामुळे नगराध्यक्षांसह सर्वांचाच हिरमोड झाला असून पुन्हा दारव्हेकरांना पाण्यासाठी पुन्हा प्रतिक्षा करावी लागेल, असे दिसते.