शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

रक्तसाठवण केंद्राची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2015 01:52 IST

वणी परिसरात औद्योगीकरणाचा सपाटा वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणाने कहर केला आहे.

वणी : वणी परिसरात औद्योगीकरणाचा सपाटा वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणाने कहर केला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना विविध आजारांनी बेजार केले. तसेच वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आजारी रूग्णांना व अपघातग्रस्तांना अनेकदा रक्ताची गरज भासते. मात्र येथे रक्त साठवण केंद्र नसल्याने रूग्णांना रक्तासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.वणी परिसरात कोळशावर आधारीत विविध उद्योग व कोळसा खाणी, यामुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषणाने विळखा घातला आहे. अनेक रूग्णांना दीर्घ आजार होत आहे. तसेच सिकलसेल, क्षयरोग, दमा, मधुमेह, रक्तदाब या रोगांची अनेकांना लागण झाली आहे. कित्येक वेळा या रोगाचे रूग्ण तातडीने दवाखान्यात दाखल करावे लागतात. रूग्णांना रक्त पुरवठा व हिमोग्लोबीनचे प्रमाणे कमी झाल्याने बाहेरून रक्त पुरवठा करण्याची वेळ येते. परंतु येथे रक्त साठवण केंद्र नसल्याने रूग्णाला रक्त पुरवठा करता येत नाही. तसेच अपघातामध्ये क्षतीग्रस्त झालेल्या रूग्णांनाही रक्त पुरवठ्याची गरज असते. इतर सुविधा असतानाही केवळ रक्त पुरवठा करण्यासाठी रूग्णांना येथून रेफर करावे लागते. वणी परिसरात आत्तापर्यंत अनेक रक्तदान शिबिरे झाली आहे. बहुसंख्य तरूणांनी यामध्ये रक्तदान केले आहे. परंतु हे रक्त येथे साठवून ठेवण्याची सोय नसल्याने नागपूर व चंद्रपूर येथील रक्तपेढ्यांना दान करावे लागते. वणीतील तरूणांचे रक्त येथीलच रूग्णांना कामी पडत नसल्याने या रक्तदान शिबिराचा उपयोग तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. येथील ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी व तेथे रक्त साठवण केंद्र निर्माण करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्षच केले जात आहे.ग्रामीण रूग्णालयात सिकलसेल आजारासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. तालुक्यातील राजूर, शिरपूर, कायर, कोलगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राथमिक तपासणी केलेले सिकलसेलचे रूग्णही वणी ग्रामीण रूग्णालयात पाठविले जातात. या आजारामध्ये रक्तातील पेशी विळ्याच्या आकाराच्या होतात. त्यामुळे शरीरातील रक्त निर्मितीची प्रक्रिया बंद होते. म्हणूनच सिकलसेल रूग्णांना सतत रक्त देण्याची गरज भासते. तथापि येथील ग्रामीण रूग्णालयात रक्त साठवण केंद्र नसल्याने सिकलसेल रूग्णांचे प्राण धोक्यात आले आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात रक्त साठवण केंद्राचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्याला अजुनही मंजुरी न मिळाल्याने यंत्रसामग्री मिळाली नाही. सिकलसेल रूग्णांचे त्वरित निदान व्हावे, म्हणून जिल्ह्यात नऊ ठिकाणी इलेक्ट्रोफोरोसीस यंत्र देण्यात आले आहे. त्याद्वारे रूग्णांची तपासणी होऊन काही वाहक रूग्ण, काही निगेटीव्ह रूग्ण व काही पीडित रूग्ण अशी वर्गवारी करून त्यांना पिवळे, पांढरे व लाल कार्ड देण्यात येतात. मात्र तालुका स्तरावर या रूग्णांना रक्त मिळेनासे झाले आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी सहाय्यकाची पदे रिक्त आहे. त्यामुळे रक्त साठवण केंद्र मिळण्यास अडचणी येत असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)