शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

वाघापूर, उमरसरातील समस्यांमध्ये पडली भर

By admin | Updated: July 27, 2016 00:34 IST

काही महिन्यांपूर्वी शहरानजीकच्या वाघापूर, उमरसरा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, लोहारा, मोहा या ग्रामपंचायतींचे विलिनिकरण यवतमाळ नगर परिषदेत करण्यात आले

सांडपाणी रस्त्यावर : सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य, पाण्यासाठी भटकंतीच यवतमाळ : काही महिन्यांपूर्वी शहरानजीकच्या वाघापूर, उमरसरा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, लोहारा, मोहा या ग्रामपंचायतींचे विलिनिकरण यवतमाळ नगर परिषदेत करण्यात आले आणि या सर्व ग्रामपंचायत परिसरातील समस्यांमध्ये वाढ झाली. किंबहुंना ग्रामपंचायतकडून ज्या नियमित सेवा पुरविण्यात येत होत्या, त्या बंद पुर्णपणे झाल्या आणि नगर परिषदेने या परिसरातील समस्यांची अद्याप दखलच घेतलेली नाही. उमरसरा, वाघापूर, पिंपळगाव या परिसरात भर पावसाळ्यातही अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. नळाला पूर्वीप्रमाणे फोर्स नाही. त्यामुळे आजही अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पूर्वी तिसऱ्या माळ्यावर चढणारे पाणी आता ग्राऊंड फ्लोअरवर सुद्धा चढत नसल्याचे दिसते. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक नागरिकांनी आपल्या घरातच तीन ते चार फुटांचे खड्डे खोदले आहेत. या खड्डयात उतरून नळाचे पाणी घ्यावे लागते. पावसाळ्याचे दिवस असुनही नाल्याच नियमित साफ केल्या जात नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. वडगाव परिसरातील दांडेकर ले-आऊट, सानेगुरूजी नगर, आशिर्वाद नगर, परोपटे ले-आऊट, उमरसरा परिसरातील यशोधरा नगर, निखिल नगर, नरेंद्र नगर, प्रेरणा नगर आदी परिसरात नाल्या व सांडपाण्याचा तीव्र प्रश्न आहे. हिच परिस्थिती भोसा परिसरातील सुनील मोरे नगरासह सव्वालाखे ले-आऊट व इतर ठिकाणीसुद्धा आहे. वाघापूर, लोहारा, भोसा याही ठिकाणी सांडपाणी व अस्वच्छतेचा तीव्र प्रश्न आहे. बहुसंख्य परिसरात अद्याप नाल्यासुद्धा नाहीत. १५ ते २० वर्ष जुन्या ले-आऊटमध्ये अद्याप नाल्यांचे बांधकामच न झाल्यामुळे नागरिकांना आपले आरोग्य धोक्यात टाकून दिवस काढावे लागत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून पथदिवे बंद पडल्याच्या तक्रारी केल्यानंतरही कुणी येऊन पहायला तयार नाही. उमरसरा परिसरातील यशोधरा नगरातील सर्व म्हणजे चार ते पाच पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रभर या परिसरत काळोखाचे राज्य असते. याबाबत उमरसरा ग्रामपंचायतमध्ये ठेवलेल्या तक्रार नोंदवहीत नोंद करूनही त्याची दखल मात्र घेण्यात येत नाही. केवळ तक्रारी करा आणि निघून जा, असे धोरण नगर परिषद प्रशासनाकडून अवलंबिले जात आहे. त्यामुळे पुर्वीच्या ग्रामपंचायती बऱ्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. सर्वत्र सांडपाणी ठिकठिकाणी साचलेले पावसाचे डबके आणि त्यातच डुकरांचा हैदोस ही परिस्थिती सर्वत्र आढळून येते. अनेक भागातील घंटागाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे कचरा कुठे टाकावा ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वाघापूर परिसरातील विद्या विहार, सानेगुरूजी नगर, शुभम कॉलनी, राधाकृष्ण नगरी आदी ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. कच्चे रस्ते असल्यामुळे दुचाकी किंवा सायकल घरापर्यंत पोहचत नाही. रस्त्यावर सर्वत्र चिखल असल्यामुळे पायी चालणाऱ्यालाही कसरत करावी लागते. अनेकजण आपली वाहने रस्त्यावरच उभी करून घराकडे जातात. अशा स्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेताना हाल होतात. विद्यार्थी वेळेवर शाळेत पाहचू शकत नाही. संपूर्ण रस्ते खड्डयांनी व्यापले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा रोष वाढतच आहे. (प्रतिनिधी) नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ शहरानजीकच्या नव्यानेच विलिनीकरण करून घेतलेल्या ग्रामपंचायत परिसरातील समस्यांबाबत नगर परिषद पूर्णपणे अनभिज्ञ आहे. सबंधित नगरसेवक निवडणूक होऊ द्या नंतर पाहू, असे म्हणून वेळ मारून नेतात. सर्वांचे लक्ष केवळ नगर परिषदेच्या निवडणुकांवर आहे. नागरिकांच्या समस्यांशी कुणालाही घेणे-देणे नाही. ग्रामपंचायतचे माजी पदाधिकारी म्हणतात आता आमच्या हातात काही नाही, तर पालिका प्रशासन म्हणते तुम्ही सध्या ग्रामपंचायत कार्यालयातच तक्रारी करा, तिथे आमचा माणूस बसविला आहे. हा माणूस काय करतो, कधी असतो, हे नगर परिषदेलाही माहित नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष असून हा रोष नगर परिषद निवडणुकीत निश्चित दिसून येईल, यात शंका नाही.