शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

वाघाडी नदीचे पात्र माती उत्खननाने धोक्यात

By admin | Updated: December 29, 2014 02:20 IST

हिवाळ््याच्या सुरूवातीलाच तालुक्यात वीट भट्टी व्यवसायाला सुरूवात होते. यावर्षी तर चक्क वीटभट्टी व्यावसायिकांनी ...

घाटंजी : हिवाळ््याच्या सुरूवातीलाच तालुक्यात वीट भट्टी व्यवसायाला सुरूवात होते. यावर्षी तर चक्क वीटभट्टी व्यावसायिकांनी वाघाडी नदी पात्राच्या दरड खोदून माती नेण्याचा सपाटा चालविला आहे. एवढेच नव्हे तर प्रवेशास बंदी असलेल्या वनहद्दीतूनही मातीचा उपसा केला जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे आर्थिक हितसंबंधातून दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाचे तीनतेरा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनहद्दीतील वनसंपदा धोक्यात आली आहे. महसूल विभागाकडून वीटभट्टीची परवानगी देण्यात येते. एक ते तीन लाखापर्यंत नगांची भट्टी लावण्याची पारवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र १५ ते २० लाखांच्यावर विटा भट्टीतून निर्माण केल्या जातात. शासनाचा महसूल बुडवून जास्तीत जास्त कमाई कशी होईल यादृष्टीने वीटभट्टी व्यावसायिक हा कारभार करतात. अर्थात त्याला प्रशासनाचेही पाठबळ असतेच. पूर्वी विटांसाठी राख आणि पडीक शेतातील मातीचा उपयोग व्यावसायिक करायचे. आता प्रशासनाच्या आशिर्वादाने त्यांनी चक्क नदीपात्र आणि वनजमीनीला मातीसाठी वेठीस धरले आहे. फुकटात माती उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे चांगलेच फावत आहे. घाटंजी तालुक्यातील नागेझरी, मानोली, शिरोली, कोळी, उंदरणी, येळाबारा, दहेगाव, दहेली, पांढुर्णा, शिवणी, घोटी, मारेगाव, मोवाडा, दत्तापूर आदी गांवांमध्ये शेकडो वीटभट्ट्या आहेत. एक ते तीन लाख विटांची निर्मिती करण्याची परवानगी घेऊन आधीच यातील बहुतांश वीटभट्टी व्यावसायिकांनी शासनाचा महसूल बुडविला. आता त्यांनी वाघाडी नदीच्या पात्रातूनच दरड खोदून माती नेण्याचा सपाटा चालविला आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)