शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

विधान परिषदेचे मतदार नेत्यांच्या ‘मध्यस्थी’ने त्रस्त

By admin | Updated: November 17, 2016 01:23 IST

विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने

उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही : ४८ सदस्यांची ‘वजन’ वाढविण्यासाठी कळंबमध्ये बैठक यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने मतदारांना ‘कोण-किती’ याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या मध्यस्थांमुळेच मतदार त्रस्त आहेत.विधान परिषदेसाठी १९ नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असताना मतदारांमधील अस्वस्थता उफाळून आली आहे. कारण आपल्या नावावर मध्यस्थाची भूमिका वठविणारे नेते तर ‘दुकानदारी’ करणार नाही ना अशी हूरहूर या मतदारांना आहे. उमेदवार अद्यापही मध्यस्थांमध्येच गुरफटलेले आहेत. एवढेच नव्हे तर हे मध्यस्थ उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत पोहचण्यात अप्रत्यक्ष अडथळे निर्माण करीत असल्याची माहिती आहे. उमेदवारांनी थेट आमच्याकडे ‘अ‍ॅप्रोच’ व्हावे, मध्यस्थ-नेत्यांना ‘किंमत’ देण्याची गरज नाही, असा मतदारांमधील सूर आहे. सर्व काही अंधारात आणि थर्ड पार्टी होत असल्याने मतदारांमध्ये उमेदवारांप्रती नाराजी वाढते आहे. अशाच नाराजीतून भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादीतील ४८ सदस्य मंगळवारी एकत्र आले. त्यांची कळंबमध्ये गुप्त बैठक झाली. अपक्षाने काही दिवसांपूर्वी घाटंजीमध्ये मतदारांना आठ बोटे दाखविली होती. ते पाहून शिवसेनेने दोनही पंजे मतदारांपुढे उघड केले. मात्र प्रत्यक्षात सध्या टोकन म्हणून अवघी दोन ते तीन बोटे फिरविली जात असल्याने मतदार संभ्रमात सापडले आहेत. उमेदवारांनी बोलल्याप्रमाणे ‘वजन’ वाढवावे म्हणून दबाव निर्माण करण्याचे कळंबच्या बैठकीत ठरले. जिल्ह्यात विधान परिषदेच्या मतदारांचे तीन गट पडल्याचे चित्र आहे. एक काँग्रेसकडे, दुसरा सेनेकडे तर तिसरा गट ऐनवेळी निर्णय घेऊ अशा भूमिकेत आहे. बाहेरचा उमेदवार काय करणार असा या तिसऱ्या गटाचा सवाल आहे. वास्तविक सेनेच्या पहिल्यांदाच यवतमाळ पाहणाऱ्या उमेदवाराने भविष्यात यवतमाळच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या काय योजना आहेत, याचा कधीही व कुठेही उहापोह केलेला नाही. त्यामुळे यवतमाळची जनता आणि विशेषत: मतदार शिवसेनेच्या या उमेदवाराबाबत संभ्रमात दिसत आहे. हे उमेदवार भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने जनतेला किंवा माध्यमांनाही सविस्तर सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळेच हा संभ्रम वाढला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)