शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विधान परिषदेचे मतदार नेत्यांच्या ‘मध्यस्थी’ने त्रस्त

By admin | Updated: November 17, 2016 01:23 IST

विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने

उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही : ४८ सदस्यांची ‘वजन’ वाढविण्यासाठी कळंबमध्ये बैठक यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार सर्वश्रृत आहे. मात्र त्यात नेते मंडळीच ‘मध्यस्थी’ करीत असल्याने मतदारांना ‘कोण-किती’ याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या मध्यस्थांमुळेच मतदार त्रस्त आहेत.विधान परिषदेसाठी १९ नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असताना मतदारांमधील अस्वस्थता उफाळून आली आहे. कारण आपल्या नावावर मध्यस्थाची भूमिका वठविणारे नेते तर ‘दुकानदारी’ करणार नाही ना अशी हूरहूर या मतदारांना आहे. उमेदवार अद्यापही मध्यस्थांमध्येच गुरफटलेले आहेत. एवढेच नव्हे तर हे मध्यस्थ उमेदवारांना थेट मतदारांपर्यंत पोहचण्यात अप्रत्यक्ष अडथळे निर्माण करीत असल्याची माहिती आहे. उमेदवारांनी थेट आमच्याकडे ‘अ‍ॅप्रोच’ व्हावे, मध्यस्थ-नेत्यांना ‘किंमत’ देण्याची गरज नाही, असा मतदारांमधील सूर आहे. सर्व काही अंधारात आणि थर्ड पार्टी होत असल्याने मतदारांमध्ये उमेदवारांप्रती नाराजी वाढते आहे. अशाच नाराजीतून भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादीतील ४८ सदस्य मंगळवारी एकत्र आले. त्यांची कळंबमध्ये गुप्त बैठक झाली. अपक्षाने काही दिवसांपूर्वी घाटंजीमध्ये मतदारांना आठ बोटे दाखविली होती. ते पाहून शिवसेनेने दोनही पंजे मतदारांपुढे उघड केले. मात्र प्रत्यक्षात सध्या टोकन म्हणून अवघी दोन ते तीन बोटे फिरविली जात असल्याने मतदार संभ्रमात सापडले आहेत. उमेदवारांनी बोलल्याप्रमाणे ‘वजन’ वाढवावे म्हणून दबाव निर्माण करण्याचे कळंबच्या बैठकीत ठरले. जिल्ह्यात विधान परिषदेच्या मतदारांचे तीन गट पडल्याचे चित्र आहे. एक काँग्रेसकडे, दुसरा सेनेकडे तर तिसरा गट ऐनवेळी निर्णय घेऊ अशा भूमिकेत आहे. बाहेरचा उमेदवार काय करणार असा या तिसऱ्या गटाचा सवाल आहे. वास्तविक सेनेच्या पहिल्यांदाच यवतमाळ पाहणाऱ्या उमेदवाराने भविष्यात यवतमाळच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या काय योजना आहेत, याचा कधीही व कुठेही उहापोह केलेला नाही. त्यामुळे यवतमाळची जनता आणि विशेषत: मतदार शिवसेनेच्या या उमेदवाराबाबत संभ्रमात दिसत आहे. हे उमेदवार भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने जनतेला किंवा माध्यमांनाही सविस्तर सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळेच हा संभ्रम वाढला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)