शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

‘आदर्श’साठी निवडलेल्या गावांना समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:59 IST

आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे.

ठळक मुद्देविकासही थांबला : इंद्रठाणा, चिकणी, पाथ्रडमध्ये दैना

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे.महाराष्टÑातील एक हजार ग्रामपंचायतींची मुख्यमंत्र्यांनी आदर्श गावासाठी निवड केली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील २३ गावे आहे. नेर तालुक्यातील इंद्रठाणा, चिकणी, पाथ्रड या तीन गावांचा यामध्ये समावेश आहे. ही गावे आदर्श करण्यासाठी मुख्यमंत्री दूत नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी तयार केलेले विकास आराखडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्षित आहे. त्यामुळे या तीनही गावांचा विकास तर दूर, समस्यांनीच अधिक वेढले आहे. या गावांमध्ये नाल्या, रस्ते नाही. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे. पाथ्रड गोळे हे गाव मुख्यमंत्र्यांनीच नव्हे तर तंटामुक्त व आदर्श ग्राम अंतर्गत विकासाकरीता निवडले गेले. प्रत्यक्ष या गावाची स्थिती पाहता ‘आदर्श’च्या प्रवाहात ते आलेच कसे हा प्रश्न पडतो.इंद्रठाणा येथे रस्ते, पाणी या मुलभूत समस्या मोठ्या प्रमाणात आहे. चिकणी (डो) या गावाला राजकीय पंढरी म्हटले जाते. या गावातील दोघे जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांच्या विकास कामांचे अस्तित्व याठिकाणी कुठेही दिसत नाही. या गावातील ५० टक्के लोक उघड्यावर शौचालयास जातात. सांडपाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी नागरिकांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या स्थितीत ही गावे ‘आदर्र्श’ कशी होईल हा प्रश्न आहे.मुख्यमंत्रिदूत नामधारीआदर्श गावासाठी निवडले गेलेले मुख्यमंत्रिदूत नामधारी ठरत आहे. त्यांना विशेष असा कुठलाही अधिकार नाही. निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो. त्यांनी मांडलेल्या अडचणीही तालुका किंवा जिल्हा प्रशासनाकडून सोडविल्या जात नाही.