शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 13:30 IST

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे.

ठळक मुद्देअनेक गावे पडली ओसरोहयो योजना कुचकामी, कामाच्या शोधात शहराकडे धाव

प्रकाश सातघरे

दिग्रस (यवतमाळ) : दुष्काळी परिस्थिती, शेतातील संपलेली कामे आणि रोजगार हमीच्या कामाबाबत उदासीनता, यामुळे तालुक्यातील शेकडो मजूर कामाच्या शोधात शहरांकडे धाव घेत आहे. यातूनच विठाळा येथील चक्क २०० घरांना टाळे लागले आहे.

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. विठाळा येथे सहज फेरफटका मारला तरी दोन घराआड एका घराला टाळे लागलेले दिसून येते. तेथील ७० टक्के कुटुंब मजुरीवरच गुजराण करतात. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने मजुरांच्या हाताला कामच नाही. सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांसोबत मजूरही रिकाम्या हाताने दिसत आहे. या परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न मजुरांना पडला.

टीचभर पोटाची वितभर खळगी भरण्यासाठी तेथील अनेक कुटुंब आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत आदी शहरांचा रस्ता धरत आहे. गत दोन महिन्यात या गावातून तब्बल १००० च्यावर मजूर रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाले आहे. मुंबई, पुण्यात ही मंडळी बांधकाम, हॉटेल, रंगाई, विटभट्टी आदी कामे करून संसाराचा गाडा हाकत आहे. काही मंडळी शहरानजीकच्या परिसरात विटभट्टीवर काम करताना दिसून येत आहे. विठाळासह तालुक्यातील काही गावांतील अनेक जण सुरत, पुणे येथील कंपनीत कामाला गेले आहे. परिणामी गावातील घरांना टाळे लागलेले दिसून येते. यामुळे उदास झालेले अंगण आणि घराला दिसणारे टाळे पाहून गावाची रौनकच हरविली आहे.

गावातच काम उपलब्ध करून देण्याची गरज

मजुरांचे स्थलांतरण रोखण्यासाठी रोजगार हमीची कामे शासनाच्यावतीने केली जातात. विठाळा येथे पांदण रस्ता, विहिरी आणि शौचालयाचे बांधकाम रोहयोमधून प्रस्तावित आहे. परंतु मोठ्या प्रमाणात काम नसल्याने ही मंडळी शहराकडे धाव घेत आहे. आपल्या मुलाबाळांसह शहरात वास्तव्याला जात आहे. त्यांना गावातच काम उपलब्ध करून दिल्यास त्यांचे स्थलांतरण थांबू शकते. परंतु कुणीही पुढाकार घेत नाही. अशीच अवस्था तालुक्यातील इतरही गावांची आहे.

तालुक्यातुन स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. गावात काम मिळत नसल्याने ही मंडळी बाहेरगावी जातात. परिस्थिती अशीच राहिल्यास विठाळा गाव निर्मनुष्य होण्याची भीती आहे.

शारदा राजेश राठोड, सरपंच, विठाळा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतLabourकामगारHomeसुंदर गृहनियोजन