शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 13:30 IST

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे.

ठळक मुद्देअनेक गावे पडली ओसरोहयो योजना कुचकामी, कामाच्या शोधात शहराकडे धाव

प्रकाश सातघरे

दिग्रस (यवतमाळ) : दुष्काळी परिस्थिती, शेतातील संपलेली कामे आणि रोजगार हमीच्या कामाबाबत उदासीनता, यामुळे तालुक्यातील शेकडो मजूर कामाच्या शोधात शहरांकडे धाव घेत आहे. यातूनच विठाळा येथील चक्क २०० घरांना टाळे लागले आहे.

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. विठाळा येथे सहज फेरफटका मारला तरी दोन घराआड एका घराला टाळे लागलेले दिसून येते. तेथील ७० टक्के कुटुंब मजुरीवरच गुजराण करतात. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने मजुरांच्या हाताला कामच नाही. सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांसोबत मजूरही रिकाम्या हाताने दिसत आहे. या परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न मजुरांना पडला.

टीचभर पोटाची वितभर खळगी भरण्यासाठी तेथील अनेक कुटुंब आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत आदी शहरांचा रस्ता धरत आहे. गत दोन महिन्यात या गावातून तब्बल १००० च्यावर मजूर रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाले आहे. मुंबई, पुण्यात ही मंडळी बांधकाम, हॉटेल, रंगाई, विटभट्टी आदी कामे करून संसाराचा गाडा हाकत आहे. काही मंडळी शहरानजीकच्या परिसरात विटभट्टीवर काम करताना दिसून येत आहे. विठाळासह तालुक्यातील काही गावांतील अनेक जण सुरत, पुणे येथील कंपनीत कामाला गेले आहे. परिणामी गावातील घरांना टाळे लागलेले दिसून येते. यामुळे उदास झालेले अंगण आणि घराला दिसणारे टाळे पाहून गावाची रौनकच हरविली आहे.

गावातच काम उपलब्ध करून देण्याची गरज

मजुरांचे स्थलांतरण रोखण्यासाठी रोजगार हमीची कामे शासनाच्यावतीने केली जातात. विठाळा येथे पांदण रस्ता, विहिरी आणि शौचालयाचे बांधकाम रोहयोमधून प्रस्तावित आहे. परंतु मोठ्या प्रमाणात काम नसल्याने ही मंडळी शहराकडे धाव घेत आहे. आपल्या मुलाबाळांसह शहरात वास्तव्याला जात आहे. त्यांना गावातच काम उपलब्ध करून दिल्यास त्यांचे स्थलांतरण थांबू शकते. परंतु कुणीही पुढाकार घेत नाही. अशीच अवस्था तालुक्यातील इतरही गावांची आहे.

तालुक्यातुन स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. गावात काम मिळत नसल्याने ही मंडळी बाहेरगावी जातात. परिस्थिती अशीच राहिल्यास विठाळा गाव निर्मनुष्य होण्याची भीती आहे.

शारदा राजेश राठोड, सरपंच, विठाळा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतLabourकामगारHomeसुंदर गृहनियोजन