शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 13:30 IST

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे.

ठळक मुद्देअनेक गावे पडली ओसरोहयो योजना कुचकामी, कामाच्या शोधात शहराकडे धाव

प्रकाश सातघरे

दिग्रस (यवतमाळ) : दुष्काळी परिस्थिती, शेतातील संपलेली कामे आणि रोजगार हमीच्या कामाबाबत उदासीनता, यामुळे तालुक्यातील शेकडो मजूर कामाच्या शोधात शहरांकडे धाव घेत आहे. यातूनच विठाळा येथील चक्क २०० घरांना टाळे लागले आहे.

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. विठाळा येथे सहज फेरफटका मारला तरी दोन घराआड एका घराला टाळे लागलेले दिसून येते. तेथील ७० टक्के कुटुंब मजुरीवरच गुजराण करतात. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने मजुरांच्या हाताला कामच नाही. सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांसोबत मजूरही रिकाम्या हाताने दिसत आहे. या परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न मजुरांना पडला.

टीचभर पोटाची वितभर खळगी भरण्यासाठी तेथील अनेक कुटुंब आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत आदी शहरांचा रस्ता धरत आहे. गत दोन महिन्यात या गावातून तब्बल १००० च्यावर मजूर रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाले आहे. मुंबई, पुण्यात ही मंडळी बांधकाम, हॉटेल, रंगाई, विटभट्टी आदी कामे करून संसाराचा गाडा हाकत आहे. काही मंडळी शहरानजीकच्या परिसरात विटभट्टीवर काम करताना दिसून येत आहे. विठाळासह तालुक्यातील काही गावांतील अनेक जण सुरत, पुणे येथील कंपनीत कामाला गेले आहे. परिणामी गावातील घरांना टाळे लागलेले दिसून येते. यामुळे उदास झालेले अंगण आणि घराला दिसणारे टाळे पाहून गावाची रौनकच हरविली आहे.

गावातच काम उपलब्ध करून देण्याची गरज

मजुरांचे स्थलांतरण रोखण्यासाठी रोजगार हमीची कामे शासनाच्यावतीने केली जातात. विठाळा येथे पांदण रस्ता, विहिरी आणि शौचालयाचे बांधकाम रोहयोमधून प्रस्तावित आहे. परंतु मोठ्या प्रमाणात काम नसल्याने ही मंडळी शहराकडे धाव घेत आहे. आपल्या मुलाबाळांसह शहरात वास्तव्याला जात आहे. त्यांना गावातच काम उपलब्ध करून दिल्यास त्यांचे स्थलांतरण थांबू शकते. परंतु कुणीही पुढाकार घेत नाही. अशीच अवस्था तालुक्यातील इतरही गावांची आहे.

तालुक्यातुन स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. गावात काम मिळत नसल्याने ही मंडळी बाहेरगावी जातात. परिस्थिती अशीच राहिल्यास विठाळा गाव निर्मनुष्य होण्याची भीती आहे.

शारदा राजेश राठोड, सरपंच, विठाळा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतLabourकामगारHomeसुंदर गृहनियोजन