शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल

By admin | Updated: March 12, 2017 00:59 IST

तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली.

पाणीटंचाई आढावा बैठक गाजली : नदीत पाणी सोडण्यास विलंब उमरखेड : तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली. आमदार राजेंद्र नजरधने अध्यक्षस्थानी होते. योग्यवेळी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही, असा मुद्दा उपस्थित करीत नदीकाठच्या गावकऱ्यांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले. आमसभेला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, सभापती प्रयागताई कोत्तेवार, उपसभापती विठ्ठल चव्हाण, भाजपाचे सतीश वानखेडे, संदीप हिंगमिरे, बाळासाहेब चंद्रे, बळवंतराव नाईक, भीमराव चंद्रवंशी, सहायक पोलीस निरीक्षक उन्हाळे, सर्व विभागांचे अधिकारी, सर्व तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. आमसभेत सर्वप्रथम तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांचा आढावा घेण्यात आला. कृती आराखड्यात फक्त १६ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दर्शविण्यात आले. परंतु आमसभेत पाणीटंचाईवर चर्चा सुरू असताना बहुसंख्य ग्रामपंचायतींना आगामी एप्रिल-जूनच्या कालावधीत पाणीटंचाईला सामारे जावे लागणार असल्याची बाब पुढे आली. ग्रामीण भागासाठी २० दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा पात्रात सोडण्यासाठी आरक्षित केल्याचे आमदार नजरधने यांनी सांगितले. त्यावर चातारी येथील नागरिकांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले. गरजेच्यावेळी नदीपात्रात कधीच पाणी सोडले जात नाही, असा आक्रोश नागरिकांनी केला. मागील वर्षी या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने करावी लागली, असे आमदारांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिले. सद्यस्थितीत टँकर पुरवठ्याची तरतूद दाखविण्यात आली असली तरी डोंगरगाव, बोथा, पोफाळी, वसंतनगर, बिटरगाव, ढाणकी, टेंभुरदरा, मेट, विडूळ, चातारी, आकोली, ब्राह्मणगाव, बाळदी, कृष्णापूर आणि नदीकाठच्या २५ ते ३० गावांना वेळेपूर्वी नदीपात्रात धरणाचे पाणी सोडले गेले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा बहुतांश सरपंचांनी आमसभेत दिला. कित्येक गावांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु दरवर्षी विहीर अधिग्रहणाचे, नळ दुरुस्तीचे तुणतुणे वाजविले जाते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देण्याची परिस्थिती निर्माण होते, अशी खंत नागरिकांनी आमसभेत व्यक्त केली. काही गावांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाहीत. केवळ कागदी आकड्यांवरच दरवर्षी पाणीटंचाई निवारणाचा खेळ केला जातो, अशीही खंत नागरिकांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)