शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल

By admin | Updated: March 12, 2017 00:59 IST

तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली.

पाणीटंचाई आढावा बैठक गाजली : नदीत पाणी सोडण्यास विलंब उमरखेड : तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली. आमदार राजेंद्र नजरधने अध्यक्षस्थानी होते. योग्यवेळी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही, असा मुद्दा उपस्थित करीत नदीकाठच्या गावकऱ्यांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले. आमसभेला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, सभापती प्रयागताई कोत्तेवार, उपसभापती विठ्ठल चव्हाण, भाजपाचे सतीश वानखेडे, संदीप हिंगमिरे, बाळासाहेब चंद्रे, बळवंतराव नाईक, भीमराव चंद्रवंशी, सहायक पोलीस निरीक्षक उन्हाळे, सर्व विभागांचे अधिकारी, सर्व तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. आमसभेत सर्वप्रथम तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांचा आढावा घेण्यात आला. कृती आराखड्यात फक्त १६ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दर्शविण्यात आले. परंतु आमसभेत पाणीटंचाईवर चर्चा सुरू असताना बहुसंख्य ग्रामपंचायतींना आगामी एप्रिल-जूनच्या कालावधीत पाणीटंचाईला सामारे जावे लागणार असल्याची बाब पुढे आली. ग्रामीण भागासाठी २० दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा पात्रात सोडण्यासाठी आरक्षित केल्याचे आमदार नजरधने यांनी सांगितले. त्यावर चातारी येथील नागरिकांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले. गरजेच्यावेळी नदीपात्रात कधीच पाणी सोडले जात नाही, असा आक्रोश नागरिकांनी केला. मागील वर्षी या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने करावी लागली, असे आमदारांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिले. सद्यस्थितीत टँकर पुरवठ्याची तरतूद दाखविण्यात आली असली तरी डोंगरगाव, बोथा, पोफाळी, वसंतनगर, बिटरगाव, ढाणकी, टेंभुरदरा, मेट, विडूळ, चातारी, आकोली, ब्राह्मणगाव, बाळदी, कृष्णापूर आणि नदीकाठच्या २५ ते ३० गावांना वेळेपूर्वी नदीपात्रात धरणाचे पाणी सोडले गेले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा बहुतांश सरपंचांनी आमसभेत दिला. कित्येक गावांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु दरवर्षी विहीर अधिग्रहणाचे, नळ दुरुस्तीचे तुणतुणे वाजविले जाते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देण्याची परिस्थिती निर्माण होते, अशी खंत नागरिकांनी आमसभेत व्यक्त केली. काही गावांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाहीत. केवळ कागदी आकड्यांवरच दरवर्षी पाणीटंचाई निवारणाचा खेळ केला जातो, अशीही खंत नागरिकांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)