शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल

By admin | Updated: March 12, 2017 00:59 IST

तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली.

पाणीटंचाई आढावा बैठक गाजली : नदीत पाणी सोडण्यास विलंब उमरखेड : तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली. आमदार राजेंद्र नजरधने अध्यक्षस्थानी होते. योग्यवेळी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही, असा मुद्दा उपस्थित करीत नदीकाठच्या गावकऱ्यांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले. आमसभेला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, सभापती प्रयागताई कोत्तेवार, उपसभापती विठ्ठल चव्हाण, भाजपाचे सतीश वानखेडे, संदीप हिंगमिरे, बाळासाहेब चंद्रे, बळवंतराव नाईक, भीमराव चंद्रवंशी, सहायक पोलीस निरीक्षक उन्हाळे, सर्व विभागांचे अधिकारी, सर्व तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. आमसभेत सर्वप्रथम तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांचा आढावा घेण्यात आला. कृती आराखड्यात फक्त १६ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दर्शविण्यात आले. परंतु आमसभेत पाणीटंचाईवर चर्चा सुरू असताना बहुसंख्य ग्रामपंचायतींना आगामी एप्रिल-जूनच्या कालावधीत पाणीटंचाईला सामारे जावे लागणार असल्याची बाब पुढे आली. ग्रामीण भागासाठी २० दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा पात्रात सोडण्यासाठी आरक्षित केल्याचे आमदार नजरधने यांनी सांगितले. त्यावर चातारी येथील नागरिकांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले. गरजेच्यावेळी नदीपात्रात कधीच पाणी सोडले जात नाही, असा आक्रोश नागरिकांनी केला. मागील वर्षी या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने करावी लागली, असे आमदारांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिले. सद्यस्थितीत टँकर पुरवठ्याची तरतूद दाखविण्यात आली असली तरी डोंगरगाव, बोथा, पोफाळी, वसंतनगर, बिटरगाव, ढाणकी, टेंभुरदरा, मेट, विडूळ, चातारी, आकोली, ब्राह्मणगाव, बाळदी, कृष्णापूर आणि नदीकाठच्या २५ ते ३० गावांना वेळेपूर्वी नदीपात्रात धरणाचे पाणी सोडले गेले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा बहुतांश सरपंचांनी आमसभेत दिला. कित्येक गावांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु दरवर्षी विहीर अधिग्रहणाचे, नळ दुरुस्तीचे तुणतुणे वाजविले जाते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देण्याची परिस्थिती निर्माण होते, अशी खंत नागरिकांनी आमसभेत व्यक्त केली. काही गावांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाहीत. केवळ कागदी आकड्यांवरच दरवर्षी पाणीटंचाई निवारणाचा खेळ केला जातो, अशीही खंत नागरिकांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)