शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

ग्रामवासीयांनी काढले ६० तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:43 IST

दिग्रस : तालुक्यातील तुपटाकळी येथे तब्बल ६० तास वीज गुल होती. त्यामुळे ग्रामस्थांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या. संतापलेल्या ...

दिग्रस : तालुक्यातील तुपटाकळी येथे तब्बल ६० तास वीज गुल होती. त्यामुळे ग्रामस्थांना दोन रात्री अंधारात काढाव्या लागल्या. संतापलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक देउन रोष व्यक्त केला.

गेले तीन दिवस व दोन रात्री गावातील अर्ध्या भागातील पुरवठा खंडित होता. दिवसभर वीज कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा केल्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी थेट पोलिसांत धाव घेतली. ठाणेदार सोनाजी आमले यांना निवेदन देऊन रोष व्यक्त केला. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका तुपटाकळी ग्रामवासीयांना बसत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. एका खांबावरील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आहे. तो बदलवून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची गावकऱ्यांनी कित्येकदा महावितरणकडे मागणी केली. मात्र, तीन महिने होऊनही ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आला नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी गावकऱ्यांनी संपर्क केला असता उद्या काम करून देतो, असे आश्वासन दिले. मात्र, वीजपुरवठा सुरू झाला नाही. अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठून सोनाजी आमले यांना आपबिती सांगितली.

बॉक्स

अनुचित प्रकार घडल्यास महावितरण जबाबदार

गावकऱ्यांनी ठाणेदारांना निवेदन देऊन विजेअभावी गावात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास महावितरण कंपनी व त्यांचे अभियंता जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना लक्ष्मण टेकाळे, अल्ताफ पठाण, शंकर भस्मे, निसार पठाण, चंदन जाधव, हरून धारिवाला, जयसिंग चव्हाण, भारत शेलकर, गोपाल क्षीरसागर, पुंडलिक एलधरे व नागरिक उपस्थित होते.