शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

भारताच्या नकाशातून हरवलेले गाव...कापशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:25 IST

भारतातल्या एका माणसाने नुकताच नव्या देशाचा शोध लावला. कोणत्याही देशाची मालकी नसलेला हा भूभाग त्याने ‘किंगडम आॅफ दीक्षित’ म्हणून घोषित केला अन् त्या देशाचा मीच राजा, असे जाहीरही केले...

ठळक मुद्देलोकशाही नव्हे ‘टोळी’राज : ग्रामपंचायत नाही, पण मतदार आहेत, रस्ते, वीज, पाण्याचीही समस्या

किशोर वंजारी ।आॅनलाईन लोकमतनेर : भारतातल्या एका माणसाने नुकताच नव्या देशाचा शोध लावला. कोणत्याही देशाची मालकी नसलेला हा भूभाग त्याने ‘किंगडम आॅफ दीक्षित’ म्हणून घोषित केला अन् त्या देशाचा मीच राजा, असे जाहीरही केले... भारतीय रक्ताचा हा पराक्रम एका बाजूने तर दुसऱ्या बाजूला आपल्याच गावाजवळचे गाव आपण आपल्या देशात समाविष्ट करायला विसरून गेलो आहोत...होय, ब्रिटिश राजवटीत भारताचा भाग असलेले एक गाव आता भारतीय लोकशाही राजवटीत मात्र भारताच्या नकाशावरच नाही. फार दूर नाही आपल्या नेर तालुक्यातच आहे हे दुर्दैवी गाव. कापशी त्याचे नाव. इंग्रज अधिकारी येथे राहायचे. त्यांचे जुने घर येथे आजही कायम आहे. कापशीला इंग्रज काळाचा इतिहास आहे, पण वर्तमान आणि भविष्य नाही.भारत सरकार, महाराष्ट्र सरकार एवढेच काय कोणत्याही ग्रामपंचायतीच्या दफ्तरात या गावाला स्थान नाही. पण मजेची बाब, येथील गावकरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार आहेत!कापशीतील ४६५ लोकसंख्येच्या गरजा कोण भागवित असेल? जगातली सर्वात मजबूत लोकशाही असलेल्या भारतातील हे गाव आजही टोळी संस्कृतीवर जगतेय. गावकरीच दर पाच वर्षांनी एकत्र येतात. एकाला अध्यक्ष बनवितात. तर इतर सात जणांना सदस्य म्हणून नेमतात. हीच कार्यकारिणी गावचा कारभार बघते. कोणतेही काम असेल तर लोकवर्गणी केली जाते. स्वयंघोषित सरपंच या लोकवर्गणीतून गावच्या गरजा भागवतो.दोन ग्रामपंचायतींनी झिडकारलेकापशी गाव ३० वर्षांपूर्वी जांबोरा गटग्रामपंचायतीशी (ता. दारव्हा) संलग्न होते. मात्र जांबोरा गटग्रामपंचायतमधून कापशीला वगळण्यात आले. कापशीपासून तीनच किलोमीटरवर सारंगपूर (ता. नेर) ग्रामपंचायत आहे. मात्र, सारंगपूरच्या गावकऱ्यांनी कापशीचा समावेश आपल्या ग्रामपंचायतीत न करण्याचा ठराव घेतला. तेव्हापासून कापशी भारताच्या नकाशातून गायब झाले ते अजूनही गायबच आहे.ब्रिटीश जहागिरीचे गावकापशी गावात इंग्रज लोक राहात होते. त्याचे घर आजही या गावात अस्तित्वात आहे. मतदारयादीत अजूनही टोनी उर्फ अँथनी विपलेश मेलवील या शेवटच्या काळातील शेवटच्या इंग्रज माणसाचे नाव कायम आहे. टोनीचा मूत्यू दोन वर्षांपूर्वीच झाला. त्यानंतर त्याच्या मुली जबलपूरला गेल्या. टोनीच्या पूर्वजांकडे सारंगपूर व कापशी या दोन गावची जहागीरदारी होती, असे या गावातील ८० वर्षीय पंढरी पांडुरंग खेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टोनी गेला आणि कोणी वालीच उरला नाही.आम्ही मतदार, पण लाभार्थी नाहीनेर तालुक्यातील कापशी गावाची व्यथा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षकापशी गाव कोणत्याच ग्रामपंचायतीत नाही. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात या गावाचा समावेश आहे. त्यामुळे कापशीवासी कागदोपत्री भारतीय नसले तरी मतदार आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक येताच या गावाकडे सर्वांचे लक्ष जाते. दौरे होतात. पुढे काहीच नाही.कापशी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायतही नाही. पण सोनवाढोणा पंचायत समिती आणि मांगलादेवी जिल्हा परिषद सर्कलमध्ये या गावाचा समावेश आहे. केवळ या निवडणुकीपुरतेच लोकप्रतिनिधी गावात प्राचाराला येतात. निवडणुकीनंतर कापशी कुठे आहे, कशी आहे हे कुणीही विचारत नाही. हातपाय जोडून थकलो पण गावाचे भविष्य अंधारात आहे, अशी व्यथा येथील वयोवृद्ध पुंडलिक पानचोरे यांनी व्यक्त केली.सध्या अध्यक्ष सचिन खेरे, सदस्य येणूबाई मुरतुळे, गोपाळ विसनकर, शोभा डोंगरे, प्रवीण खेरे, राजू देवकर, प्रफुल्ल वासनीक ही ‘बॉडी’ काम पाहात आहे. लोकशाहीत जागा न मिळालेल्या या गावातील आदिवासी लोक गुरांसारखं जीवन जगतात. पाणी, वीज, नाल्या अशा एक ना अनेक समस्यांनी हे गाव अक्षरश: ग्रस्त आहे.तरुणांचे लग्नाचे वांदेकापशी गावाचे नाव नकाशातून गायब आहे. गावात समस्यांची जंत्री आहे. कागदपत्रांचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे गावकऱ्यांना भविष्य नावाची गोष्टच उरलेली नाही. अशा गावात कुणीही सोयरिक संबंध करायला तयार नाही. कापशीच्या कोणत्याही तरुणाला मुलगी द्यायला कुणीही सहजासहजी राजी होत नाही. यामुळे कित्येक तरुण या गावात मी कशाला जन्मलो म्हणून पश्चात्ताप करीत आहेत.आता गाव सोडण्याची तयारीकापशीमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून ३४ विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्यासाठी दोन शिक्षक आहे. पण आरोग्याची सोय नाही. पाणीपुरवठ्याची व्यवस्था नाही. सांडपाणी, रस्ते अशी कोणतीच व्यवस्था नाही. जांबोरा-कापशी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचे फलक लावून आहे. पण हा रस्ता कधीच झाला नाही. रस्ताच नसल्याने एसटी बसही या गावाने पाहिली नाही. गावात स्मशानभूमी नाही. ४० वर्षानंतर या गावात पहिल्यांदा कुणाला तरी सरकारी नोकरी लागल्याचे सरपंच (ग्रामस्थांनी घोषित केलेले) सचिन खेरे यांनी सांगितले. जन्मतारखेच्या नोंदी असो की, कोणतेही कागदपत्र असो ते सर्व अडगळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता गाव सोडण्याची तयारी सुरू केली आहे.९ वर्षांपासून प्रस्ताव धूळ खात२००८ पासून या गावाला जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमधून कोणताही निधी या गावाला मिळालेला नाही. कापशी गावात ग्रामपंचायत व्हावी यासाठी २००९ मध्ये पहिल्यांदा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र ९ वर्षांपासून या प्रस्तावाकडे प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. कोणताच निधी येत नसल्याने नाल्या, रस्ते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था कोलमडली आहे.