शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गावे १२५, ग्रामसेवक ५६

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

ग्रामीण जनता आणि प्रशासनाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकाची उमरखेड तालुक्यात अनेक पदे रिक्त आहे. सध्या तर १२५ गावांच्या ९२ ग्रामपंचायतीसाठी केवळ ५६ ग्रामसेवक आहे. त्यातही अर्धेअधिक

उमरखेड (कुपटी) : ग्रामीण जनता आणि प्रशासनाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकाची उमरखेड तालुक्यात अनेक पदे रिक्त आहे. सध्या तर १२५ गावांच्या ९२ ग्रामपंचायतीसाठी केवळ ५६ ग्रामसेवक आहे. त्यातही अर्धेअधिक ग्रामसेवक शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यामुळे विकासाचे तीन-तेरा वाजले असून अनेक गावात महिनोंमहिने ग्रामसेवकाचे दर्शनच होत नाही. ग्रामीण भागात शासनाच्या योजना पोहोचविणे आणि जनतेच्या समस्या दूर करणे ही महत्वाची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. मात्र उमरखेड तालुक्यात आता ग्रामसेवकच समस्या होऊ पाहत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. उमरखेड तालुक्यात अनेक गावात ग्रामसेवकांचे दर्शनच होत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना माहीत होत नाही. उलट मजुरी पाडून शहराच्या ठिकाणी ग्रामसेवकाला शोधावे लागते. अनेक ग्रामसेवक १५ दिवसांपासून किंवा आठवड्यातून एकदा आपल्या कर्तव्याच्या गावी दिसतात. उर्वरित सहा दिवस घरी आराम करतात. पंचायत समितीचे दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रकार बंद झाला नाही. त्यामुळे आता नागरिकांनी तक्रारी करणेही सोडून दिले आहे. एखाद्या गावात गैरप्रकार उघडकीस आल्यास संबंधित ग्रामसेवक वरिष्ठांच्या संगनमताने त्वरित ग्रामपंचायत बदलून घेतो. या प्रकाराला आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याला आधीच चहा-पाणी झालेले असते. ग्रामीण भागातील विकासाला बळकटी देणारी संस्था असली तरी सध्या ग्रामसेवकच दिसत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. अनेक गावात साथीचे आजार पसरले आहे. परंतु ग्रामसेवकांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. गावाच्या स्वच्छतेकडेही ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. कुणी विचारणा केली तर आम्ही करणार तरी काय आमच्याकडे तीन-तीन ग्रामपंचायतीचा कारभार असल्याचे सांगतात. काही ग्रामसेवकांवर कामाचा बोझा असला तरी इतर ग्रामसेवक मात्र तीनही गावातील नागरिकांना वेगवेगळी कारणे सांगतात आणि सदर ग्रामसेवक तीनही गावाऐवजी घरीच आराम करीत असतो. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)