शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पीक विम्याकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा

By admin | Updated: December 24, 2014 23:08 IST

यावर्षी मारेगाव तालुक्याची पीक आणेवारी ५० पैशाच्या खाली आहे. आता दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.

मारेगाव : यावर्षी मारेगाव तालुक्याची पीक आणेवारी ५० पैशाच्या खाली आहे. आता दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. यावर्षी तरी विमा कंपन्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हे वर्ष शेतकऱ्यांसाठी नापिकीचे ठरले आहे. लावलेला खर्र्चही न निघाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना फार मोठी आर्थिक मदतीची अपेक्षा होती. परंतु हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेल्याने आणि शेतमालाचे भावही गडगडल्याने निराशेच्या गर्देत शेतकरी सापडले आहे.आता शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याकडे लागल्या आहे. यावर्षी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतून सक्तीने पीक विम्याची रक्कम कापून घेतली. त्यावेळी या निर्णयाला सर्वस्तरातून विरोध झाला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून व कोटींच्यावर हवामानावर आधारित पीक विमा काढण्यात आला. एवढी मोठी रक्कम पीक विम्यात गुंतविल्याने आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देत नसल्याने, गुंतविलेल्या पैशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.आता हाच पीक विमा शेतकऱ्यांना तारणहार ठरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र अजूनही पीक विमा मिळणार की नाही, याबद्दल कुणीच काही बोलत नाही. त्यामुळे विमा कंपन्या यावर्षीही आपली फसवणूक तर करणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे. याबाबत सक्तीने पीक विमा काढणाऱ्या बँकाही काही बोलायला तयार नाही. शासन व विमा कंपन्या मूग गिळून चूप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळणार की नाही, याची हुरहूर लागली आहे. शासन व पीक विमा कंपन्यांनी विम्या संबंधातील धोरण त्वरित जाहीर करून दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)