शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

विदर्भाच्या पाण्याचा तेलंगणा-आंध्रात वापर; आमदारांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:25 IST

शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्देगोदावरी खोऱ्यातील पाण्याचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.गोदावरी खोऱ्यात विदर्भाला लवादाने १९ हजार १९० दलघमी पाणी दिले. परंतु बांधकामासाठी प्रकल्प हाती न घेतल्यामुळे चार हजार ३८८ दलघमी आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे सात हजार ७१३ दलघमी असे असून १२ हजार १०० दलघमी पाणी अद्याप वापरात आले नाही. त्यामुळे हे पाणी आंध्र व तेलंगणा ही राज्ये वापरत असल्याचा मुद्दा पाच आमदारांनी उपस्थित केला आहे. शिवाय बांधकामाधीन प्रकल्पांमुळे तापी खोऱ्यातील विदर्भाच्या वाट्याचे पाणी अद्याप मिळाले नाही, याकडे लक्ष वेधले गेले. मात्र ही बाब खरी नसल्याचे सांगत शासनाने विदर्भाला मिळणाऱ्या पाण्याचा हिशेब मांडला.पाणी उपलब्धता झाली कमीगोदावरी पाणी तंटा लवादानुसार विदर्भाला १९ हजार १९० दलघमी पाणी द्यायचे होते. मात्र २०१४ पासून पाणी उपलब्धता कमी झाल्याने गोदावरी खोऱ्यातून १८ हजार ५७ दलघमी पाणी वापराकरिता उपलब्ध होत आहे.यातून पूर्ण प्रकल्पाचे ५९५६ दलघमी व नदीवरून बिगर सिंचन वापर ५२१ दलघमी असा ६४७७ दलघमी पाणी वापर निश्चित झाला आहे. आठ हजार १०३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प अद्याप बांधकामाधीन आहेत तर चार हजार २४३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प नियोजनाधीन असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.वने व पर्यावरणामुळे विलंबबांधकामाधीन व नियोजनातील प्रकल्पास होणाऱ्या विलंबामागे वने व पर्यावरण खात्याकडून मान्यतेला बराच अवधी लागत असल्याचे कारण शासनाकडून पुढे केले गेले आहे. तापी खोऱ्यामध्ये दोन हजार ६०७ दलघमी पाणी उपलब्ध असून त्याचे नियोजन झाल्याचेही शासनाकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी