शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विदर्भाच्या पाण्याचा तेलंगणा-आंध्रात वापर; आमदारांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:25 IST

शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्देगोदावरी खोऱ्यातील पाण्याचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.गोदावरी खोऱ्यात विदर्भाला लवादाने १९ हजार १९० दलघमी पाणी दिले. परंतु बांधकामासाठी प्रकल्प हाती न घेतल्यामुळे चार हजार ३८८ दलघमी आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे सात हजार ७१३ दलघमी असे असून १२ हजार १०० दलघमी पाणी अद्याप वापरात आले नाही. त्यामुळे हे पाणी आंध्र व तेलंगणा ही राज्ये वापरत असल्याचा मुद्दा पाच आमदारांनी उपस्थित केला आहे. शिवाय बांधकामाधीन प्रकल्पांमुळे तापी खोऱ्यातील विदर्भाच्या वाट्याचे पाणी अद्याप मिळाले नाही, याकडे लक्ष वेधले गेले. मात्र ही बाब खरी नसल्याचे सांगत शासनाने विदर्भाला मिळणाऱ्या पाण्याचा हिशेब मांडला.पाणी उपलब्धता झाली कमीगोदावरी पाणी तंटा लवादानुसार विदर्भाला १९ हजार १९० दलघमी पाणी द्यायचे होते. मात्र २०१४ पासून पाणी उपलब्धता कमी झाल्याने गोदावरी खोऱ्यातून १८ हजार ५७ दलघमी पाणी वापराकरिता उपलब्ध होत आहे.यातून पूर्ण प्रकल्पाचे ५९५६ दलघमी व नदीवरून बिगर सिंचन वापर ५२१ दलघमी असा ६४७७ दलघमी पाणी वापर निश्चित झाला आहे. आठ हजार १०३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प अद्याप बांधकामाधीन आहेत तर चार हजार २४३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प नियोजनाधीन असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.वने व पर्यावरणामुळे विलंबबांधकामाधीन व नियोजनातील प्रकल्पास होणाऱ्या विलंबामागे वने व पर्यावरण खात्याकडून मान्यतेला बराच अवधी लागत असल्याचे कारण शासनाकडून पुढे केले गेले आहे. तापी खोऱ्यामध्ये दोन हजार ६०७ दलघमी पाणी उपलब्ध असून त्याचे नियोजन झाल्याचेही शासनाकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी