शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विदर्भाच्या पाण्याचा तेलंगणा-आंध्रात वापर; आमदारांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:25 IST

शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्देगोदावरी खोऱ्यातील पाण्याचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने बांधकाम प्रकल्प हाती न घेतल्यामुळे गोदावरी खोऱ्यातून विदर्भाच्या वाट्याला येणारे पाणी लगतचे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्य वापरत असल्याच्या गंभीर बाबीकडे काही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.गोदावरी खोऱ्यात विदर्भाला लवादाने १९ हजार १९० दलघमी पाणी दिले. परंतु बांधकामासाठी प्रकल्प हाती न घेतल्यामुळे चार हजार ३८८ दलघमी आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे सात हजार ७१३ दलघमी असे असून १२ हजार १०० दलघमी पाणी अद्याप वापरात आले नाही. त्यामुळे हे पाणी आंध्र व तेलंगणा ही राज्ये वापरत असल्याचा मुद्दा पाच आमदारांनी उपस्थित केला आहे. शिवाय बांधकामाधीन प्रकल्पांमुळे तापी खोऱ्यातील विदर्भाच्या वाट्याचे पाणी अद्याप मिळाले नाही, याकडे लक्ष वेधले गेले. मात्र ही बाब खरी नसल्याचे सांगत शासनाने विदर्भाला मिळणाऱ्या पाण्याचा हिशेब मांडला.पाणी उपलब्धता झाली कमीगोदावरी पाणी तंटा लवादानुसार विदर्भाला १९ हजार १९० दलघमी पाणी द्यायचे होते. मात्र २०१४ पासून पाणी उपलब्धता कमी झाल्याने गोदावरी खोऱ्यातून १८ हजार ५७ दलघमी पाणी वापराकरिता उपलब्ध होत आहे.यातून पूर्ण प्रकल्पाचे ५९५६ दलघमी व नदीवरून बिगर सिंचन वापर ५२१ दलघमी असा ६४७७ दलघमी पाणी वापर निश्चित झाला आहे. आठ हजार १०३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प अद्याप बांधकामाधीन आहेत तर चार हजार २४३ दलघमी पाणी वापराचे प्रकल्प नियोजनाधीन असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.वने व पर्यावरणामुळे विलंबबांधकामाधीन व नियोजनातील प्रकल्पास होणाऱ्या विलंबामागे वने व पर्यावरण खात्याकडून मान्यतेला बराच अवधी लागत असल्याचे कारण शासनाकडून पुढे केले गेले आहे. तापी खोऱ्यामध्ये दोन हजार ६०७ दलघमी पाणी उपलब्ध असून त्याचे नियोजन झाल्याचेही शासनाकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी