शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

विदर्भात ६० हजार हेक्टरमधील पिकांवर मोड येण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:01 IST

येत्या दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास अमरावती विभागातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भ दुबार पेरणीची वेळ गेली, सरासरी उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास अमरावती विभागातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये खरिपाचे ३२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कपाशी व सोयाबीनचा पेरा होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचा पेरा दहा टक्क्याने वाढला आहे. अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात कपाशी तर अकोला, वाशिममध्ये सोयाबीनचा पेरा अधिक आहे. परंतु यावर्षी पावसाची स्थिती पाहता सर्वच पिकांचे सरासरी उत्पादन घटणार आहे. मुळातच काही भागात पेरणी कमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये ६० टक्केच पेरणी झाली. पावसाअभावी सर्वच जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. पुढील दोन-चार दिवसात पाऊस न पडल्यास पाचही जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची स्थिती आहे. त्यात सर्वाधिक ४० हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील आहे. वाशिम दहा हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे कृषी सूत्रांनी सांगितले. मुळात पाऊसच नसल्याने आता दुबार पेरणीही साधणार नाही. त्यामुळे शेतकºयांना रबी हंगामावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यातही पाण्याची उपलब्धता कशी राहते यावर सर्व भिस्त आहे.सहसंचालकांचा प्रभार वाशिमकडेअमरावतीच्या कृषी सहसंचालकांची पदोन्नतीवर पुण्याला बदली झाली. ते तेथे सेवानिवृत्तही झाले. तेव्हापासून अमरावतीच्या कृषी सहसंचालकांचे पद रिक्त आहे. आतापर्यंत या पदाचा अतिरिक्त प्रभार यवतमाळचे अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्याकडे होता. परंतु पुणे येथील बदलीवर ते गुरुवारी कार्यमुक्त झाल्याने सहसंचालकांचा प्रभार आता वाशिमच्या कृषी अधीक्षकांकडे देण्यात आला आहे.