शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विदर्भात ६० हजार हेक्टरमधील पिकांवर मोड येण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:01 IST

येत्या दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास अमरावती विभागातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भ दुबार पेरणीची वेळ गेली, सरासरी उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास अमरावती विभागातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये खरिपाचे ३२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कपाशी व सोयाबीनचा पेरा होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचा पेरा दहा टक्क्याने वाढला आहे. अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात कपाशी तर अकोला, वाशिममध्ये सोयाबीनचा पेरा अधिक आहे. परंतु यावर्षी पावसाची स्थिती पाहता सर्वच पिकांचे सरासरी उत्पादन घटणार आहे. मुळातच काही भागात पेरणी कमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये ६० टक्केच पेरणी झाली. पावसाअभावी सर्वच जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. पुढील दोन-चार दिवसात पाऊस न पडल्यास पाचही जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची स्थिती आहे. त्यात सर्वाधिक ४० हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील आहे. वाशिम दहा हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे कृषी सूत्रांनी सांगितले. मुळात पाऊसच नसल्याने आता दुबार पेरणीही साधणार नाही. त्यामुळे शेतकºयांना रबी हंगामावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यातही पाण्याची उपलब्धता कशी राहते यावर सर्व भिस्त आहे.सहसंचालकांचा प्रभार वाशिमकडेअमरावतीच्या कृषी सहसंचालकांची पदोन्नतीवर पुण्याला बदली झाली. ते तेथे सेवानिवृत्तही झाले. तेव्हापासून अमरावतीच्या कृषी सहसंचालकांचे पद रिक्त आहे. आतापर्यंत या पदाचा अतिरिक्त प्रभार यवतमाळचे अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्याकडे होता. परंतु पुणे येथील बदलीवर ते गुरुवारी कार्यमुक्त झाल्याने सहसंचालकांचा प्रभार आता वाशिमच्या कृषी अधीक्षकांकडे देण्यात आला आहे.