शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ६० हजार हेक्टरमधील पिकांवर मोड येण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:01 IST

येत्या दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास अमरावती विभागातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भ दुबार पेरणीची वेळ गेली, सरासरी उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या दोन-चार दिवसात पाऊस न आल्यास अमरावती विभागातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये खरिपाचे ३२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कपाशी व सोयाबीनचा पेरा होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचा पेरा दहा टक्क्याने वाढला आहे. अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात कपाशी तर अकोला, वाशिममध्ये सोयाबीनचा पेरा अधिक आहे. परंतु यावर्षी पावसाची स्थिती पाहता सर्वच पिकांचे सरासरी उत्पादन घटणार आहे. मुळातच काही भागात पेरणी कमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये ६० टक्केच पेरणी झाली. पावसाअभावी सर्वच जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. पुढील दोन-चार दिवसात पाऊस न पडल्यास पाचही जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर मोड येण्याची स्थिती आहे. त्यात सर्वाधिक ४० हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील आहे. वाशिम दहा हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे कृषी सूत्रांनी सांगितले. मुळात पाऊसच नसल्याने आता दुबार पेरणीही साधणार नाही. त्यामुळे शेतकºयांना रबी हंगामावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यातही पाण्याची उपलब्धता कशी राहते यावर सर्व भिस्त आहे.सहसंचालकांचा प्रभार वाशिमकडेअमरावतीच्या कृषी सहसंचालकांची पदोन्नतीवर पुण्याला बदली झाली. ते तेथे सेवानिवृत्तही झाले. तेव्हापासून अमरावतीच्या कृषी सहसंचालकांचे पद रिक्त आहे. आतापर्यंत या पदाचा अतिरिक्त प्रभार यवतमाळचे अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्याकडे होता. परंतु पुणे येथील बदलीवर ते गुरुवारी कार्यमुक्त झाल्याने सहसंचालकांचा प्रभार आता वाशिमच्या कृषी अधीक्षकांकडे देण्यात आला आहे.