शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

आझाद मैदानातील विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 9:45 PM

स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी ज्या आझाद मैदानातून पेटविली गेली. घाणीच्या साम्राज्याने त्या आझाद मैदानाचे पावित्र्य संपुष्टात आणले आहे. या ठिकाणचा विजयस्तंभही गटाराने वेढला गेला आहे.

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी ज्या आझाद मैदानातून पेटविली गेली. घाणीच्या साम्राज्याने त्या आझाद मैदानाचे पावित्र्य संपुष्टात आणले आहे. या ठिकाणचा विजयस्तंभही गटाराने वेढला गेला आहे. यामुळे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हुतात्म्यांना या ठिकाणचे वातावरण पाहून प्रचंड वेदना होत असेल.महात्मा गांधीनी मिठाचा सत्याग्रह याच मैदानात केला होता. त्यावेळी एका भल्यामोठ्या कढईत मीठ ओतून स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनाचे बिगूल फुंकण्यात आले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी लाठीचार्ज केला होता. यामुळे या ठिकाणच्या चौकाला पाच कंदील चौक असे नावही पडले होते.या आझाद मैदानात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लोकनायक बापूजी अणे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सभा झाल्या आहे. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचे केंद्र बिंदू आझाद मैदानच होते. या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाºया शहिदांची नावे विजयस्तंभावर कोरण्यात आली आहे.नगरभवनाच्या परिसरात हे स्तंभ आजही साक्ष देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे प्रतीक म्हणून मध्यभागी विजयस्तंभ दिमाखात उभा आहे. या विजयस्तंभाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यानंतर हा विजयस्तंभ बेवारस पडून आहे. या स्तंभाजवळ प्रचंड घाण साचली आहे. क्रांतीदिनीही असेच चित्र या ठिकाणचे होते. १४ आॅगस्टच्या सायंकाळी अशीच स्थिती होती. गटाराचे लोट विजयस्तंभाच्या भोवताली होते. या मैदानात चहू बाजूने कचराच कचरा आहे.केवळ १५ आॅगस्ट, २६ जानेवारीलाच आठवणया ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनाचे या ठिकाणाकडे दुर्लक्ष झाले आहे. हे ठिकाणी एखाद्या पोडावरील मैदानासारखे बेवारस असल्याचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. २६ जानेवारी, ९ आॅगस्ट आणि १५ आॅगस्ट या दिवशीच या ठिकाणावर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले जाते. यानंतर या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले जात नाही.