शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

आझाद मैदानातील विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:46 IST

स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी ज्या आझाद मैदानातून पेटविली गेली. घाणीच्या साम्राज्याने त्या आझाद मैदानाचे पावित्र्य संपुष्टात आणले आहे. या ठिकाणचा विजयस्तंभही गटाराने वेढला गेला आहे.

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी ज्या आझाद मैदानातून पेटविली गेली. घाणीच्या साम्राज्याने त्या आझाद मैदानाचे पावित्र्य संपुष्टात आणले आहे. या ठिकाणचा विजयस्तंभही गटाराने वेढला गेला आहे. यामुळे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हुतात्म्यांना या ठिकाणचे वातावरण पाहून प्रचंड वेदना होत असेल.महात्मा गांधीनी मिठाचा सत्याग्रह याच मैदानात केला होता. त्यावेळी एका भल्यामोठ्या कढईत मीठ ओतून स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनाचे बिगूल फुंकण्यात आले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी लाठीचार्ज केला होता. यामुळे या ठिकाणच्या चौकाला पाच कंदील चौक असे नावही पडले होते.या आझाद मैदानात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लोकनायक बापूजी अणे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सभा झाल्या आहे. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचे केंद्र बिंदू आझाद मैदानच होते. या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाºया शहिदांची नावे विजयस्तंभावर कोरण्यात आली आहे.नगरभवनाच्या परिसरात हे स्तंभ आजही साक्ष देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे प्रतीक म्हणून मध्यभागी विजयस्तंभ दिमाखात उभा आहे. या विजयस्तंभाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यानंतर हा विजयस्तंभ बेवारस पडून आहे. या स्तंभाजवळ प्रचंड घाण साचली आहे. क्रांतीदिनीही असेच चित्र या ठिकाणचे होते. १४ आॅगस्टच्या सायंकाळी अशीच स्थिती होती. गटाराचे लोट विजयस्तंभाच्या भोवताली होते. या मैदानात चहू बाजूने कचराच कचरा आहे.केवळ १५ आॅगस्ट, २६ जानेवारीलाच आठवणया ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनाचे या ठिकाणाकडे दुर्लक्ष झाले आहे. हे ठिकाणी एखाद्या पोडावरील मैदानासारखे बेवारस असल्याचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. २६ जानेवारी, ९ आॅगस्ट आणि १५ आॅगस्ट या दिवशीच या ठिकाणावर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले जाते. यानंतर या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले जात नाही.