शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

इचोरात महिलेचा बळी तर घुईत ग्रामसेवकाला कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 21:36 IST

यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी पेटले : थकीत वीज बिलाने कृत्रिम पाणीटंचाई

ऑनलाईन लोकमतआर्णी/सोनखास : यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. यावरून जिल्ह्यातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव पुढे येत आहे.आर्णी तालुक्यात पाणीटंचाईने पेट घेतला आहे. अनेक गावात पाणी असतानाही वीज वितरणने खंडित केलेल्या वीज पुरवठ्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या कृत्रिम पाणीटंचाईने महिलेचा बळी घेतला. इचोरा येथील शांताबाई उर्फ शेवंतीबाई डोमा पवार (५०) या महिलेचा बुधवारी पहाटे ५ वाजता गावानजीकच्या शिवारातील विहिरीत पडून मृत्यू झाला. इचोरा येथील ग्रामपंचायतीकडे वीज वितरणचे सात लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे दहा दिवसापूर्वी या गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. सर्व कामधंदे सोडून नागरिक शेतशिवारातून पाणी आणत आहे. अशाच बुधवारी पहाटे ५ वाजता शांताबाई पवार स्मशानभूमीजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. पहाटेची वेळ असल्याने ती एकटीच पाणी भरत होती. त्यावेळी तिचा तोल गेला असावा आणि ती दोर-बादलीसह विहिरीत पडली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास विहिरीच्या काठावर काही नागरिकांना रिकामा गुंड दिसला. परंतु तेथे कुणीच नव्हते. त्यामुळे विहिरीत डोकावून बघितले असता एक महिला विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा शांताबाई पवार यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे पुढे आले.इचोरा गावात भरपूर पाणी आहे. परंतु नियोजनाअभावी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत सरपंच संदीप वंजारे यांना विचारले असता कर वसुली नसल्यामुळे आम्ही बिल भरु शकलो नाही. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातून पूर्वी पैसे वापरण्याची तरतूद होती. परंतु आता शासनाने नियम बदलविले आहे. यातून रक्कम वळविता येत नसल्याचे सांगितले.नेर तालुक्यातही पाणीटंचाई उग्र झाली आहे. गावागावात पाण्यासाठी नागरिक संतप्त आहे. घुई येथेही महिनाभरापासून नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहे. ग्रामसेवक कोणत्याही उपाययोजना करीत नाही. दरम्यान बुधवारी सकाळी १२ वाजता ग्रामसेवक मनोहर मालखेडे १५ दिवसानंतर गावात आले. गावकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामसेवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. त्यानंतर या घटनेची माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तासाभराने ग्रामसेवकाची सुटका केली. महिलांनीही या ग्रामसेवकाला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान विस्तार अधिकारी आर.डी. डाबरे यांनी गावाला भेट दिली. यावेळी सरपंच अरुणा आडे व उपसरपंच नरेश राठोड उपस्थित होते.आर्णी पंचायत समिती सभापतींचेच गाव तहानलेलेआर्णी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत शंकरलाल जाधव हे तालुक्यातील इचोरा गावचे रहिवासी आहे. संपूर्ण पंचायत समितीचा कारभार पाहणाऱ्या सभापतीच्याच गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे एका महिलेचा बळी गेला. असे किती बळी जाणार असे म्हणत इचोरा येथील नागरिकांनी बुधवारी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Waterपाणी