शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

इचोरात महिलेचा बळी तर घुईत ग्रामसेवकाला कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 21:36 IST

यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले.

ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी पेटले : थकीत वीज बिलाने कृत्रिम पाणीटंचाई

ऑनलाईन लोकमतआर्णी/सोनखास : यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. यावरून जिल्ह्यातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव पुढे येत आहे.आर्णी तालुक्यात पाणीटंचाईने पेट घेतला आहे. अनेक गावात पाणी असतानाही वीज वितरणने खंडित केलेल्या वीज पुरवठ्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या कृत्रिम पाणीटंचाईने महिलेचा बळी घेतला. इचोरा येथील शांताबाई उर्फ शेवंतीबाई डोमा पवार (५०) या महिलेचा बुधवारी पहाटे ५ वाजता गावानजीकच्या शिवारातील विहिरीत पडून मृत्यू झाला. इचोरा येथील ग्रामपंचायतीकडे वीज वितरणचे सात लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे दहा दिवसापूर्वी या गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. सर्व कामधंदे सोडून नागरिक शेतशिवारातून पाणी आणत आहे. अशाच बुधवारी पहाटे ५ वाजता शांताबाई पवार स्मशानभूमीजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. पहाटेची वेळ असल्याने ती एकटीच पाणी भरत होती. त्यावेळी तिचा तोल गेला असावा आणि ती दोर-बादलीसह विहिरीत पडली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास विहिरीच्या काठावर काही नागरिकांना रिकामा गुंड दिसला. परंतु तेथे कुणीच नव्हते. त्यामुळे विहिरीत डोकावून बघितले असता एक महिला विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा शांताबाई पवार यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे पुढे आले.इचोरा गावात भरपूर पाणी आहे. परंतु नियोजनाअभावी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत सरपंच संदीप वंजारे यांना विचारले असता कर वसुली नसल्यामुळे आम्ही बिल भरु शकलो नाही. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातून पूर्वी पैसे वापरण्याची तरतूद होती. परंतु आता शासनाने नियम बदलविले आहे. यातून रक्कम वळविता येत नसल्याचे सांगितले.नेर तालुक्यातही पाणीटंचाई उग्र झाली आहे. गावागावात पाण्यासाठी नागरिक संतप्त आहे. घुई येथेही महिनाभरापासून नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहे. ग्रामसेवक कोणत्याही उपाययोजना करीत नाही. दरम्यान बुधवारी सकाळी १२ वाजता ग्रामसेवक मनोहर मालखेडे १५ दिवसानंतर गावात आले. गावकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामसेवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. त्यानंतर या घटनेची माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तासाभराने ग्रामसेवकाची सुटका केली. महिलांनीही या ग्रामसेवकाला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान विस्तार अधिकारी आर.डी. डाबरे यांनी गावाला भेट दिली. यावेळी सरपंच अरुणा आडे व उपसरपंच नरेश राठोड उपस्थित होते.आर्णी पंचायत समिती सभापतींचेच गाव तहानलेलेआर्णी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत शंकरलाल जाधव हे तालुक्यातील इचोरा गावचे रहिवासी आहे. संपूर्ण पंचायत समितीचा कारभार पाहणाऱ्या सभापतीच्याच गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे एका महिलेचा बळी गेला. असे किती बळी जाणार असे म्हणत इचोरा येथील नागरिकांनी बुधवारी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Waterपाणी