शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील शंकर व माधव ठरले व्यवस्थेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:25 IST

यवतमाळ जिल्ह्यात शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले.

ठळक मुद्देकर्जमाफीनंतरही धग कायम

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. जिल्ह्यात झालेल्या या दोन शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण राज्य हादरुन गेले. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने या दोघांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले. तर अनेक शेतकरी हातात विषाचा प्याला घेऊन फिरत आहे. त्यांना वेळीच सावरले नाही तर मृत्यूचे तांडव असेच सुरू राहणार.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध जिल्हा. शेकडो शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्या. शासन बदलले, प्रशासन गतिमान झाले, विविध शासकीय योजना आल्या. परंतु शेतकऱ्यांच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडला नाही.कोट्यवधींच्या योजना आणि पॅकेज येऊनही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत त्याचा लाभच गेला नाही. अलिकडेच शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी दिली. मात्र या कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवून कर्जमाफीच्या यादीत आपले नाव शोधत आहे. आपल्या बरोबरीच्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहे. आपलेच नाव का नाही, अशातूनही शेतकरी निराश होत आहे.घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने पंतप्रधानांच्या नावे थेट चिठ्ठी लिहून आपल्याला कर्जमाफीचा फायदा झाला नाही, त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही, अशी भूमिका कुटुंबाने घेतल्याने तीन दिवस मृतदेह शवागारात होता. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने सोपस्कार पार पाडले.कुटुंबियांची समजूत काढण्यात यश मिळविले. शंकरची चिता धगधगत असताना उमरखेडच्या इवळेश्वर येथील माधव रावते यांनी स्वत:च सरण रचून आत्महत्या केली. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या या वृद्धावर आयुष्याच्या सायंकाळी अशी दुर्दैवी वेळ आली. दोन दिवसानंतर या आत्महत्येला वाचा फुटली. शासन-प्रशासन हादरुन गेले.जिल्ह्यात शंकर आणि माधव सारखे अनेक शेतकरी आहे. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईनच्या जाचातून आणि विविध प्रक्रियेतून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने दिलेली कर्जमाफीतील त्रुटी आता शेतकऱ्यांच्या जीवावर तर उलटत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या