शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

यवतमाळ जिल्ह्यातील शंकर व माधव ठरले व्यवस्थेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:25 IST

यवतमाळ जिल्ह्यात शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले.

ठळक मुद्देकर्जमाफीनंतरही धग कायम

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. जिल्ह्यात झालेल्या या दोन शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण राज्य हादरुन गेले. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने या दोघांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले. तर अनेक शेतकरी हातात विषाचा प्याला घेऊन फिरत आहे. त्यांना वेळीच सावरले नाही तर मृत्यूचे तांडव असेच सुरू राहणार.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध जिल्हा. शेकडो शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्या. शासन बदलले, प्रशासन गतिमान झाले, विविध शासकीय योजना आल्या. परंतु शेतकऱ्यांच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडला नाही.कोट्यवधींच्या योजना आणि पॅकेज येऊनही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत त्याचा लाभच गेला नाही. अलिकडेच शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी दिली. मात्र या कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवून कर्जमाफीच्या यादीत आपले नाव शोधत आहे. आपल्या बरोबरीच्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहे. आपलेच नाव का नाही, अशातूनही शेतकरी निराश होत आहे.घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने पंतप्रधानांच्या नावे थेट चिठ्ठी लिहून आपल्याला कर्जमाफीचा फायदा झाला नाही, त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही, अशी भूमिका कुटुंबाने घेतल्याने तीन दिवस मृतदेह शवागारात होता. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने सोपस्कार पार पाडले.कुटुंबियांची समजूत काढण्यात यश मिळविले. शंकरची चिता धगधगत असताना उमरखेडच्या इवळेश्वर येथील माधव रावते यांनी स्वत:च सरण रचून आत्महत्या केली. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या या वृद्धावर आयुष्याच्या सायंकाळी अशी दुर्दैवी वेळ आली. दोन दिवसानंतर या आत्महत्येला वाचा फुटली. शासन-प्रशासन हादरुन गेले.जिल्ह्यात शंकर आणि माधव सारखे अनेक शेतकरी आहे. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईनच्या जाचातून आणि विविध प्रक्रियेतून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने दिलेली कर्जमाफीतील त्रुटी आता शेतकऱ्यांच्या जीवावर तर उलटत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या