शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखाने ‘पांढरा हत्ती’

By admin | Updated: October 6, 2016 00:21 IST

शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत.

गोपालक त्रस्त : ११२ गावांत एक लाखावर जनावरे, उपचार केवळ नावालाचमहागाव : शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत. तालुक्यातील अनेक पशुचिकित्सालयांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. त्यामुळे उपचारसाठी जनावरे घेऊन आलेले गोपालक त्रस्त झाले आहेत. महागाव तालुक्यात जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. दुधाळ जनावरांना पोटफुगीचा त्रास जाणवू लागला आहे. अशा जनावरांना घेऊन पशुचिकित्सालयात गोपालक गेल्यास डॉक्टरच भेट नाही. दिवसभर जनावरांना घेऊन तात्कळत राहावे लागते. महागाव सारख्या तालुका मुख्यालयाचीच ही अवस्था असेल तर इतर पशुचिकित्सालयाची काय अवस्था असेल, असा प्रश्न आहे. अनंतवाडी येथील सोमला राठोड यांच्या शेळीला कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी हा शेतकरी महागाव आणि खडका येथील पशुचिकित्सालयाचे उंबरठे झिजवत आहे. दोन दिवसांपासून डॉक्टर मिळाले नाही. अखेर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु उपयोग झाला नाही. कलगाव येथील अंकुश भवानकर यांची गाय अज्ञात रोगाने त्रस्त आहे. तिचे पोट फुगले आहे. २०० रुपयांचा दररोज दुधाचा फटका शेतकऱ्याला बसत आहे. पिंपळगाव ई. येथील लक्ष्मण वानखेडे, भाऊसाहेब पाईकराव, भगवान इंगळे, माधव जंगले, योगाजी खोकले यांना बैलजोडीच्या खरेदीसाठी पशुचिकित्सकाचा दाखला पाहिजे. आठ दिवसांपासून हे शेतकरी पशुधन विकास अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत परंतु उपयोग होत नाही. महागाव तालुक्यात महागाव, फुलसावंगी, गुंज, वनोली, काळी दौ., खडका, मुडाणा, पोखरी, डेंभी, वडद येथे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ११२ गावातील एक लाख ९ हजार १६५ जनावरांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु अपवाद वगळता पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयीच राहात नाही. खेड्यातून जनावरे घेऊन आलेला शेतकरी महागावात दिवसभर तात्काळत असतो. विना चारापाण्याची जनावरे परिसरात बांधून असतात. या सर्व प्रकाराकडे जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)जनावरांचे शवविच्छेदन अडकलेनैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर शासकीय मदत मिळते परंतु महागाव तालुक्यातील अनेक मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवाल अडकले आहे. उटी येथील रामराव पाटील गावंडे यांनी आपल्या मृत म्हशीच्या अहवालासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र दिले, परंतु अद्यापही अहवाल दिला नाही. तालुक्यातील अनेक जनावरे पुरात वाहून गेली, मात्र त्यांचे शवविच्छेदन आणि अहवाल अडकले आहे. वारंवार तक्रारी करूनही याबाबची दखल मात्र घेण्यात येत नाही.