शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखाने ‘पांढरा हत्ती’

By admin | Updated: October 6, 2016 00:21 IST

शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत.

गोपालक त्रस्त : ११२ गावांत एक लाखावर जनावरे, उपचार केवळ नावालाचमहागाव : शेती आणि पशूपालन हा मुख्य व्यवसाय असलेल्या महागाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने पांढरा हत्ती ठरले आहेत. तालुक्यातील अनेक पशुचिकित्सालयांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. त्यामुळे उपचारसाठी जनावरे घेऊन आलेले गोपालक त्रस्त झाले आहेत. महागाव तालुक्यात जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. दुधाळ जनावरांना पोटफुगीचा त्रास जाणवू लागला आहे. अशा जनावरांना घेऊन पशुचिकित्सालयात गोपालक गेल्यास डॉक्टरच भेट नाही. दिवसभर जनावरांना घेऊन तात्कळत राहावे लागते. महागाव सारख्या तालुका मुख्यालयाचीच ही अवस्था असेल तर इतर पशुचिकित्सालयाची काय अवस्था असेल, असा प्रश्न आहे. अनंतवाडी येथील सोमला राठोड यांच्या शेळीला कुत्र्याने चावा घेतला. उपचारासाठी हा शेतकरी महागाव आणि खडका येथील पशुचिकित्सालयाचे उंबरठे झिजवत आहे. दोन दिवसांपासून डॉक्टर मिळाले नाही. अखेर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु उपयोग झाला नाही. कलगाव येथील अंकुश भवानकर यांची गाय अज्ञात रोगाने त्रस्त आहे. तिचे पोट फुगले आहे. २०० रुपयांचा दररोज दुधाचा फटका शेतकऱ्याला बसत आहे. पिंपळगाव ई. येथील लक्ष्मण वानखेडे, भाऊसाहेब पाईकराव, भगवान इंगळे, माधव जंगले, योगाजी खोकले यांना बैलजोडीच्या खरेदीसाठी पशुचिकित्सकाचा दाखला पाहिजे. आठ दिवसांपासून हे शेतकरी पशुधन विकास अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत परंतु उपयोग होत नाही. महागाव तालुक्यात महागाव, फुलसावंगी, गुंज, वनोली, काळी दौ., खडका, मुडाणा, पोखरी, डेंभी, वडद येथे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ११२ गावातील एक लाख ९ हजार १६५ जनावरांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु अपवाद वगळता पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयीच राहात नाही. खेड्यातून जनावरे घेऊन आलेला शेतकरी महागावात दिवसभर तात्काळत असतो. विना चारापाण्याची जनावरे परिसरात बांधून असतात. या सर्व प्रकाराकडे जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)जनावरांचे शवविच्छेदन अडकलेनैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर शासकीय मदत मिळते परंतु महागाव तालुक्यातील अनेक मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवाल अडकले आहे. उटी येथील रामराव पाटील गावंडे यांनी आपल्या मृत म्हशीच्या अहवालासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र दिले, परंतु अद्यापही अहवाल दिला नाही. तालुक्यातील अनेक जनावरे पुरात वाहून गेली, मात्र त्यांचे शवविच्छेदन आणि अहवाल अडकले आहे. वारंवार तक्रारी करूनही याबाबची दखल मात्र घेण्यात येत नाही.