शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

इन्स्पायर अवार्डला अत्यल्प प्रतिसाद;  महाराष्ट्रात यंदा कोविडमुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:04 IST

केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘इन्स्पायर अवार्ड’ योजनेला यंदा महाराष्ट्रातून अत्यल्प प्रतिसाद आहे.

ठळक मुद्देअपेक्षा अडीच लाख प्रयोगांची, आले केवळ सात हजार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासह त्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘इन्स्पायर अवार्ड’ योजनेला यंदा महाराष्ट्रातून अत्यल्प प्रतिसाद आहे. नियमानुसार राज्यातून दोन लाख ८२ हजार प्रयोग अपेक्षित असताना केवळ सात हजार विद्यार्थ्यांनी नामांकने दाखल केली आहेत.

विशेष म्हणजे, दरवर्षी या योजनेत देशातून सर्वाधिक नामांकने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून भरली जातात. यंदा मात्र कोरोनाचे संकट, त्यामुळे बंद असलेल्या शाळा, कमी झालेला शिक्षक-विद्यार्थी संपर्क याचा विपरित परिणाम होऊन नामांकनांमध्ये प्रचंड घट झाली आहे. शिवाय, दरवर्षी शाळेमार्फत नामांकने भरली जातात. यंदा कोविडमुळे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नामांकने मागविण्यात आली आहे.भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने राबविली जाणारी ही योजना महाराष्ट्रात राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या मार्फत राबविली जाते. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नामांकने भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र २५ सप्टेंबर उजाडूनही अपेक्षित नामांकने आलेली नाहीत.५६ हजार शाळांवर फोकससहावी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या ५६ हजार ४४० शाळांकडून प्रत्येकी पाच नामांकने मागविण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यातून दोन लाख ८२ हजार २०० विद्यार्थ्यांचे प्रयोग येणे आवश्यक आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ सहा हजार ५१९ नामांकने आली आहेत. यात जिल्हानिहाय अपेक्षित नामांकने अशी आहेत : अमरावती ८१६५, अकोला ५४४५, नागपूर ११७१५, यवतमाळ ९०४०, वर्धा ३५३५, भंडारा ३३४०, चंद्रपूर ६५७५, गोंदिया ४७४५, वाशिम ७५८, बुलडाणा ६७६५, गडचिरोली ४३१०, अहमदनगर ९८८५, औरंगाबाद १२८९०, बीड ७९१५, धुळे ३७१०, हिंगोली ३४८५, जळगाव ८१६०, जालना ६००५, कोल्हापूर ११३३५, लातूर ८२४५, नांदेड ९३७०, नंदूरबार ३४३०, नाशिक १२६४५, उस्मानाबाद५३३०, पालघर ८४३०, परभणी ६५४५, पुणे १९१९०, रायगड ७६८५, रत्नागिरी ७५८०, सांगली ७४४०, सातारा ८९५०, सिंधुदुर्ग ३८९०, सोलापूर १११०५, ठाणे १७११०, मुंबई १४३६५.यवतमाळात नामांकन नाही, तर पगार नाही!यवतमाळ जिल्ह्यातील १८०८ शाळांमधून ९ हजार ४० नामांकने अपेक्षित असताना केवळ ३५ नामांकने आली आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठवून नामांकने दाखल न केल्यास सप्टेंबरची पगार देयकेच स्वीकारली जाणार नाही, अशी तंबी दिली आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांशी चर्चा झाली असून आता नामांकने वाढतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र