शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

वालीमाईच्या निष्णात हातांनी प्रसवते मातृत्व

By admin | Updated: July 9, 2014 23:52 IST

गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की,

।। हजारांवर बाळंंतपण : जेवणाचे ताट बाजूला सारत जाते धावून ।।किशोर वंजारी - नेर गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की, पुढचे जेवणाचे ताटही बाजूला सारुन धावून जायचे एवढेच तिला माहीत. हजारो मातांना मातृत्वाचा अत्युच्च आनंद देणारी ही वालीबाई मोहन जाधव आहे नेर तालुक्यातील बोंडगव्हाणची. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. अशा समयी गरज असते ती निष्णात डॉक्टरांची आणि आपुलकीच्या माणसांची. मात्र आजही ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सेवाच पोहोचल्या नाही. वर्षानुवर्ष त्याच त्या समस्या कायम आहे. मात्र या समस्यांवरही ग्रामीण ज्ञानाने मात केली. बाळंतपणासाठी परंंपरागत दाईचीच मदत घेतली जाते. पूर्वापार ज्ञानावर आजही ग्रामीण भागात दाईच सुरक्षित बाळंंतपण करते. नेर तालुक्यातील बोंडगव्हाण येथे ही बाळंतपणात वालीबाई जाधवचाच आधार असतो. आतापर्यंत तिने गावातील हजाराच्यावर बाळंतपण केले. कोणतीही शिक्षण नाही की प्रशिक्षण नाही. मात्र तिचे निष्णात हात डॉक्टरांना लाजवेल, अशा पद्धतीने बाळंतपण करते. ती गावकऱ्यांची आता वालीमाई झाली आहे. चंद्रमौळी झोपडीत राहणारी वालीबाई आज ७० वर्षाची आहे. दाईचे कोणतीही प्रशिक्षण तिने घेतले नाही. परंतु आई पुतळाबाई हिच्याकडून हा वारसा तिने घेतला. तरुण पणापासून आईसोबत जाऊन तिने बाळंंतपण करण्याची कला अवगत केली. आज ती एवढी निष्णात झाली आहे की, गावकरी एकवेळेस डॉक्टरांवर विश्वास ठेवणार नाही परंतु वालीबार्इंवर ठेवतील. रात्री-बेरात्री कधीही निरोप आला की वालीबाई तेवढ्याच तत्परतेने जाते. यासाठी तिने कधी पैशाचा मोह केला नाही. कुटुंबाला झालेल्या आनंदात जे काही मिळेल ते घ्यायचे आणि आपले घर गाठायचे, असा तिचा शिरस्ता आहे. म्हणूनच आज ती गावकऱ्यांची माई झाली आहे. आतापर्यंत केलेल्या बाळंंतपणाचे अनुभव कथन करताना वालीबाई सांगते, गेल्या ४० वर्षांपासून गावात दाईचे काम करीत आहे. बाळंतपणानंतर लोक कपडे, धान्य देतात. एवढेच नाही तर पाहुणचारही करतात. परंतु मी कधी अपेक्षा केली नाही. केवळ पोटुशी महिलेची सुटका करायची आणि आनंद पेरायचा एवढेच आपले काम. ४० वर्षाच्या या कामात आपल्याला कधीच वाईट अनुभव आला नाही. आला असेल तर तो मला आता आठवतही नाही. मात्र काही वेळा परिस्थिती गंभीर असते. प्रकरण लक्षात येताच आपण कुटुंबाला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देते. मात्र अनेकांची परिस्थिती दवाखान्यापर्यंत जाण्याची नसते तेव्हा मग आपले कसब पणाला लावावे लागते. वालीबार्इंनी बाळंंतपण केलेली आज अनेक जण मोठ्या पदावर आहेत. गावातील एकही घर असे नसेल की आपल्या हातून त्या घरचे बाळंंतपण झाले नाही, असे वालीबाई मोठ्या अभिमानाने सांगते. वालीबाईच्या परिवारात पती मोहन जाधव, दोन मुले, दोन मुली आहेत. तीन एकर शेतावर त्यांचे चरितार्थ चालते. नथणी बक्षीस बाळंतपणासाठी आपण कोणतीही बिदागी घेत नाही. जे काही दिले त्यावरच समाधान मानते. काही वर्षापूर्वी गावातील नारायण झोड यांच्या मुलीचे आपण बाळंंतपण केले. परिवाराला अत्यानंद झाला. त्यावेळी झोड परिवाराने आठ ग्रॅम सोन्याची नथ दिली. आजही ती नथ वालीबाईच्या नाकात आहे. मोठ्या गर्वाने ती नथणी आजही दाखविते. सुरक्षित मातृत्व शासन सुरक्षित मातृत्वासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. घरापासून रुग्णालयापर्यंत गर्भवती मातेला पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. गावागावात आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही बाळंतपणासाठी दाईचाच आधार घ्यावा लागतो. शासनाने या निष्णात दार्इंना आणखी प्रशिक्षण देऊन मातृत्व सुरक्षा अभियानात सहभागी करण्याची गरज आहे.