शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

वालीमाईच्या निष्णात हातांनी प्रसवते मातृत्व

By admin | Updated: July 9, 2014 23:52 IST

गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की,

।। हजारांवर बाळंंतपण : जेवणाचे ताट बाजूला सारत जाते धावून ।।किशोर वंजारी - नेर गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की, पुढचे जेवणाचे ताटही बाजूला सारुन धावून जायचे एवढेच तिला माहीत. हजारो मातांना मातृत्वाचा अत्युच्च आनंद देणारी ही वालीबाई मोहन जाधव आहे नेर तालुक्यातील बोंडगव्हाणची. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. अशा समयी गरज असते ती निष्णात डॉक्टरांची आणि आपुलकीच्या माणसांची. मात्र आजही ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सेवाच पोहोचल्या नाही. वर्षानुवर्ष त्याच त्या समस्या कायम आहे. मात्र या समस्यांवरही ग्रामीण ज्ञानाने मात केली. बाळंतपणासाठी परंंपरागत दाईचीच मदत घेतली जाते. पूर्वापार ज्ञानावर आजही ग्रामीण भागात दाईच सुरक्षित बाळंंतपण करते. नेर तालुक्यातील बोंडगव्हाण येथे ही बाळंतपणात वालीबाई जाधवचाच आधार असतो. आतापर्यंत तिने गावातील हजाराच्यावर बाळंतपण केले. कोणतीही शिक्षण नाही की प्रशिक्षण नाही. मात्र तिचे निष्णात हात डॉक्टरांना लाजवेल, अशा पद्धतीने बाळंतपण करते. ती गावकऱ्यांची आता वालीमाई झाली आहे. चंद्रमौळी झोपडीत राहणारी वालीबाई आज ७० वर्षाची आहे. दाईचे कोणतीही प्रशिक्षण तिने घेतले नाही. परंतु आई पुतळाबाई हिच्याकडून हा वारसा तिने घेतला. तरुण पणापासून आईसोबत जाऊन तिने बाळंंतपण करण्याची कला अवगत केली. आज ती एवढी निष्णात झाली आहे की, गावकरी एकवेळेस डॉक्टरांवर विश्वास ठेवणार नाही परंतु वालीबार्इंवर ठेवतील. रात्री-बेरात्री कधीही निरोप आला की वालीबाई तेवढ्याच तत्परतेने जाते. यासाठी तिने कधी पैशाचा मोह केला नाही. कुटुंबाला झालेल्या आनंदात जे काही मिळेल ते घ्यायचे आणि आपले घर गाठायचे, असा तिचा शिरस्ता आहे. म्हणूनच आज ती गावकऱ्यांची माई झाली आहे. आतापर्यंत केलेल्या बाळंंतपणाचे अनुभव कथन करताना वालीबाई सांगते, गेल्या ४० वर्षांपासून गावात दाईचे काम करीत आहे. बाळंतपणानंतर लोक कपडे, धान्य देतात. एवढेच नाही तर पाहुणचारही करतात. परंतु मी कधी अपेक्षा केली नाही. केवळ पोटुशी महिलेची सुटका करायची आणि आनंद पेरायचा एवढेच आपले काम. ४० वर्षाच्या या कामात आपल्याला कधीच वाईट अनुभव आला नाही. आला असेल तर तो मला आता आठवतही नाही. मात्र काही वेळा परिस्थिती गंभीर असते. प्रकरण लक्षात येताच आपण कुटुंबाला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देते. मात्र अनेकांची परिस्थिती दवाखान्यापर्यंत जाण्याची नसते तेव्हा मग आपले कसब पणाला लावावे लागते. वालीबार्इंनी बाळंंतपण केलेली आज अनेक जण मोठ्या पदावर आहेत. गावातील एकही घर असे नसेल की आपल्या हातून त्या घरचे बाळंंतपण झाले नाही, असे वालीबाई मोठ्या अभिमानाने सांगते. वालीबाईच्या परिवारात पती मोहन जाधव, दोन मुले, दोन मुली आहेत. तीन एकर शेतावर त्यांचे चरितार्थ चालते. नथणी बक्षीस बाळंतपणासाठी आपण कोणतीही बिदागी घेत नाही. जे काही दिले त्यावरच समाधान मानते. काही वर्षापूर्वी गावातील नारायण झोड यांच्या मुलीचे आपण बाळंंतपण केले. परिवाराला अत्यानंद झाला. त्यावेळी झोड परिवाराने आठ ग्रॅम सोन्याची नथ दिली. आजही ती नथ वालीबाईच्या नाकात आहे. मोठ्या गर्वाने ती नथणी आजही दाखविते. सुरक्षित मातृत्व शासन सुरक्षित मातृत्वासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. घरापासून रुग्णालयापर्यंत गर्भवती मातेला पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. गावागावात आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही बाळंतपणासाठी दाईचाच आधार घ्यावा लागतो. शासनाने या निष्णात दार्इंना आणखी प्रशिक्षण देऊन मातृत्व सुरक्षा अभियानात सहभागी करण्याची गरज आहे.