शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

पुसद येथे भाजीपाला, फळविक्रेत्यांचे शहर पोलीस ठाण्यासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:34 IST

येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देपाचवा दिवस । प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही, पर्यायी जागा देण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी वाहतुकीला अडथळा होतो म्हणून भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. तेथे आता शहर पोलीस ठाण्याचे मोठे वाहन आणून उभे केले जाते. तसेच तेथे इतरही वाहने उभी राहतात. त्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत नाही कां, आम्ही हातगाडी लावली तरच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी विचारला आहे.शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मग आमच्यावरच अन्याय का, असा त्यांचा प्रश्न आहे. उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याच ठिकाणी हातगाडी लावण्याची किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही.१४ आॅगस्टपासून २२ भाजी व फळ विक्रेते साखळी उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत त्याच ठिकाणी किंवा पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार विष्णू सरकटे, विलास उबाळे, सै.सलीम, मनसूर शेख, शेख अनसार, गणेश खाडे, शेख जावेद, सै.मुजिबोद्दीन, साकीब अहेमद, शेख जाकीर, अशोक चोपडे, शेख ईसराईल, रुकमाबाई सुकळकर, मंदाबाई चोपडे, यांच्यासह सर्वच भाजी व फळ विक्रेत्यांनी केला आहे.खुल्या जागेतील वाहनांचा अडथळा नाही का ?पोलिसांनी भाजीपाला व फळविक्रेत्यांना हटवून जागा खुली केली. त्याच जागी आता पोलिसांच्या वाहनासह इतर वाहने उभी राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी केला आहे. शिवाय शहरात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली. ही दुकाने का हटविली जात नाही, असा संतप्त प्रश्न उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याकडे पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. केवळ गरिबांच्याच व्यवसायावर घाला का घातला जातो, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :vegetableभाज्याStrikeसंप