शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे भाजीपाला, फळविक्रेत्यांचे शहर पोलीस ठाण्यासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:34 IST

येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देपाचवा दिवस । प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही, पर्यायी जागा देण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी वाहतुकीला अडथळा होतो म्हणून भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. तेथे आता शहर पोलीस ठाण्याचे मोठे वाहन आणून उभे केले जाते. तसेच तेथे इतरही वाहने उभी राहतात. त्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत नाही कां, आम्ही हातगाडी लावली तरच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी विचारला आहे.शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मग आमच्यावरच अन्याय का, असा त्यांचा प्रश्न आहे. उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याच ठिकाणी हातगाडी लावण्याची किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही.१४ आॅगस्टपासून २२ भाजी व फळ विक्रेते साखळी उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत त्याच ठिकाणी किंवा पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार विष्णू सरकटे, विलास उबाळे, सै.सलीम, मनसूर शेख, शेख अनसार, गणेश खाडे, शेख जावेद, सै.मुजिबोद्दीन, साकीब अहेमद, शेख जाकीर, अशोक चोपडे, शेख ईसराईल, रुकमाबाई सुकळकर, मंदाबाई चोपडे, यांच्यासह सर्वच भाजी व फळ विक्रेत्यांनी केला आहे.खुल्या जागेतील वाहनांचा अडथळा नाही का ?पोलिसांनी भाजीपाला व फळविक्रेत्यांना हटवून जागा खुली केली. त्याच जागी आता पोलिसांच्या वाहनासह इतर वाहने उभी राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी केला आहे. शिवाय शहरात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली. ही दुकाने का हटविली जात नाही, असा संतप्त प्रश्न उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याकडे पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. केवळ गरिबांच्याच व्यवसायावर घाला का घातला जातो, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :vegetableभाज्याStrikeसंप