शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

पुसद येथे भाजीपाला, फळविक्रेत्यांचे शहर पोलीस ठाण्यासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:34 IST

येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देपाचवा दिवस । प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही, पर्यायी जागा देण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी वाहतुकीला अडथळा होतो म्हणून भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. तेथे आता शहर पोलीस ठाण्याचे मोठे वाहन आणून उभे केले जाते. तसेच तेथे इतरही वाहने उभी राहतात. त्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत नाही कां, आम्ही हातगाडी लावली तरच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी विचारला आहे.शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मग आमच्यावरच अन्याय का, असा त्यांचा प्रश्न आहे. उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याच ठिकाणी हातगाडी लावण्याची किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही.१४ आॅगस्टपासून २२ भाजी व फळ विक्रेते साखळी उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत त्याच ठिकाणी किंवा पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार विष्णू सरकटे, विलास उबाळे, सै.सलीम, मनसूर शेख, शेख अनसार, गणेश खाडे, शेख जावेद, सै.मुजिबोद्दीन, साकीब अहेमद, शेख जाकीर, अशोक चोपडे, शेख ईसराईल, रुकमाबाई सुकळकर, मंदाबाई चोपडे, यांच्यासह सर्वच भाजी व फळ विक्रेत्यांनी केला आहे.खुल्या जागेतील वाहनांचा अडथळा नाही का ?पोलिसांनी भाजीपाला व फळविक्रेत्यांना हटवून जागा खुली केली. त्याच जागी आता पोलिसांच्या वाहनासह इतर वाहने उभी राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी केला आहे. शिवाय शहरात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली. ही दुकाने का हटविली जात नाही, असा संतप्त प्रश्न उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याकडे पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. केवळ गरिबांच्याच व्यवसायावर घाला का घातला जातो, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :vegetableभाज्याStrikeसंप