शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

यवतमाळच्या शेतकरीपुत्रांचा सिनेमा फिल्मफेअर स्पर्धेत; ‘वेगळी वाट’ला ९ नामांकने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 17:24 IST

ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे.

ठळक मुद्दे गावखेड्यातल्या कलावंतांना राजधानीत पसंती

अविनाश साबापुरे

यवतमाळ : यवतमाळचे शेतकरी वेगळी वाट चोखाळत नाही म्हणून ते मागे पडतात, अशी आव वारंवार उठविली जाते. मात्र आता याच मातीतल्या कृषीपुत्रांनी येथील ग्रामीण संस्कृतीचा बहारदार चेहरा थेट सिनेमाच्या पडद्यावर चितारला. या सिनेमाला अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाल्यावर आता तो थेट ‘फिल्म फेअर’ स्पर्धेत ९ नामांकनांसह पोहोचला आहे.

ग्रामीण माणसाच्या जगण्याची वहिवाट समजावून सांगणाऱ्या या चित्रपटाचे नाव आहे ‘वेगळी वाट’.  घाटंजी तालुक्यातील देवधरी या छोट्याशा गावातील अच्युत नारायण चोपडे या शेतकरीपुत्राने हा सिनेमा साकारला. स्वत:च लिहिला आणि दिग्दर्शित केला. विशेष म्हणजे, घाटंजी, पारवा, पांढरकवडा या स्थानिक परिसरातील युवकांनाच त्यांनी सिनेमात भूमिका दिल्या. पूर्वी चारशे गावांच्या वतनदारीचे गाव असलेल्या पारवा परिसरातील शेतशिवारांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. तर ‘इन डोअर शूट’ आबासाहेब पारवेकर विद्यालयात पार पडले. शिवाय पांढरकवडा तालुक्यातील शेतशिवार आणि पांढरकवडा येथील बसस्थानकात चित्रीकरण करण्यात आले. २०२० च्या फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट यवतमाळच्या टाॅकीजसह राज्यभरात प्रदर्शित झाला होता.

ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे.ग्रामीण माणसांनी खेड्यातच साकारलेला हा सिनेमा आता ‘फिल्म फेअर’ पुरस्काराच्या स्पर्धेत पोहोचला आहे. इतर दिग्गजांचे सिनेमेही या स्पर्धेत असताना ‘वेगळी वाट’ला तब्बल ९ गटात नामांकने मिळाली आहेत.

बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, क्रिटिक्स अवार्ड फाॅर बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्टर इन लिडिंग रोल (फिमेल), क्रिटिक्स अवार्ड फाॅर बेस्ट ॲक्टर (फिमेल), बेस्ट स्टोरी, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट साउंड डिझाईन, बेस्ट डिबट डायरेक्टर अशा ९ गटातून हा सिनेमा फिल्म फेअर पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. आता ३१ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘वेगळी वाट’ कोण-कोणत्या गटातून पुरस्काराचा मानकरी ठरतो, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्हावासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत.

यात्रेतील टाॅकीजमुळे लागला सिनेमाचा छंद

अच्युत नारायण चोपडे हे या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. देवधरी (ता.घाटंजी) या त्यांच्या खेड्यातील यात्रेत येणाऱ्या टुरिंग टॉकिजमुळे अच्युत सिनेमाचे चाहते बनले. कथा ऐकणे आणि सांगणे हा त्यांचा बालवयातला छंद होता. तोच छंद जोपासत आता त्यांनी चक्क सिनेमा साकारला. आपल्या जिल्ह्याची बोलीभाषा, कृषी संस्कृती, माणसे जगाला दाखवावी म्हणून सिनेमा निर्मिती केल्याची भावना अच्युत चोपडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :cinemaसिनेमाYavatmalयवतमाळ